Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून यामध्ये नितीन निंबा राठोड (वय-24) व सचिन कैलास चव्हाण (वय-22) दोघ गंभीर जखमी झाले. यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरु आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहे. दरम्यान, या वादाच्या कारणावरुन रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सध्याचे युग दिवसेंदिवस प्रगती करीत असले तरी अद्यापही दिव्यांगत्व रोखणे शक्य नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने जन्माच्या अगोदरपासून अपंगत्व कळते. वेळीच उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगत्व रोखणे किंवा कमी करणे शक्य होते. उडानच्या प्रारंभिक बालविकास केंद्राच्या माध्यमातून हे पुण्यकर्म शक्य होईल, असे प्रतिपादन दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान प्रारंभिक बालविकास केंद्राचे लोकार्पण शनिवार दि.३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी, सोयो सिस्टीमचे किशोर ढाके, के.के.कॅन्सचे प्रमुख रजनीकांत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सातत्याने होत असलेले वादग्रस्त वक्तव्याची मालिका संपताना संपत नाही आहे. महाराजांबद्दल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, असा वक्तव्य त्यांनी केले. लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवरायांबद्दल वादाची मालिका काही खंडीत होत नसल्याने राज्यभर संतापाचे वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एकामागून एक भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं करीत आहेत. राज्यपालांच्या विधानानंतर तर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. त्यावरुनच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक विधान केलं आहे.गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवरायांच्या बाबतीत कोणत्याही ‘मायच्या लाल’ला बोलण्याचा अधिकार नाही. मग कुणीही असो. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो. छत्रपती हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही. ‘मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण राज्यपालांना सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो… चुकीला माफी नाही” असा इशाराच त्यांनी दिलाय. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. शिवरायांचा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  नागपूर येथे महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून शहरातील श्रीराम नगरातील योगेश विजयकुमार चौधरी (वय २१) याचा  संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा तरुण नागपूर येथे डिप्लोमा अभ्यासिकेचे शिक्षण घेत होता. योगेश हा युवक नागपुरातील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तो गंभीर जखमी झाला. सुरक्षा रक्षकांना त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. योगेशच्या मृत्यूची माहिती त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या वडिलांना आल्याने कुटूंब हादरले. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी मदत केली. मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष रवी ढगे, पप्पू पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव पाटील, वासुदेव…

Read More

आपण नेहमी फळांच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न्न्न करीत असतो, संत्री हे फळ अनेकांना आवडते. संत्र्यांचा ज्युस पिऊन अनेक लोक दिवसाची सुरुवात करतात. संत्री हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक संत्री खाल्यानंतर त्याचे साल फेकून देतात.पण संत्रीचे साल न फेकता तुम्ही त्याचा वापर करु शकता. संत्रीप्रमाणेच संत्रीचे साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊयात संत्रीच्या सालाचे फायदे संत्रीच्या सालामध्ये असतात पोषक तत्वे फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते. संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते. तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी खोटेनगरजवळील हॉटेल राधिका समोर घडली. सचिन चंद्रकांत फेगडे (४२, रा. शंकरराव नगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. टँकरचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. शंकरराव नगरात सचिन फेगडे हे पत्नी, मुलगी व भावासोबत वास्तव्यास होते. बांभोरीजवळील एका कंपनीत ते नोकरीला आहेत. शुक्रवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते दुचाकीने घरी निघाले. खोटेनगरजवळील राधिका हॉटेलसमोर ओव्हरटेक करणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते दुभाजकावर आदळल्याने तसेच टँकर त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी बोलावली होती. त्या बैठकीत विविध विकास कामाबाबत चर्चा झाली त्याचबरोबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुर्णाकृती स्मारक उभे करण्यात यावे अशी चर्चा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केली. त्यावरून मंत्री महोदयांनी तात्काळ मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकर मार्गी लावा असे आदेश दिले.त्याप्रसंगी अँड.संजयभाऊ महाजन,शिरिषआप्पा बयास,पी.एम.पाटील सर,माधुरीताई अत्तरदे,सौ.अंजली विसावे,पप्पू भावे,कैलास माळी सर,वासुदेव चौधरी,विजय महाजन,ललित येवले,कडुअप्पा बयास,भालचंद्र माळी,विलास महाजन,गुलाबराव मराठे,अहमद पठाण,नंदकिशोर पाटील,भूषण धनगर,अजय चव्हाण,श्रीमती उज्वला पारेराव इत्यादी उपस्थित होते.

Read More

धरणगाव  : प्रतिनिधी शहरातील महात्मा गांधी उद्यान आबालवृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून येणाऱ्या काळात अद्यावत स्विमिंग टॅंक उभारणार आहे. उपजिल्हा रुग्णालय व शासकीय विश्रामगृह साठी प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला असून लवकरच मंजुरी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ! घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे दिव्यांग मेळावा व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील नेते मंडळींनी केलेले वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी आता राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याने आता त्या मंत्र्यावर कारवाईची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. काय होते प्रकरण ? शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं होतं. अब्दुल सत्तार यांना पदावरून काढण्याची मागणी झाली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं होतं. या संदर्भात माहिती राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्याबाबत…

Read More