नाशिक : वृत्तसंस्था नाशिक – पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर भीषण अपघात झाला. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघातानंतर एस टी बसने पेट असल्याने जळून खाक झाली आहे. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याचे समजते आहे. नाशिकच्या औरंगाबाद चौफुलीवर घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नाशिक शहरात घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिंदे पळसे टोल नाका…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालूक्यातील धानोरे येथील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन सरपंच भगवान आसाराम महाजन यांनी या सप्ताहाचे आयोजन केले असून तर दि ८ रोजी सप्ताह सांगतेला जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभली. यावेळी कीर्तनकार ह.भ.प.गोविंद महाराज पंढरपूरकर यांच्या काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना पालकमंत्री पाटील हे त्यांच्या कीर्तनात मंत्रमुग्ध झाले होते. यानंतर ह.भ.प.महाराज यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाटील यांनी सरपंच भगवान महाजन यांनी आयोजित केलेला धार्मिक कार्यक्रम तालुक्यातील भाविकांसाठी मोठी मेजवानी असल्याचीही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. विहिरीला पाणी लागले कि पाणी भरत असते तसे भगवान महाजन यांचे कार्य सुरूच असते, त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर किरकोळ कारणातून मारहाण केल्याप्रकरणी मारवाड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली होती. यातील फिर्यादी पती व पत्नी हे जखमी असल्याने त्यांनी उपचार घेतल्यानंतर याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. गोकुळ आनंदा बच्छाव (एकतास, ता. अमळनेर) व दुर्योधन निंबा वाघ यांच्यात शेतात जाण्याच्या वहिवाटेवरून वाद सुरू आहे. या वादातूनच २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायतीजवळ बच्छाव हे बैलगाडीने शेतात जात असताना त्यांना आरोपींनी शिवीगाळ करून हातातील काठीने मारहाण केली. तसेच गोकुळ यांच्या पत्नीला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंगही केला. दरम्यान, या मारहाणीत गोकुळ बच्छाव व…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरासह परिसरातील गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत बुधवारी आदेश काढले आहे. पाचोरा शहरासह जवळच्या गावांमध्ये दहशत माजविणारे सलमान बल्लू, पिंजारी (वय २३), शाहरूख शेख लाल शेख (२६) आणि शेख फिरोज शेख नाझीर पिंजारी (३०, सर्व रा. कुर्बान नगर, पाचोरा) यांच्या विरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पाचोरा शहरात शांतता अबाधित राहावी, या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तिघांचा हद्दपारचा प्रस्ताव मंजूर करून तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे.
मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातूनच परक्या लोकांपेक्षा हल्ली जवळच्या लोकांवरचाच अनेकांचा विश्वास उडाला आहे असं म्हटलं तर खोटं ठरू नये कारण असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडलेला पाहायला मिळाला आहे. आपल्या सख्ख्याच मुलानं व सुनेनं आपल्या जन्मदात्या आईची फसवणूक केली आहे. हिंदी-मराठी मालिकांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे सध्या अनेक गुन्हेगारीचे प्रकार पाहायला मिळत आहेत. सध्या पैसा हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे आजकाल लोकांच्या पैशांची फसवणूकही केली जाते आहे. अशा परिस्थितीत आपल्याला परक्या लोकांसोबतच काय पण आपल्या आप्तांशीही कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वत:च्या आईची मुलगा…
मुंबई : वृत्तसंस्था संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री शिंदेंना षंढ हा शब्द वापरल्याने शिंदे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी चक्क राऊत यांना इशाराच दिला आहे ते म्हणाले कि, संजय राऊत नुकतेच साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना बाहेरचे वातावरण सुट होत नाही, असे दिसत आहे. ते जर असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येईल. आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी…
जळगाव :प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदी येथून वाळू वाळूचा उपसा करुन शहरात येत असलेल्या ट्रॅक्टर हे कारवाईच्या भितीपोटी चालकाने भरधाव वेगाने हाकत असतांना पुढे चालणार्या तीन ते चार वाहनांना उडविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी खोटे नगर जवळील वाटीका आश्रमजवळ घडली. यामध्ये पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाल्याने पोलिसांन ट्रॅक्टर जप्त केले आहे. गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर कारवाईच्या भितीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवितात. मंगळवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगावकडे येत…
धरणगाव : प्रतिनिधी पथराड खुर्द येथे सोमवारी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. ए. पाटील यांनी काम पाहिले. माजी सरपंच सुनीताबाई निकुंभ यांनी २० महिने सरपंचपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नूतन सरपंचपदी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच सुनीताबाई प्रवीण निकुंभ, माजी उपसरपंच मीराबाई पाटील, नवीन उपसरपंच सिंधुबाई शिवाजी निकुंभ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण, गजानन बन्सीलाल पाटील, सावित्रीबाई भीमा सोनवणे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी पी. ए. पाटील, तलाठी कांचन वाणी, ग्रामसेवक…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील मूक व बहिरी युवतीची तीन अनोळखी इसमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात दि ४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील एक २५ वर्षीय युवती हि पाण्याच्या टाकीजवळ असता यावेळी ३ अनोळखी इसम दुचाकीवर येत या युवतीच्या डोळ्यावर मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली, तेथून या युवतीला धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. यावेळी हि घटना घडली असल्याचे लक्षात आले त्यानंतर मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा ३ अनोळखी इसमावर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगरातील तरुणाने महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना 4 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार कांतीलाल मोहन पवार (वय 28) रा. समतानगर हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. हात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आईसोबत कामावरून येत असताना दुकानावर जोतो असे आईला सांगून गेला. त्यानंतर महाबळ रस्त्यावरील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर जावून तेथून त्याने उडी घेत आत्महत्या केली. या…

