केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अक्षय कुमार यांचा पृथ्वीराज चौहान हा सिनेमा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तर अक्षयने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्टने देखील लक्ष वेधून घेतले आहे. तर आता आलेला फोटो देखील अक्षय व भाजपचे मैत्रीचे नाते दिसल्याचे दिसून येत आहे. अक्षयनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला निरखून पाहिलं तर अक्षयच्या समोर दूरवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दिसत आहे. अर्थात यावरनं स्पष्ट होतंय अक्षय गुजरातच्या भूमीत आहे,मोदींच्या राज्यात. त्यानं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टीपत फोटोला कॅप्शन दिलं आहे की,”मी एकता नगर मध्ये आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूजवळ आहे. इथे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश राऊले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की, शिडी जि. अहमदनगर येथील काही इसम हे उमटी (मध्यप्रदेश) येथे गावठी पिस्तोल जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी हुंडाई कंपनीची बहन पांडया रंगाची चारचाकी गाडी तिच्या मागच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे असून क्र.MH-१५/DM७७७८ अशा गाडीने आलेले आहेत. ते चोपडा कडून सिड जि. अहमदनगर येथे जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात ११ नोव्हेंबर पासून एग्रोवन कृषी प्रदर्शन सुरू झालेले आहे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी भेट दिली या प्रदर्शनात सुमारे 250 हुन अधिक स्टॉल्स आहेत. सध्या शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई खूप भासत आहे. जादा मजुरी देऊनही अंग मेहनतीचे कामे असल्याने मजूर मिळत नाही, याला पर्याय म्हणून कमी मजूर लागणारी पिके व मजुराला पर्याय म्हणून यंत्र व अवजारे यांचे स्वतंत्र दालनाला प्रतापराव यांनी भेट दिली. शेती हा बिन भरवशाचा व्यवसाय झालेला असल्यामुळे शेतमालाला भाव मिळेल याची शाश्वती देता येत नाही यामुळे विविध प्रकारच्या फळभाज्या, भाजीपाला, बांबू सुबाभूळ, यांच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांकडून त्यांनी…
धरणगाव : प्रतिनिधी आज १४ नोव्हेंबर म्हणजेच जागतिक बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कु.पार्थ सागर भारुडे या बालकाला मामा च्या गावाला जाऊया..! हा ग्रंथ भेट देण्यात आला.याप्रसंगी सौ.वृषाली सागर भारूडे,कु.आराध्या भारुडे, बाबा रविंद्र गजानन भारुडे, आदी उपस्थित होते. प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण विकत घेता येत नाही..! असे गौरवोद्गार कर्तव्य बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ चौधरी यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भारुडे यांनी केले तर आभार सौ.वृषाली सागर भारुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी मनिष चौधरी,गौरव चौधरी,ओम कोळी,अरविंद चौधरी आदीनी केले.
अमळनेर : प्रतिनिधी सुरतहून बिहारकडे निघालेल्या महिलेस अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या आणि धावत्या गाडीत प्रसूती झाली. सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबवून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. क्रांतीदेवी (२८) असे या महिलेचे नाव आहे. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. सुरतहून बरौनी सुपरफास्ट रेल्वेने आपल्या तीन मुलींसोबत बिहारकडे ती निघाली होती. शिंदखेडा – अमळनेरदरम्यान तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबत नाही. जळगाव किंवा भुसावळ जाईपर्यंत खूप उशीर होणार होता. महिलेसोबत कोणीही पुरुष नव्हते फक्त तिच्या तीन मुली सोबत होत्या. अमळनेर स्टेशनवरून गाडी पास होत असतानाच महिलेची डब्यातच प्रसूती झाली. तातडीने रेल्वे गार्ड, आरपीएफ यांच्या मदतीने सुपरफास्ट रेल्वे…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक २८ वर्षीय युवक ठार झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जी.जे. ०३- बी.टी- ५७२८ क्रमांकाच्या ट्रकने वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या मालवाहतूक व्हॅन क्रमांक एम.एच.२८ ए. बी. ४३३४ या वाहनास धडक दिली. यात शिवचरण अरुण मानेकर (वय २८ रा. पहूरपुर्णी जिल्हा बुलढाणा) चालक गंभीर जखमी झाला. फेकरी गावचे पोलीस पाटील किशोर बोरोले हे नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले असताना त्यांना अपघाताबाबत माहिती मिळाली. त्यांनी पोलीस स्टेशनला व हायवे मोबाइल…
मुंबई : वृत्तसंस्था मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ सादर करत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करतोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. ठाण्यातील वाय ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला. उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय? यात…
ठाणे : वृत्तसंस्था एका महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेताच ठाण्यातील आ.जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. आता यावर मुख्यमंत्री काय बोलतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवा येथील पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला. मात्र, त्यावेळी या प्रकाराची इतकी वाच्यता झाली नाही. संबंधित…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १० रोजी दुपारी ४ वाजता घरातून अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या बाबत परिवाराने नातेवाईक व ओळखीच्याकडे तपास केला असता मिळून न आल्याने त्यांनी तत्काळ शनी पेठ पोलिसात गुन्हा दखल केला आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.
रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची घरे वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी फैजपूर प्रांत कार्यालय दिनांक १५ मंगळवार रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जमीन याचीकेत क्र 2/ 2022 दि 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हाभरात गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही जिल्हाभरात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील 9 गावांमधील 620 अतिक्रमण धारकांना तहसीलदाराच्यावतीने जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली असून पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे . सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत…

