Author: editor desk

बॉलीवूडमध्ये नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणारी व बॉलीवूडचे बिग बी शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी लोकप्रिय आहे. आता तिचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. सध्याचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली हे एका पार्टीमध्ये होते. तिथुन बाहेर पडल्यावर एकाच गाडीमध्ये त्यांना पापाराझ्झींनी स्पॉट केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन आता वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या नवेली नंदा ही तिच्या हटकेपणासाठी ओळखले गेले आहे. https://www.instagram.com/reel/CmBEHfjIC2f/?utm_source=ig_embed&ig_rid=b83ea10b-4d79-4ffe-bd92-90608e6f5a3e नव्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नेहमीच आपल्या ढंगात वावरताना व विचित्र फॅशन सेन्स आणि नवनवीन फॅशनच्या अविष्कारमूळं ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमचं नाही तर चिकट टेप, मोबाइल फोन, सायकलची चेन बनवलेल्या फॅशनमध्ये पाहिले आहे. आता उर्फी विरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अली काशिफ खान देशमुख या वकीलाने शुक्रवारी लेखी अर्ज जमा केला. ज्यामध्ये उर्फीवर कथितपणे अवैध आणि अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे चार महिन्यापूर्वी काम केले होते. आणि या रस्त्यावर आता मोठी भेग पडून रस्त्याचे दोन भाग झाले आहे. ठेकेदाराने निकृष्ठ काम केल्याचा आरोप परिसरातील गावकऱ्यांकडून केला जात आहे. धरणगाव तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आले होते.परंतु या रस्त्याने जाणारे येणारे नागरिक आता तर या रस्त्याचे काम केले होते आणि चार महिन्यातच रस्त्याचे दोन तुकडे झाल्याचे आश्चर्य व्यक्त करत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस डबल धमाका दिवस ठरला आहे, कारण आज शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यातच अनिल देशमुख तब्बल 13 महिन्यांनी दिलासा मिळाला आहे. कथित 100 कोटी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले होते त्यानंतर जामीन की जेल असं सुनावणीदरम्यान प्रश्न असायचा. अखेर अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. ईडीने ज्या प्रकरणात त्यांना अटक केली होती त्या प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात. अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. काय आहे नेमकं प्रकरण? सचिन वझेकडून गृहमंत्री अनिल देशमुख असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी करण्याचे असा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप मुंबईचे माजी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ६२ वर्षीय भूपेंद्र पटेल सोमवारी दुपारी 2 वाजता गुजरातचे 18वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटीदार समाजातील एकमेव नेते, जे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. 15 महिन्यांपूर्वी विजय रुपानी यांच्या जागी त्यांना राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय भाजपशासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. यातील बहुतांश नेते रात्रीच अहमदाबादला पोहोचले आहेत. याशिवाय संत-महंतांसह दोन हजारांहून अधिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना म्हणजे ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव जिथे तिच खरी शिवसेना आहे. ठाकरे गट बिट हे काही आम्ही मानत नाही, शिंदेंचा गट आपण म्हणू शकतो असे म्हणत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर मेहरबाणी म्हणून त्यांना वेगळा गट आणि चिन्ह दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीवर थाप दिली, ती शिवसेना फोडल्याबद्दल शाब्बास अशी असावी का असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. जे औरंगजेब, अफजलखानाला जमले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सध्या देशभरात वाढत असलेली गुन्हेगारीचे जाळे आता कोणत्याही गोष्टीला न घाबरता बाहेर येत आहे. जयपूरमध्ये एक अजबच प्रकार समोर आलाय. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी बायकोचा भूतकाळ एका नवऱ्याला कळला. लग्नाआधी तब्बल 7 वर्ष आपल्या बायकोचे दुसऱ्याच तरुणाशी संबंध होते, हे पतीला कळलं. त्यानंतर पती थेट पोलीस स्थानकात गेला. पण पोलीस स्थानकात जाण्याआधी पतीला बायकोच्या प्रियकराने धमकावलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. ‘तुझी बायको माझी प्रेयसी आहे, तिला माझ्याकडे पाठवून दे’, अशी धमकी पतीला देण्यात आली होती. अखेर पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागूत पती मुरलीपुरा येथील पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी २ राउंड गोळ्या झाडल्या. यानंतर रात्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचा रविवारी अंतिम सामना संपल्यावर तरुणांचा मोठा जमाव बाहेर पडला. नेमके याच वेळी दोन गटात वाद झाला. त्यात एकाकडून गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी तिघांनी जीव वाचावीत पळ काढल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि कर्मचारी पोहचले. घटनास्थळी एक ट्यूब लाईट फोडलेली आढळून आली.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या वक्तव्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजासारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखलाही त्यांनी दिलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे!, असं पत्र कोश्यारींनी अमित शाहांना लिहिलं आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नार्थं महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज, बांभोरी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराथी, आ. एकनाथराव खडसे जिल्हा बँकेचे चेअरमन श्री गुलाबराव देवकर, जेडीसीसी संचालक डॉ. सतिष पाटील, आ.श्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. श्री रविद्रभैय्या पाटील यांच्यासह प्रमुख नेते व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यात इ.१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरींग तसेच सर्व शाखेतील पदवीधर विद्याथ्र्यांसाठी देशभरातील नामांकीत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी…

Read More