भाजप-शिवसेनेचे हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कार्यरत आहे. आता केंद्र सरकारचाही पूर्ण पाठिंबा असल्याने राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रविवारी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आता विकासाची कामे फायलींमध्ये अडकणार नाहीत. त्यामुळे राज्याच्या विकास कामाला गती येईल. जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा विषय असेल किंवा नसेल, पण चर्चा करून मार्ग काढू, असे सांगूनही युती करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जाणारा निधी, शिवसैनिकांचे झालेले खच्चीकरणला वाचा फोडण्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे शिंदे म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्ते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा पुरूषोत्तम वाघ (वय-२३) रा. धानवड ता. जि.जळगाव असे मृत तरूणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गा वाघ ही तरूणी आपल्या कुटुंबियासह जळगाव तालुक्यातील धानवड येथे वास्तव्याला होती. शनिवारी ३० जुलै रोजी दुपारी घरी कुणीही नसतांना तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले. दरम्यान, हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत…
जळगाव प्रतिनिधी । जळगावात मुलीला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील वयोवृध्दाला तीन जणांना रिक्षात बसवून मेहरूण तलावाजवळ नेत चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाइल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, उत्तमराव नामदेव वाघ (वय-७८) रा. द्वारका, नाशिक हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते रेल्वे विभागात सिनीयर सेक्शन इंजीनीयर या पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तमराव वाघ हे शुक्रवारी २९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगावात रेल्वेने आले. मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रिक्षाने बसले. रिक्षात आगोदर दोन जण बसले…
रावेर प्रतिनिधी । निंभोरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तांदलवाडी गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंभोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना गावातील आशिश सुनिल कोळी याने काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोठेही आढळून आले नाही. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिश कोळी याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात २६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनक रामकुमार कुकरेजा याने महिलेला फोन करून त्याच्या घरी काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत महिलेशी अंगलट करत हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. महिलेने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी रौनक रामकुमार…
धुळे प्रतिनिधी । जिल्ह्यातील तामसवाडी येथून विवाहिता ही चौदा वर्षाचा मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनगिर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश वसंत बोरसे (वय-४०) रा. तामसवाडी ता.जि.धुळे हे पत्नी सपनाबाई व मुलगा उदय यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ जुलै रोजी दिनेश यांची पत्नी सपनाबाई बोरसे ह्या घरात कुणालाही काहीही न सांगता मुंबई येथे बचत गटचा मोर्चा असल्याने मुलगा उदय बोरसे याला सोबत घेवून गेल्या. त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता काहीही माहिती मिळाली नाही व मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. अधिक…
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. रविवारी चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची काल सकाळपासून चौकशी सुरु होती. संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाखांची कॅश सापडली आहे. ED ने छापेमारीदरम्यान ही कॅश जप्त केली आहे. या प्रकरणात ईडी संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलं…
भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये, लालरिनुंगा जेरेमी मेन्सने 67 किलो गटाच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने स्नॅच किलोमध्ये 140 किलो वजन उचलून विक्रम केला आहे. स्नॅच अँड जर्कमध्ये 165 किलो वजन उचलण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. स्नॅच अँड जर्कमध्ये 165 किलो वजन उचलण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. 19 वर्षीय जेरेमीने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 136 किलो वजन उचलले आणि पुढच्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला.जेरेमीचे पहिले आणि आतापर्यंतचे…
जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर ईडी कायम आहे. चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे महाजन यांनी सांगितले.भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळं खडसेंची जेलवारी अटळ आहे.मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती. भोसरी…
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. दिवस ईडी कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे. या पथकासोबत सुरक्षा रक्षक असून त्यांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला आहे. कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संजय राऊत हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत…

