Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत व्यक्त केले दु:ख गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले…

Read More

भडगाव पोलिसात तरुणीविरोधात गुन्हा दाखल जळगावातील एका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने भडगाव येथील एका प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल पद्धतीने प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातल्याची घटना भडगावात घडली. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीलाही तरुणीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. जळगावातील एका तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत माहराणही केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या…

Read More

फरार संशयिताच्या शोधार्थ तीन पथके रवाना लाईव्ह महाराष्ट्र न्युज: जळगावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-१९) या तरुणाचा चॉपर भोसकून खून झाल्याची घटना तांबापुरात घडली होती. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून तिघांवर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या त्यांच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्यासोबत वाद झाला होता. यादिवशी बाचाबाची होवून वाद मिटला होता. मात्र मंगळवारी रात्री संजयसिंग हा घराबाहेर बसलेला असतांना मोहनसिंग व मोनूसिंग यांनी संजसिंगवर चॉपरने वार करुन त्याला जखमी केले. तसेच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका…

Read More

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ आज दुपारी समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झालेत. मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. या संदर्भात अधिक असे की आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका जागीच ठार झाल्याचे कळते. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी…

Read More

चार जखमी तर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना आजमंगळवारी २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरात एका कुटुंबावर चार अनोलखीनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात एका तरुण मुलाचा घाव लागल्याने खून झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापुरा भागातप्रदीप सिंग यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी २५ रोजी ते घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्ववैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर अज्ञात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात संजय सिंग प्रदीप सिंग…

Read More

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Pravin Mundhe) यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार (Jalgaon SP M Rajkumar) यांची वर्णी लागली आहे.जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदलीने अद्याप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील सोनवद येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रेमराज पाटील, सरपंच उज्वल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक चंद्रकांत जाधव यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन तृणधान्य पिकाचा पेरा वाढावा असे आवाहन देखील केले.तसेच तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी सन 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांसोबत तृणधान्य पिकाचा पेरा वाढवण्यासाठी आवाहन केले आहे.

Read More

पत्रकाराला बेकायदा दिलेल्या नोटीसचा निषेध ; चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन ! जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पत्रकाराला दिलेल्या नोटीसचा निषेध व्यक्त करत धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन आज ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असल्याबाबतची माहिती कांडेलकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी…

Read More

जळगाव प्रतिनिधी : आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी संधी असून, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बुथ रचना मजबूत करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना केले. जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट आणि गण प्रमुखांच्या मेळाव्यात श्री. देवकर बोलत होते. ते म्हणाले, की सध्याची राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी चालून आली आहे. यापूर्वीही ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व वाढविण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यासाठी घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचले पाहिजे. बूथ लेव्हलवर सूक्ष्म पद्धतीने नियोजन…

Read More

युवा संसदेमधून समाज आणि देशाचे कल्याण करणारे सक्षम नेतृत्व उभे राहू शकते -खासदार मा.उन्मेष पाटील   जळगाव प्रतिनिधी: मूळजी जेठा महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठ स्तरीय युवा संसद कार्यशाळा आयोजित करण्यात आली संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव महाविद्यालयीन तरुणांना घेता यावा त्या माध्यमातून देशाचा देशाचे भावी सुजाण नागरिक आणि नेते तयार व्हावेत याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.          या युवा संसद कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे खासदार उमेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटकीय मनोगतात खासदार उमेश पाटील म्हणाले की “ सन 2000 मध्ये याच महाविद्यालयात केंद्रीय संसदीय समितीच्या वतीने आयोजित तीन…

Read More