लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या पदांची नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ही शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रंही आज देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेली पण आता पक्षही हातचा जातो का अशी परिस्थिती सध्या झाली आहे. खरी शिवसेना कुणाची? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशापरिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिलाय. शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २७ जुलै रेाजी दुपारी धुळे शहरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत.योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर, पारोळा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरात एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता छापेमारी केली. यात गावठी हातभट्टीचा अड्डा उध्दवस्त करून सुमारे तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या वेगवेगळ्या पाच पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीची गावठी दारू बनविण्याचे साहित्य…
एकनाथ शिंदे गटातील राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन नवीन निर्णय जाहीर करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. गणपती उत्सव काळात राज्यभरात मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील केसेस रद्द करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केलीय.तसेच पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावेळी ते…
जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16 हजारांहून रूग्ण समोर आली आहेत. इतर देशासह मंकीपॉक्सचा भारतातही प्रसार होत आहे. अलीकडे, केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर, दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतात मंकीपॉक्सची प्रकरणे येऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिला आहे. मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करून, ने सर्व देशांना गंभीर होण्याचे आवाहन केले आहे.ताप आणि अंगात फोड आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत सरकारने मंकीपॉक्सबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. तीव्र ताप, थकवा, कंप सुटणे आणि अंगभर जखमा अशा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रेल्वे स्थानकाजवळील जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून…
जळगाव प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघांनी दहशत माजवली आहे.गडचिरोलीत आणखी एकाचा वाघाच्या भ्याड हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हात एकच खळबळ माजली आहे. गडचिरोलीतील दिभना जंगलाच्या आवारात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. नीलकंठ गोविंद मोहर्ले असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. वाघाच्या या हल्ल्यात शेतकरयाचा जागीच मृत्यू झाला. लाकडं आणण्यासाठी हा शेतकरी जंगलात गेला होता. त्यावेळी लपून बसलेल्या वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवला . शेतातून परतात असताना एकटाच जंगलातून असल्याचे त्यावेळी वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. शेतकरी एकटाच असल्याने वाघाच्या तावडीतून बचाव करता आला नाही. वाघाने झडप घालून शेतकऱ्याला रक्तबंबाळ केलं. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यानंतर शेतकऱ्यांचा जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला…
जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या दिल्यात शुभेच्छा.त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुआहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिकांची गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी हजर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना,उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. . शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शुभेच्छा खोचकपणे दिली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तीर्थक्षेत्र आळंदीत मागील आठ दिवसात डंपरच्या धडकेने दोन मोठे अपघात घडले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधितांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे दोन्ही निष्पाप जीव गेल्याचे समजले आहे. आळंदीत पहिल्या अपघातात एकोणीस वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू झाला. तर सोमवारी (दि.२५) दुसऱ्या अपघातात अवघ्या चार वर्षीय चिमुकलीचे जीवन बहरण्याआधीच समाप्त झाले. वास्तविक दोघांचीही कुठलीही चूक नसताना त्यांना हे जग सोडून जावे लागले आहे. निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून . आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रस्ते चांगल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज विशेष: कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. 26 जुलै 1999 याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. या दिवशी दहशतवाद्यांना कठोर धडा शिकवताना भारताच्या बलाढ्य रणांगणांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता. या युद्धात अनेक योद्धे शहीद झाले, परंतु आपल्या अदम्य साहसाच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रू पाकिस्तानचे उधळून लावले. युद्धात बलिदान देणाऱ्या देशाच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ कारगिल दिन किंवा ‘कारगिल…

