मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्य सरकार व ठाकरे गटात नेहमीच वाद होत आहे. नियमित भाजपकडून किरीट सोमय्या तर ठाकरे गटाकडून संजय राऊत हे आपली बाजू मांडत रोज नवे दावे होत आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले कि, राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या आधी परिवर्तन…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेत लाखो नेत्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे. ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. १० जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत हात से हात जोडोचा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या माध्यमातून विधानसभेची तयारीही…
जळगाव : प्रतिनिधी मागच्या काळात ‘लव्ह जिहादचा’ कायदा सभागृहात आलेला आहे. मुख्यमंत्र्यापर्यत ही मागणी मी करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा पटलावर आलेला आहे. हिंदू म्हणून मी याच्यात अग्रेसर असेल तसेच पोलीस प्रशासनाला मी आदेश करतो. कि जिथे चुकीचे काम होत असेल तिथे कारवाई करावी. त्यासोबत धर्मातरबाबत म्हणाले कि आमच्या धर्माकडे कुणी वाकडी नजर करत असेल तर हिंदू म्हणून समोर येवू मला खुर्ची पेक्षा धर्म महत्वाचा असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. हिंदू युवती श्रद्धा वालकरचे आफताबने ३५ तुकडे केल्याचे प्रकरण शांत होता, तोच झारखंड राज्यातील रबिका पहाडन या हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारीने ५० तुकडे केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली…
मुंबई : वृत्तसंस्था आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंधन दरांमध्ये तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तब्बल सात महिन्यांहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घेऊया आजचे दर काय? आजचे कच्च्या तेलाचे दर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घट नोंदवली जात आहे. WTI क्रूड ऑइलची किंमत किंचित वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल 73.77 डॉलरवर पोहोचली आहे. घसरणीनंतर ब्रेंट क्रूड ऑईल 78.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीचा आज भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम झालाय का? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर. तेल कंपन्यांना सध्या प्रत्येक लिटर पेट्रोलवर 10 रुपये नफा मिळतोय, असं…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरातील मुख्य महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातामुळे नेहमीच जनतेचा जीव जात आहे. यावर कुठलाही उपाय योजना होत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी दि ६ रोजी अपघात झाल्यानंतर लागलीच अधिकाऱ्याची कानउघाडनी केली आहे. शहरातून धुळे हायवेलगत असलेले खोटे नगर, द्वारका नगर, आहुजा नगर या परिसरातील मुख्य महामार्ग लगत असलेल्या ठिकाणी सतत अपघात होत काही लोकांचा जीव जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांची सार्वजनिक बांधकाम व नही NAHI च्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करत जनआंदोलनाचा इशारा देत चांगलीच कानउघडणी केली आहे. जळगाव धुळे हायवेवर द्वारका नगर जवळ इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा…
मुंबई : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या एका विधानामुळे राज्यभर भाजपने आंदोलन करीत निषेध व्यक्त केला होता. त्यावर अजित पवार मी माझ्या वाक्यावर ठाम असल्याची भूमिका घेतल्याने हा वाद वाढत जात होता. मात्र यावेळी अजित पवारांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानभवनात हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं. त्यावरुन राज्यभरात निदर्शनेही झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे. पण आता अजित पवारांकडून पुन्हा वादग्रस्त उल्लेख झाला आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्याविषयी बोलताना,…
मुंबई : वृत्तसंस्था ५ रोजी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ? कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो खोटी माहिती चित्रा वाघ यांनी काल दिली तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार…
जळगाव : प्रतिनिधी जळगावात अपघाताची मालिका सुरूच आहे, नियमित कुठेना कुठे अपघात होत आहे त्यामध्ये दुर्दैवाने नागरिकांचा जीव जात आहे. नुकतेच रुग्णालयात दाखल पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या पत्नीला काही अंतरावरच मृत्यूने गाठले. गावातून बाहेर पडताच पायी चालत असलेल्या महिलेला रुग्णवाहिकेने धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी कुसुंबा गावात घडली. तालुक्यातील कुसुंबा येथील संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता पाटील या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह कुसुंबा येथे वास्तव्यास होत्या. दरम्यान कैलास पाटील यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संगीता…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपालंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून याच्याआधी देखिल झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून असचं झालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवप्रतिमा देताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांचा फोटो शेअर करत मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र…
मुंबई : वृत्तसंस्था संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये ‘माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची’, असे म्हणत पलटवार केलाय. 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचे कात्रण आपण जपून ठेवले असल्याचे वक्तव्य कणकवलीत आयोजित एका कार्यक्रमात नारायण राणेंनी केले आहे. आता संजय राऊत यांनी देखील त्यांच्याच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे म्हणाले, नारायण राणेवर बोलले की पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज होते. याचमुळे सामनाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते मी वकीलाकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणारा नाही दखल घेणारा आहे.…

