जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांद्रा बु. येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला,. त्या निमित्ताने कानडदा – भोकर जि. प. गटातील वीस गावांतील मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मातंग समाजाचे राजेंद्र चव्हाण गुरुजी, गणेश सपकाळे, कैलास जाधव, संजय बाविस्कर, निखिलभाऊ सपकाळे, सोमा वैराडे, नानाभाऊ सपकाळे, पांडुरंग मोरे, सुरेंद्र गायकवाड, छोटु अवचिते, प्रकाश सोनवणे, यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जयराम सोनवणे,…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापासून जागतिक बाजारपेठमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत प्रंचड वाढ झाली असली तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे देशातील नवे जाहीर केले आहेत. आजही देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. जर कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही बदलल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.14 डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच, डब्ल्यूटीआयचा दर एका उडीसह प्रति बॅरल 85.26 डॉलरवर विकलं जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.…
एंरडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एक बस चालक आपले कर्तव्य बजावीत असतांना त्यास एकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील विखरण येथील रहिवासी असलेले साहेबराव महाजन(वय ४३, नोकरी – बसचालक) हे एंरडोल ते उत्राण येथे बसने प्रवासी वाहतूक करीत असतांना दि १४ रोजी दुपारी एस.टी.बस.क्रमाक एम.एच.०६.एस.८६२३ याने ते भातखेडा बसस्थानकावर आले असता त्यांच्या बसमागून येत बसचालक महाजन यांना संशयित आरोपी गोसावी याने खाली उतरवीत माझ्या दुचाकीस कट कसा मारला असा जाब विचारत असताना त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याने बसचालक महाजन यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसात सरकारी कर्मचारीस…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका शिवारातील शेतामधून हजारो रुपयांच्या कपाशीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी गोकुळसिंग इंद्रसिंग पाटील(वय ७०) यांच्या मालकीची शेत दहीगाव संत शिवारात आहे, त्यांच्या शेतातील १० क्विंटल कपाशी यासह सोलर बटरी, व शेतात लागणारे उपयुक्त औजारे यांची एकूण किमत ८९ हजार रुपये अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि १३ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी त्यांनी पाचोरा पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.सचिन पवार हे करीत आहेत.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात जबरीचोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिंगाईत येथील रहिवासी प्रवीण दिलीप पाटील(वय ३७) यांच्या मालकीचे घरी दि ११ रोजी दुपारी २ पासून तर दि १४ च्या पहाटेपर्यत या कालावधीत अनोळखी काही चोरट्यांनी घरात घुसून कडीकोंडा तोडून घरातील तब्बल १ लाख ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना दि १४ रोजी उघडकीस आल्याने त्यांनी तत्काळ जामनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी दीपक मोहिते हे करीत आहेत.
चोपडा : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी, विक्री दुकान (नंबर ४) मध्ये दोन चोरट्यांनी एक लाख ४६ हजारांची चोरी केली. त्यांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे व पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील व्यापारी नितीन लखीचंद दहाड (वय ४८) यांनी यांनी १४ रोजी दुपारी गावातीलच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख रूपये देण्यासाठी काढून आणले होते. या पैशांमधून त्यांनी ५४ हजार रूपयांचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी १ लाख ४६ हजार रूपये त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानामधील कपाटात ठेवले. त्यानंतर ते दुपारी…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून तरुणाची चारचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विवेकानंद नगरातील रहिवासी महेद्र रविद्र अहिरराव(वय ३४) यांच्या मालकीची चारचाकी गाडी एम.एच.१९.सी.यु.५३०९ हि सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीची यांनी दि १३ रोजी आपल्या राहत्या घराबाहेर लावलेली असतांना अनोळखी इसमाने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात महेद्र रविद्र अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन वाबळे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव सर यांच्या निवासस्थानावर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यावेळी डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव हे परिवारासह राहतात. त्यांचा मोठा मुलगा किरण बच्छाव हे शोरूमला होते तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, बीके हरिप्रसाद आणि केएच मुनियप्पा यांची विभागीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर 32 नेत्यांना लोकसभा निरीक्षक बनवण्यात आले असून त्यात प्रेमसाई सिंग टेकम आणि अशोक बैरवा यांच्या नावांचा समावेश आहे.याशिवाय शकील अहमद खान, शिवाजी राव मोगे, कांतीलाल भुरिया, राजेश लिलोथिया आणि जय किशन यांना इतर निरीक्षक करण्यात आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 संदर्भात आज ‘टास्क फोर्स-2024’ ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे खासदार दिग्विजय सिंह, राजस्थानचे आमदार सचिन पायलट आणि…
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे संविधानाला मानणारे आपण आहोत. काही दिवसापासून काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही, लोकशाहीला धब्बा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. आद्यक्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते पवार म्हणाले, लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून रखडलेले होते. या स्मारकाचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. राज्य सरकारने ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री…

