धरणगाव : प्रतिनिधी कब चौ. उमावि जळगाव व एरंगेल विभाग किडा समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा (मुले व मुली) कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे २० रोजी संपन्न झाली. यात एरंडोल विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला सदर स्पर्धत विजयी संघ / महाविद्यालय प्रथम क्रमांक कला वाणिज्य विज्ञान महाविदयालय धरणगाव (मुले संघ) व उपविजेता किसान महाविदयालय पारोळा तृतीय त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालय पाळधी तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव मुली संघ विजयी तर कै.म.धु.पाटील कला महाविद्यालय मारवड उपविजयी सदर स्पर्धेच्या उद्घाटनास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मेजर, मेजर डॉ. ए. डी. वळवीसर उद्घाटक म्हणून लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल क्रिडा विभागाचे सचिव प्रा.डॉ.देवदत्त पाटील…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद नगरपालिका स्थापन झाल्यापासून नगरपालिकेत कुठलेही नगरसेवक नसल्याने प्रशासक असून नशिराबाद मधील मालमत्ता हस्तांतरण करतांना नागरिकांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवर १ टक्के रक्कम नगरपरिषदेत भरण्यासाठी जी सक्ती केली जात आहे ती एकदम चुकीची असल्याबाबत नशिराबादचे माजी सरपंच पकंज महाजन यांनी नशिराबादचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होवून गेले कित्येक महिने झालेली असली तरी निवडणूक न झाल्याने संचालक मंडळ अजुनपर्यंत स्थापन झालेले नाही. अश्यात प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या यंत्रना पूर्ण करण्याचे काम सुरु आहे, ज्यामध्ये अनेक बाबी नागरिकांसाठी जाचक व गैरसोयीच्या सिध्द होत आहे. प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण असल्याने व निर्णय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप व ठाकरे गट फक्त एकमेकावर टीका करण्यासाठी संधी शोधत असतोय. त्यातच आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी थेट राणे कुटुंबावर निशाणा साधलाय. शिवरायांनाही स्वराज्य निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला होता. राज्यपालांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तर, राज्य तोडण्याचं काम भाजपानं केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता जाणार हे अगोदरच माहिती होतं. मात्र, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाईक यांनी राणे कुटुंबावर केलीय. ते कणकवलीतील श्रीधर नाईक चौक इथं शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेअंतर्गर जाहीर सभेत बोलत…
सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या आई होण्याचा आनंद घेत आहे. आपल्य लाडक्या मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी ती सोडत नाही. ती अनेकदा तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत ती तिचा चेहरा स्पष्ट दिसू देत नाही. त्यामूळे काही वेळा तिचे फॅन्स तिच्यावर नाराजही होतात. पण आज काही वेगळ चित्र पाहायला मिळतयं. प्रिंयकावर आणि तिच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. प्रियंकाने तिच्या चाहत्याची सकाळ गोड करण्यासाठी मालतीचा नवीन फोटो पोस्ट केलायं. बुधवारी पहाटे प्रियांकान इंस्टाग्राम स्टोरीवर मालती मेरीचा झोपलेला फोटो शेअर केलाय. याफोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या…
मुंबई : वृत्तसंस्था बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे, कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील आता आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहे. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवल, असा टोला राऊतांनी लगावला. संजय राऊत म्हणाले, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील इंधन दरवाढ दिवसेदिवस होतच आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा कमी अधिक प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर) मुंबई शहर …
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागातून २१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिन्यासह इतर वस्तूंची चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परीसातील हुडको येथील रहिवासी आशा रतनलाल जैन(वय ६०) या मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, दि ९ ते १३ रोजी दरम्यान अनोळखी इसमाने जैन यांच्या मालकीच्या १० ग्राम सोन्याची चैन, १ हजार रुपये किमतीचे सिलेडर यासह स्टीलची शेगडी घेत चोरी केली आहे. या प्रकरणी जैन यांनी रामानंद पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय सपकाळे हे करीत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ झाला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. एमएच १९ डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते चौधरी. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूच्या सिटवर बसलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, शेवटचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा देशाची राजधानी दिल्ली एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कालका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय. शाळेतील एका सफाई कामगारावर विद्यार्थिनीसोबत हा अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केलीय. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये. दिल्लीत याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर…
अभिनेत्री विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हि देशातील बड्या उद्योगपतीच्या प्रेमात पडल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ती सध्या भलतीच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. तिच्या प्रेमप्रकरणाची चाहुल आता नेटकऱ्यांना लागली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पृथ्वीराजमध्ये मानुषीनं प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. तिची ती भूमिका चाहत्यांना आवडलीही होती. मात्र प्रेक्षकांना सम्राट पृथ्वीराज काही भावला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठा धक्का बसला. तीनशे कोटींपेक्षा अधिक बजेट असणाऱ्या पृथ्वीराजच्या अपयशानं अक्षयही नाराज झाला होता. यासगळ्यात मानुषी मात्र भाव खावून गेली होती. https://www.instagram.com/p/ClQGW9RoWf7/?utm_source=ig_embed&ig_rid=76dbf0c5-2e1f-4cb8-aac6-47b583e3ad97 मानुषी सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा…

