Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  अवघ्या अडीच वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले दाम्पत्य बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मोर्शी- रिद्धपूर-शिरखेड मार्गावर झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले. यादरम्यान त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेला त्यांचा एक वर्षीय एकुलता एक चिमुकला बचावला. त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगरमधील छोटू उर्फ पीयूष दिगंबर वाठोडकर (३०) आणि प्रतीक्षा वाठोडकर (२५) हे पती-पत्नी एक वर्षीय श्रीयंश नामक चिमुकल्यासमवेत निंभी या गावी मित्राच्या दुचाकीने गेले होते. तेथे प्रतीक्षाच्या माहेरकडील कार्यक्रमात या दोघांनीही आपली हजेरी लावली. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांच्या दुचाकीला मध्येच अज्ञात वाहनाने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान फिल्मी दुनियेत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जाते. आमिर खान जितका त्याच्या चित्रपटामूळं कमी आणि त्याच्या लव्ह लाईफमुळेही नेहमी चर्चेत असतो. आमिर खानने दोन लग्नं केली आहेत पण आजच्या काळात तो स्वत:ला सिंगल असल्याचं सांगतोय. मात्र अजूनही तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. सध्या आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव बरोबर त्याच्या प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये कलश पुजा करताना दिसत आहे. त्या कलश पुजेवरून आमिर खान ट्रोल तर होत आहे. त्यातच त्यांचा डिव्होर्स झाला आहे की नाही? हा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. कारण तो तिच्या सोबत दिसतं आहे. मात्र किरण ही त्यांची एक्स…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्रातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर अवश्य तोडगा नक्की निघणार आहे. अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते काढतील. असे किती बोम्मई त्यांनी पाहिले असतील. मोदी आणि शहा बोम्मईंना सरळ करतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून आक्रमक ट्विट केलं. महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. तर लवकरच कर्नाटकचे शिष्टमंडळही अमित शहांची भेट घेणार असल्याचं बोम्मई म्हणाले. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हमाले, ‘ अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही…

Read More

विजय पाटील : जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत जरी सहा आमदार चार माजी आमदार निवडणुकीत एकनाथराव खडसे विरुद्ध गिरीश महाजन अशी पाहिजे. जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ४४१ मतदार आहे. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत आहे. सहकार पॅनलची…

Read More

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस विशेष महत्वाचा आहे. त्यामध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल. शनिवारी पिंपळाच्या 11 पानांचा हार बनवावा. आजवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. हार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी एकाला अटक केली. विशाल संजय पवार (२१, रा. मेहरुण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रामेश्वर कॉलनीमध्ये ४ डिसेंबर रोजी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी तुषार सोनवणे, प्रतीक पांडुळे, दादू सपकाळे, नयन यवले, विशाल सोनवणे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा झाला होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या विजयसिंग पाटील, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, अक्रम याकुब शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर यांनी प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयित विशाल पवार याला सापळा रचून अटक केली. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात जरी थंडी वाढत असली तरी व्यापार क्षेत्रामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारासह, भारतीय वायदे बाजारात मात्र ग्राहकांना थंडीतहि चांगलाच घाम फोडला आहे. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीच्या सत्रात 0.14 टक्के तेजी दिसून आली. तर वायदे बाजारात चांदीने ही कमाल केली. चांदीच्या भावात आज 0.68 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीचे दरांनी आगेकूच केली होती. शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात सकाळी 9:20 वाजता, कालच्या बंद भावानंतर 73 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज सोन्याचा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील विरोधी पक्ष प्रत्येक शहरातील रस्त्यासाठी आक्रमक होत आंदोलने करीत आहे तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर चक्क रस्त्याचे दोन भाग झाल्याचे दिसून आले आहे. धरणगाव तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आलेले आहे. या रस्त्याने जाणारे प्रत्येक नागरिक या रस्त्याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण या मुख्य रस्त्याच्या मधोमध एक मोठी भेग पडली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अळकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला या ठेकेदाराने मुरूम देखील टाकलेला नसल्याने आरोप शेतकरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दि 9 रोजी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका कर्मचाऱ्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचून लिपीक शशिकांत नारायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाची यात्रेची जबाबदारी नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे असतांना ते राज्यभर बाळासाहेबांचे विचार मांडत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आता अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले कि, राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे, यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांना बोलता…

Read More