लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” उपक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा/विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून मंगळवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील, तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन सणानिमित्त राखी बनवण्याच्या कार्यशाळा शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आले. कार्यक्रमामध्ये पालकांसह मुलांनी त्यांची कल्पनाशक्ती व सृजनशक्ती वापरून आकर्षक पद्धतीने राख्या बनवल्या. विद्यालयामध्ये पालकांनी राखी बनवण्याचे साहित्य सोबत आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली राखी बनवण्याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानुसार स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले. पालक व विद्यार्थ्यांचे कल्पना कौशल्य पाहून शिक्षकांनी व संस्था संचालकांनी कौतुक केले. प्रात्यक्षिक कार्यशाळा झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक व मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी सर्व राख्यांचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअनुषंगाने मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. एकूण ६०० विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांनी वितरित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतही व्यक्त केले.गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: उद्योगासाठी योजनेतून वीज डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रूपयांची मागणी नेरी येथील सहाय्यक अभियंत्याने केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याच्या तयारीत असतांना संशयिताला सुगावा लागल्याने पथकावर चारचाकी वाहन घालून पसार झाला. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक अभियंता शालीग्राम पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील एका तक्रारदाराने लघू उद्योगासाठी वीज डीपीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार १४ लाखांचे कोटोशन लागेल सांगितले. परंतू मी तुम्हाला मोफत वीज डीपी मिळवून देतो यासाठी ६ लाखा रूपये लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. महापालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले, तर १७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले, आणि १७ वर्षा आतील मुलींच्या गटात जी.डी. बेंडाळे महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवे मफलर गळ्यात टाकून हल्ला केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार व गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली गेली पडळकर हे वारंवार बिनबुडाचे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाची बदनामी करत आहेत. याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पोलिस आयुक्तांकडे निवेदनातून पक्षाकडे करण्यात आली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अनेक वेळा जयंत पाटलांच्या वर जहरी टीका करण्यात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रिंगरोडवरील सीएमएस कंपनीच्या जळगावच्या शाखा मॅनेजरने कंपनीच्या खात्यात रक्कम न भरता तब्बल ३३ लाख २९ हजार १८१ रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रिंगरोडवर नाशिक येथील सीएमएस नावाची कंपनीची शाखा आहे. या शाखेत २०१८ मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून महेंद्र पांडूरंग झोंबाडे (वय-३४) रा. चाकण आगरवाड, पुणे हा काम पाहत होता. जळगाव शाखेचे कामकाज झोंबाडे कामकाज पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ हे सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीचे खात्याची तपासणी करत असतांना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी ३३ लाख २९ हजार…
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचा 39 आमदार शिंदे गटात डदाखल झाले आहेत. काही माजी आमदारासह खासदार ही शिंदे गटात दाखल होत आहेत. आता शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा मानला जात आहे. शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे दिसून येत आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात रात्री उशिरा मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेचे माजी रायगड…
बंडखोर ४० आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप करत, त्या ४० आमदारांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवावं असं खुलं आव्हान आदित्य यांनी दिलं आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देताना आमदार शहाजी पाटील यांनी आदित्य ठाकरेना चांगले खडसावले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. पत्राचाळ घोटळाप्रकरणी ईडी सध्या राऊतांची चौकशी करत आहे. शहाजी बापू पाटील यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊत म्हणजे भोंगा नाही, तर राज्याला लागलेली किरकिर होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही सल्ला दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यातील अनेक…
श्रावण महिन्यातील पहीला श्रावणी साेमवार. हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला’ आजच्या दिवशी विशेष महत्व प्राप्त होते. भारतातुन आज भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवारला दिवसभर सुरु असलेल्या पूजा-अर्चेमुळे मंदिरातील वातावरण भक्तीमय आहे. नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात’. आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक, आरती अशा पूजाअर्चा सुरू असल्याने; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे. पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसुन आल्या. नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडील मंडपात एकाच वेळी दहा ते पंधरा हजार…

