पुणे शहरात गेली अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हत्येचे प्रमाण देखील वाढल्याचे समोर आले, असाच पुण्यात एका हाणामारीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येरवड्यात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली.हातात काठ्या घेऊन एकमेकांना हाण्यात आले. भर रस्त्यातील फ्री स्टाईल हाणामारी प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. येरवड्यातील दृश्य पाहून हे पंजाब असल्याचे वाटत होते. या प्रकाराणे येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा लाठी आणि काठ्यांचा नंगानांच सुरु…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
अर्जुन खोतकर या दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश , पहा माहिती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी अब्दुर सत्तार यांच्या उपस्थित भेट घेतली. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले.अर्जुन खोतकर हे आपण शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे म्हटले होते. यावर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. खोतकर यांनी EDची नोटीस आल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदल्याची चर्चा आहे. ईडीची कारवाई वाचविण्यासाठी खोतकर हे आता शिंदे गटात सामील होणार आहे . राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा आता नेम नाही. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले…
नागपुरात खळबळ उडाली आहे. एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारावेळी अग्नी देताना आगीचा भडका उडाला. यावेळी तिथे असलेले तीन जण जखमी झाले. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी नागपूर कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे स्थानिक रहिवासी सिद्धार्थ हुमणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेले असता त्यावेळी अग्नी देताना हा प्रकार घडला. आगीत तीन जण गंभीर होरपळले. अग्नी देण्यासाठी डिझेलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे डिझेलचा भडका उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दिलीप गजभिये आणि…
जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार कोसळले. या बंडातील सर्व आमदारांनसह खासदारांनी हिंदुत्वाचं कारण देत शिंदे गटात सामील झाल्याचं म्हटलं होतं. बंडखोरांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकरमधील मंत्री अब्दुल सत्तार देखील सामील होते. सत्तार देखील हिंदुत्वासाठीच बंडखोरांसोबत गेले का, असे खोचक प्रश्न विचारण्यात येत होते. सत्तार यांचे नाव नव्या मंत्रींडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक नेते मंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असून सत्तार देखील त्यासाठीच गेल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार हे मंत्री होते मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना…
जळगाव प्रतिनिधी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.तर सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही राज्याची परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात देखील केंद्रीय अन्वेषण विभागाला महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. ठाकरें सरकारने सत्तेवर असताना सीबीआयबद्दल घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याने ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता. महाराष्ट्रासह पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, केरळ व मेघालय या राज्यांतही सीबीआयला सर्वसाधारण संमती दिली गेलेली नाही. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय असा वाद निर्माण झाला होता. तर महाराष्ट्र…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सुप्रिम कॉलनीतील दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजाराची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कृष्णा चव्हाण रा. रायपुर ता. जि. जळगाव याला गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रिम कॉलनी विठ्ठल मंदिर चौकात अशोक सुभाष शिंदे (वय-२८) हा तरुण किराणा दुकान चालवून उदनिर्वाह करीत होते. बुधवार २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अशोक यांचा भाऊ विकास हे दुकानात होते. यावेळी ते घरात पाणी पिण्यासाठी गेले असता, सामान घेण्यासाठी आलेला ग्राहक कृष्णा चव्हाण यांनी दुकानाच्या…
जळगाव प्रतिनिधी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तापदी विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांमध्ये मराठीतून कामकाज करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा सर्वाधिक उपयोग करण्यात यावा तसेच एफआयआर, आरोपपत्र आणि अहवाल हा मराठीतूनच तयार करण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांना दिले आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांना पाठवला जाणारा…
प्रविण पाटील प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. यात म्हसावद बोरनार गटाचे आरक्षण सर्वसाधारण ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या गटात भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे गट याच्यावतीने इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. यात म्हसावद-बोरणार गटासाठी सर्वसामान्य ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत…
जळगाव प्रतिनिधी सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात मतिमंद तरुणीला ओळखीच्या व्यक्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची पित्तखवळणारी घटना घडली आहे. यात एकास अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्याला 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला. सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात संबंधित मतिमंद तरुणी राहण्यास आहे. मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. 25 जुलै दुपारच्या सुमारास घडली. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज ऊर्फ अहमद शेख हा घरी येत असे मतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.सोमवारी दुपारी नराधम हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील समता नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरत रमेश आंबेकर (वय-४०) रा. समता नगर,जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, भरत आंबेकर हा पत्नी सविताबाई व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २८ जुलै रोजी भरतची पत्नी सविताबाई ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले शाळेत गेले होते. त्यामुळे घरी एकटे होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.…

