पाचोरा : प्रतीनीधी पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलगी क्लासेसला जात येत असतांना २०२१ पासून ते आतापर्यंत नेहमी संशयित आरोपी प्रवीण गरुड(वय १९) याने मुलीला मी तुझ्यावर प्रेम करतो, अशी चिट्ठी लिहून देत तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Author: editor desk
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून तब्बल ३ लाख २४ हजाराच्या दागिन्यासह रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी एरडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल शहरातील कासोदा रोडवर असलेल्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये दि २३ रोजी मध्यरात्री कुळाच्या घराचे कुळ तोडून अनोळखी चोरट्यांनी शासकीय रेस्ट हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानात घुसत घरातील २ लाख ३४ हजाराची सोने व चांदीचे दागिने व ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आल्यानंतर प्रताप मदन बारेला यांनी एरंडोल पोलीस स्थानक गाठत घरफोडीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश अहिरे…
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय जवानाचा आपण नेहमीच कौतुक करीत असतो मात्र अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने लष्कराबाबत एक ट्विट केले असून, तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर बुधवार संध्याकाळपासून उपचार सुरु आहेत. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते. कमल हासन हे नुकतेच हैदराबादला गेले होते. तिथे त्यांनी त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथल्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बुधवारी दुपारी चेन्नईला परतले. मात्र संध्याकाळी बरे वाटत नसल्याने चेक-अपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आज डिस्चार्ज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सीमा प्रश्नी वाद आता चव्हाट्यावर आला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात संतापाचं वातावरण पसरलं आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकार कधी हि कोसळू शकते असे विरोधाकडून आरोप होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे खूप तणावात आल्यानंतर त्यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले.. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिर्डी येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने जाईल, अशी शक्यता असतानाच सगळ्या गाड्या अचानक सिन्नर तालुक्याच्या दिशेने वळाल्या. वावी गावातील मिरगावच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन नाका परिसरातून एकाची दुचाकी अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील नवीन नाका हिरापूर रोड येथील एका विद्यालयाजवळून शैलेश किसन शिरसाठ (वय २७) यांची दुचाकी क्र.एम.एच.१८.बी.पी.५५०८ हि दुचाकी अनोळखी चोरट्याने लांबविल्याची घटना दि २२ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.भूषण पाटील हे करीत आहेत.
औरंगाबाद : वृत्तसंस्था ‘मी मारायला पण घाबरत नाही आणि मरायला पण घाबरत नाही … मग कोण पण समोर येऊ दे..’ असे रात्री सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील दूध विक्रेेता तरुण कृष्णा दिलीप जाधव याचा तालुक्यातील निरगुडी-लिंबादेवी पुलाच्या जवळ बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी त्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असून ते पोलिसांना अहवाल देणार आहेत. अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे. पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील कृष्णा जाधव हा दररोज सकाळी घरचे दूध लिंबादेवी फाटा येथे…
सध्या देशासह राज्यातील विविध भागात डेंग्यूचा आजार मोठ्या झपाट्याने पसरत असून त्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो. असा ताप आल्यास रुग्णाला चांगली विश्रांती घेण्यास सांगितले जाते. तसेच लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशी अनेक सुपरफ्रुट्स आहेत, जी खाल्याने रुग्णाला या आजाराशी लढण्याची ताकद मिळते, तसेच रिकव्हरीचा वेगही वाढतो. 1) किवी डेंग्यू झालेला असताना किवी खाल्याने चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले कॉपर, हे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि संसर्गापासून संरक्षण करते. किवी हे फळ पोटॅशिअम, व्हिटॅमिन -ई आणि व्हिटॅमिन -ए यांचा समृद्ध स्त्रोत आहे. जे शरीराचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तुम्ही आतापर्यत भरपूर बातम्या बघितल्या असतील कि मुलाने मुलीची छेड काढली किवा विनयभंग केला पण हि बातमी वाचून तुम्हाला नक्की धक्का बसेल. पंजाबमधील एक अपहरण आणि लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं पंजाब हादरले आहे. जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्यावर मुलींनी बलात्कार केला असला तरी त्या व्यक्तीने अजून पोलिसात तक्रार दाखल केली नाही. या घटनेतील ज्या व्यक्तीवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या…

