Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहेत, कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे गट गुवाहाटीहून परतताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. तसेच, हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असे ताशेरेही ठाकरेंनी ओढले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून…

Read More

मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हटले. तसेच तिची वर्गात आणि रस्त्याने ये-जा करताना मुलांकडून छेड काढली जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्रस्त झालेल्या शिक्षिकेने अखेर पोलिस ठाण्यात तीन विद्यार्थ्यांविरूद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ‘I Love You’ इंग्रजी भाषेतील हे तीन शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीप्रती असलेले प्रेम व्यक्त करायचं असेल तर ती या शब्दांद्वारे व्यक्त होते. पण जर कोणी हे जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर तो अतिरेक वाटू लागतो. शिक्षिकेचा आरोप आहे की, त्यांच्या शाळेतील बारावीचे विद्यार्थी तिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात,…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  गेल्या दोन वर्षापासून मनसेचे पुणे शहरातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नेहमीच येत असतांना दिसून आला आहे. या वादामुळे जिल्हाध्यक्ष पदावर असलेले वसंत मोरे यांचे पद साईनाथ बाबर यांना देण्यात आले होते. पण पुन्हा आता मनसेचा वाद विकोपाला गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असतानाच आता मनसेतील नाराजीच्या चर्चा समोर आल्या आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  ठाकरे गटाची सुरु असलेली प्रभोधन यात्रा सध्या नाशिक येथे असतांना सुषमा अंधारे हे शिंदे गटातील आमदाराची भेट घेणार असून त्यांना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. शिंदे गटाला ठाकरे गट सुरुंग लावेल का हा प्रश्न लवकर सुटणार आहे ? यावेळी सुषमा अंधारे म्हणाले कि, मी येत्या 16, 17 आणि 19 डिसेंबर रोजी नाशिक, मालेगाव, नांदगावला जाणार आहे. कारण सुहास भाऊ (सुहास कांदे) आहे, दादा भुसे आहेत, या भावांना मी भेटायला येणार आहे. सुहास भाऊला विस्ताराने भेटणार आहे. निश्चित भेटणार आहे. अर्थातच मनमाडच्या सुहासभाऊलाच मी त्यांना भेटणार आहे, असं उपरोधिक विधान ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दोन दिवसांचा गुवाहटी दौऱ्यावर शिंदे गटा असतांना आज त्यांचा दौरा मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खोक्यांच्या मुद्द्यावरुनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी कालच्या बुलडाण्यातील सभेत शिंदे गटातील आमदारांना रेडे, खोके सरकार… असं संबोधल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव घेता टीका केली. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्येतून ते हे बोलत आहेत. सरकारबद्दल लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं शिंदे म्हणाले. आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की,…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे प्रचंड संतापल्या असून त्यांनी थेट निलेश राणे आणि नितेश राणे यांचे संस्कारच काढले आहेत. सुषमा अंधारे या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राणे कुटुंबावर हल्ला चढवला. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय तरुणाला मारहाण करीत मोबाईल लांबविल्याची घटना घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिंप्री येथील दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास नदीच्या पुलाजवळ एका दुचाकीवर तीन ते चार अनोळखीनी संदीप सुरेश बोरसे(वय ३२) या तरुणाला धक्काबुकी करीत त्याच्या जवळील ९ हजार ८०० रुपये किमतीचा मोबाईल घेवून पळून गेले या प्रकरणी संदीप बोरसे यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यकर निरीक्षक ह्या पदासाठी २०२१ या वर्षी झालेल्या परीक्षेत, चि.अनुराग सखाराम पाटील.शिरपूर जि.धुळे यांची राज्य कर निरीक्षक या पदासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निवड करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील गरताड येथील चि.अनुराग सखाराम पाटील यांचे वडील सखाराम उत्तम पाटील हे (शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना येथे) अकाऊंन्टट पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व आई प्रा.सौ.मंगला पाटील.(आर.सी. पटेल.अध्यापक विद्यालय शिरपूर येथे) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चि.अनुराग यास मिळालेल्या यशाचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षण मंत्री व विद्यमान विधान परिषद आमदार अमरिश पटेल, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  देशातील गुजरात राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असतांना पोरबंदर जिल्ह्यात जवानांच्या आपापसात झालेल्या चकमकीत भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जवान आपापसात का भिडले हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी तताडीने दखल घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ज्या सैनिकांमध्ये ही चकमक झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला, ते सैनिक निवडणूक ड्युटीसाठी आले होते, असे आढळून आले आहे. एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ मधून गोळीबार केला आहे. मात्र,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर आयात पक्ष म्हणून जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या छत्रपतींचा अपमान करायचा. महाराष्ट्रत येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कारण गुजरातच्या निवडणुका जिंकायच्यात. कालसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबलले. त्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. भीती याची वाटते. जसे उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. का? कर्नाटकच्या निवडणुका. आपले मिंदे मुख्यमंत्री शेपूट घालून बसतील. ठाकरे पुढे म्हणाले की, इकडचे…

Read More