मुंबई : वृत्तसंस्था ५ रोजी मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पलकच्या हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये पलकचा भाऊ पलाश हा तिला हळद लावताना दिसत आहे. पलकनं 2012 साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर या चित्रपटामधील तसेच आशिकी 2 (2013), किक (2014), एक्शन जॅक्सन (2014) प्रेम रतन धन पायो (2015), एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) काबिल (2017), बाघी 2 (2018)…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशात सर्वांनाच मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. पण लोक याबाबत बोलणे टाळत असतात पण हा छोटा आजार जरी असला तरी भविष्यात तो आजार मोठा होवू शकतो त्यामुळे आपल्या डॉक्टराशी याबाबत बोलले पाहिजे.अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी समजत नाहीत. यामुळेच लोक त्यातून पूर्णपणे सावरत नाहीत. किंवा त्यांना त्यातून सावरायला वेळ लागतो. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे. तणाव आणि चिंता एकसारखे नाही अनेकदा लोकांना तणाव आणि चिंता यातील नेमका फरक कळत नाही. कारण या दोन्ही…
धरणगाव : प्रतिनिधी येथील शहराचा पुर्वत्तर भागात तेली तलाव असुन तेथे हजारो लोकांचे श्रद्धास्थान म्हणुन सिध्दी हनुमान मंदीर व ग्रामदैवत म्हणुन मरीआई मंदीर आहे. तेथे दररोज शेकोडो भावीक मोठ्या श्रध्देने व भावनेने दर्शनाला जातात परंतु बाजूस असलेल्ये तेली तलावात घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले असुन सर्वत्र दुर्गधीमुळे हवामान दुषित झाले आहे परीणामी परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पालीका प्रशासना संदर्भात चिड व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने त्वरीत लक्ष घालुन तलावाची साफसफाई करावी अशी मागणी होत आहे. गेल्या दोन दिवसा पुर्वी परिसरातील काही नागरिकांनी पालीका प्रशासनला प्रतक्ष भेट देऊन सफाईची मागणी केली परंतु प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी नी उडवाउडवी चे उत्तरे…
मुंबई : वृत्तसंस्था 2014 मध्ये सर्वप्रथम हा दिवस ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ देशभर साजरा करण्यात येतो. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाचे महत्त्व 2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील, लोणी कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, सचिव तुषार पाटील, खजिनदार लक्ष्मण…
मुंबई : वृत्तसंस्था राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल जीवन मिशनच्या 40 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी भाजपने केले होते. याच योजनेचे दुसरे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली. ते म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडले, पण पाडूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली, तरी चालेल असा प्रकार म्हणजे आत्ताचे सरकार असा टोला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाजपला लगावला. मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडले पण पाडूनही त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती…
मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपलादेखील चिमटे काढले. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी झाली. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या नेत्या ऋतुजा लटके या ५३ हजार ४४१ मतांनी विजयी झाल्या. लटके यांना एकूण ६६ हजार २४७ मतं पडली. तर ‘नोटा’ला १२ हजार ७७६ मतं पडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, नोटाला जेवढी मतं पडली, तेवढीच त्यांना (भाजपला) पडली असती. चिन्ह कोणतंही असलं तरी जनता आमच्यासोबत आहे. मशाल भडकली आणि भगवा फडकला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. ज्या लोकांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती,…
मुंबई : वृत्तसंस्था नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ने वैज्ञानिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे वैज्ञानिक C, D, E, F च्या एकूण 127 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार calicut.nielit.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. रिक्त जागांचा तपशील एकूण पदे – १२७ सायंटिस्ट-सी – ११२ पदे सायंटिस्ट-डी – १२ पदे वैज्ञानिक – ई – १ पद सायंटिस्ट-एफ – २ पदे वय मर्यादा वैज्ञानिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे. सायंटिस्ट-सी साठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे, सायंटिस्ट-डी साठी ४०…
मुंबई : वृत्तसंस्था सोशल मिडीयाच्या माध्यमातून पैसे हि कमवू शकतात. अनेक जण सोशल मीडियाच्या मदतीने लाखोंची कामे करतात हे आपण अनेकदा वाचलं आहे माहिती आहे. पण कधी तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का कि हे पैसे कसे मिळवायचे किंवा कसे मिळतात. मेटा ने फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रियेटर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलं आहे त्यामुळे युजर्स आता बक्कळ कमाई करू शकतील. कंपनीने डिजिटल कलेक्टिबल टूल जोडण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरुन निर्माते त्यांचे NFT तयार करू शकतील आणि इंस्टाग्रामवर विकून पैसे कमवू शकतील. ही माहिती स्वत: मेटाने शेअर केली आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एक्टिव क्रिएटर्स तुम्ही तुमची स्वतःची एलएफटी तयार करू शकता…
परभणी : वृत्तसंस्था राज्यातील रखडलेली पोलीस दलातील शिपाई भरती आता मार्गी लागली आहे. परभणी जिल्ह्यातील 75 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांना 9 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पोलीस दलाच्या Policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये याबाबत सर्व नियम अटी देण्यात आले आहेत. त्यामुळे एकदाची भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार…

