नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत २०२७ मध्ये देशात जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असल्याचं रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात हाऊसिंग लिस्ट आणि हाऊसिंग जनगणना होणार आहे. ही जनगणना २०२६ मध्ये एप्रिल ते डिसेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होणार आहे. ही लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत चाललेला ट्रॅफिक, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क व कृषी व्यापाराला मोठी चालना मिळण्यासाठी रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक झाली आहे.रिंग रोड झाल्यास शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच शहरात येणाऱ्या बाह्य वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.या महत्त्वपूर्ण…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू होईल. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमांनंतर तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.महापालिका निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखल देण्याचे काम सुरू झाले. मराठावाड्यातील आठ जिल्ह्यात यानंतर मराठा समाजातील अर्जदाराला कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू झालं आहे. इतक्या लोकांना त्याचा फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर…
लातूर : वृत्तसंस्था कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकताच निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. लातूरच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल कळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लाखो नागरिकांचे बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये पडून असलेले १ लाख कोटी रुपयांहून अधिक ‘दावा न केलेले’ पैसे त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमाची सुरुवात ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही संधी म्हणजे आपली विसरलेली संपत्ती परत मिळवण्याची एक संधी आहे. त्यांनी लोकांना ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ या चळवळीचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. बँक ठेवी, विमा, लाभांश, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि पेन्शनसह लावारिस (दावा न केलेल्या) पडलेल्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याकडून भुसावळकडे जात असलेल्या रस्त्यावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंडिकेटर न देता अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील आकाश राजेश पाटील (वय २९) हे दि. २४ रोजी सायंकाळी आई वडीलांसह जात होते. यावेळी (एमएच १९, डीझेड ५३४७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने इंडिकेटर न देता तो अचानक वळण घेत त्याने तरुणाच्या (एमएच १९, डीसी ७७३९) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह त्याचे आईवडील गंभीर…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तलीच्या माहितीवरून गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाई लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कृष्णा भिल (वय १८) आणि योगेश महाराज कोळी (वय ३५ रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा भील याला माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील लोणी गावात गोवंश कत्तल सुरू आहे त्यावरून कृष्णा भिल, योगेश महाराज कोळी आणि आणखी तीन ते चार जण हे लोणी गावात…
धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील फागणे गावानजीक गुरुवारी सायंकाळी दुचाकीने धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दोघांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेले दोघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून जळगावकडे जात असताना फागणे गावापुढे भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीपक मोतीलाल भामरे (वय ४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलवले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध…
आजचे राशिभविष्य दि.१२ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलताना थोडे सौम्यपणे बोला, संयम ठेवल्यास तुमचं नाते वाचेल. नियमित योगासने तुमचे आरोग्य सुधारतील. आज काही कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. ताण घेणं टाळा. वृषभ राशी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळू शकतो. या प्रकल्पामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कठोर परिश्रम करून ते त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवतील. मिथुन राशी आज तुम्हाला बालपणीच्या मित्राचा फोन येऊ शकतो. या संभाषणामुळे काही जुन्या आठवणी जाग्या होतील. अपूर्ण व्यवसाय पूर्ण होईल. नवीन व्यवसाय करार होऊ शकतात. तुमची संपत्ती वाढवण्याच्या तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. व्यवसाय वाढेल. सगळं…

