जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका सिनेमा टॉकीज परिसरात असलेल्या दुकानात एक ४२ वर्षीय महिला खरेदी करत असताना तीन संशयित आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिळालेली माहिती अशी की, शहरातील अशोक टॉकीज जवळील एका दुकानात दि १८ रोजी संध्याकाळच्या सुमारास ४२ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसह खरेदी करण्यासाठी गेली असता. झिरो बल खरेदी करीत असताना संशयित आरोपी रईस बागमार याने फिर्यादी महिलेचे एकेरी नाव घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यासह संशयित आरोपी नवीन आसिफ बागवान, शिबान रईस बागवान या तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून तरुणासह आईला चारचाकीची धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी असलेल्या अतुल रविद्र सोनवणे हा तरूण दि १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीची जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार देवून आई सोबत दुचाकीवर घरी जात असतांना शिवाजी नगर उड्डाणपूल उतरत असतांना संशयित आरोपी दीपक दगडू भोई व अरविंद शिंदे या दोघांनी त्याच्यामागून चारचाकी क्र.एम.एच.३०ए.एफ.८७३४ पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात आणत दुचाकीवर असलेले अतुल सोनवणे व…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत भारत जोडो विषयी म्हणाले, भारत कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. त्यामुळे शिवसेनेची पाऊले उमटली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत सहभागी होऊ. 2 दिवस जम्मु काश्मिरला जाणार आहे. त्याठिकाणी हजारो काश्मिरी पंडीत सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास…
पुणे : वृत्तसंस्था पहिल्या पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन हत्या करीत आरोपी पती हत्येनंतर फरार होवून ओळख लपवण्यासाठी नाव बदलुन दुसरा विवाह करून वेगवेगळ्या गावात राहिला पण तब्बल 28 वर्षांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. एखाद्या चित्रपटाची वाटणारी ही कथा पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. 1 फेब्रुवारी 1995ला सुशीला कांबळे यांची पिंपरी चिंचवडमध्ये हत्या झाली होती. पती रामा कांबळे हत्या करुन पसार झाला होता. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळनूर पांढरी या गावचा. तिथे पुणे पोलीस बरेच दिवस सापळा रचून बसले होते. पण तो पोलिसांच्या हाती लागलाच नाही. काही महिन्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं. येत्या 1 फेब्रुवारीला या हत्येला 28 वर्ष पूर्ण होणार होती. दरम्यान…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे जळगाव शहरामध्ये गल्लो गल्ली रस्ते आंदोलनला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात जिल्हा पेठ भागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील रस्त्याची वाईट परिस्थिती खराब झाली आहे. दुकानदार आणी नागरिक धुळेने त्रस्त झाले आहेत, कंबर दुखीचा त्रास वाढला आहे. यासह शहरातील विविध समस्याबाबत आज मनसे आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केले. मनसेने नवीन रस्ता बनण्यासाठी पाठपुरवठा करित असून, महानगपालिका ला अजून जाग आली नाही तरी मार्केट समोरील रस्ते लवकरात लवकर झाले पाहिजे, न झाल्यास आता मनसे त्यांच्या स्टाईल ने जवाब…
मुंबई : वृत्तसंस्था देवदर्शनासाठी पंढरपूरला जाणारी भाविकांची बस हुलजंती ते मंगळवेढा रोडवरील येड्राव फाटा येथे पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत, हा अपघातात सकाळी बुधवारी दि १८ जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील खासगी ट्रॅव्हल्स बस क्र.UP-FT-8283 मधून काही भाविक देवदर्शनाला निघाले होते. हे भाविक कर्नाटकातील देवदर्शन उरकून पंढरपूरला निघाले होते. यादरम्यान हुलजंती ते मंगळवेढा रोडवर येड्राव फाटा येथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या दुर्घटनेत 1 जण ठार, तर इतर 36 जण जखमी…
धरणगाव : प्रतिनिधी दिनांक 14 जानेवारी महसूल विभागामार्फत भरविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत धरणगाव तहसिल कार्यालयातील चमूने सामाजिक समस्यांवर ‘माझ्या देशबंधावानो’ ही एकांकिका बसवून सामाजिक संदेश दिला. यात महिला सबलीकरण,भारतीय संस्कृती आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर एकांकिका सादर केली. यात धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी शिवा नावाच्या तरुणाची अफलातून भूमिका सादर करून हा तरुण समाजातील जाचक गोष्टींवर बोट ठेवताना नाटिकेत दाखविण्यात आला.सोबतच धरणगाव येथील कर्मचारी पंकज शिंदे,संजय ब्राहमने,तलाठी भागवत पवार,वीरेंद्र सोनकांबळे,राहुल ढेरंगे,सचिन कलोरे,रोशनी मोरे,कांचन वाणी,कोतवाल धनराज भोई,राहुल शिरोळे,ज्ञानेश्वर माळी यांनी उत्तम भूमिका निभावल्या. या एकांकिकेचे लेखन दिगदर्शन तहसीलदार देवरे यांनी केले आहे. सदर नाटिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी…
मुंबई : वृत्तसंस्था चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर आज सुनावणी होती. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज परळीमध्ये दाखल झाले. परळीत पोहोचताच त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत झालं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. सुनावणीनंतर हे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं गाव पांगरी आहे, जिथे राज ठाकरे आले आहेत. याच भागामध्ये गोपीनाथगड असून वैजनाथ साखर कारखानाही याच…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे दोघांवर सोशल मिडीयावर चर्चा व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ शकतो. कारण या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पाली हिल्स बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. केएल राहुलचे पाली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले गेले आहे. सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेत्या मुंडे यांनी शिवसेनेत यावे असे आमंत्रण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना वारवार दिले असतांना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आता भाजपवर हल्लाबोल करीत पंकजा यांना धीर दिला आहे. अंधारे म्हणाल्या, “ज्या बायकांना चळवळीचा बेस नाही त्यांना भाजप राजकारणात आणतंय. पंकजा मुंडेंचा मास बेस आहे. मराठवाड्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. भाजपच्या अनेक जागा या पंकजा मुंडे यांच्यामुळं निवडून आल्या आहेत. मोनका राजळे, नमिता मुंदडा, बुलढाण्याची जागा असेल अशा अनेक जागा पंकजा मुंडेंमुळं निवडून आल्या आहेत हे त्रिवार सत्य आहे” या पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप ज्या बायकांना चळवळीचा बेसच नाही त्यांना पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय.…

