लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील सोनवद येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रेमराज पाटील, सरपंच उज्वल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक चंद्रकांत जाधव यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन तृणधान्य पिकाचा पेरा वाढावा असे आवाहन देखील केले.तसेच तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी सन 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांसोबत तृणधान्य पिकाचा पेरा वाढवण्यासाठी आवाहन केले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पत्रकाराला बेकायदा दिलेल्या नोटीसचा निषेध ; चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन ! जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पत्रकाराला दिलेल्या नोटीसचा निषेध व्यक्त करत धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन आज ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असल्याबाबतची माहिती कांडेलकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी…
जळगाव प्रतिनिधी : आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी संधी असून, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बुथ रचना मजबूत करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना केले. जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट आणि गण प्रमुखांच्या मेळाव्यात श्री. देवकर बोलत होते. ते म्हणाले, की सध्याची राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी चालून आली आहे. यापूर्वीही ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व वाढविण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यासाठी घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचले पाहिजे. बूथ लेव्हलवर सूक्ष्म पद्धतीने नियोजन…
युवा संसदेमधून समाज आणि देशाचे कल्याण करणारे सक्षम नेतृत्व उभे राहू शकते -खासदार मा.उन्मेष पाटील जळगाव प्रतिनिधी: मूळजी जेठा महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठ स्तरीय युवा संसद कार्यशाळा आयोजित करण्यात आली संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव महाविद्यालयीन तरुणांना घेता यावा त्या माध्यमातून देशाचा देशाचे भावी सुजाण नागरिक आणि नेते तयार व्हावेत याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या युवा संसद कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे खासदार उमेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटकीय मनोगतात खासदार उमेश पाटील म्हणाले की “ सन 2000 मध्ये याच महाविद्यालयात केंद्रीय संसदीय समितीच्या वतीने आयोजित तीन…
जळगाव : प्रतिनिधीभादली येथील पाटावर दि ३ रोजी जळगाव येथील तरुणाची हत्या करून मयताची प्रेत त्या ठिकाणी मिळून आल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्ह्या उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि जालींदर पळे, पोउपनिरी अमोल देवढे, सफी रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव यांचे…
पाचोरा प्रतिनिधी । भाड्याने दिलेली बैलगाडी तक्रारदाराला मिळवून देण्यासाठी 4 हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाने पाचोरा शहरात सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही, उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी ५ हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा…
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ; शिंदे गट-भाजपकडून तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी ! धरणगाव (प्रतिनिधी) पत्रकार कल्पेश महाजन यांनी निर्भीडपणे प्रकाशित केलेल्या बातमीवरून भेदरलेल्या धरणगाव तहसीलदार यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसचा धरणगावातील पत्रकार संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकाराला नोटीस दिलेली नोटीस म्हणजे हा लोकशाहीचा खून आहे. लोकप्रतिनिधी किंवा कुणीही दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी प्रकाशित करणे हा पत्रकाराचा अधिकार आहे. त्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. तहसीलदार कुणाच्या इशाऱ्यावर नाचताय हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. गुलाबराव वाघ (शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जळगाव ) पत्रकारांच्या व्यक्ती स्वातंत्राच्या अधिकारावर हा मोठा हल्ला आहे. खरं…
पाणीपुरवठामंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची संकल्पना मुंबई / जळगाव प्रतिनिधी : शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याची उत्सुकता केवळ राज्यात नसून देशभरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी…
गांधी जयंतीनिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम जळगाव प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त व व्यसनमुक्त अभियानाला शहरात रॅलीने सुरुवात झाली. यावेळी आमदार राजूमामा भोळे व राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅली निघण्यापूर्वी श्री देवकर यांनी अशा अभियानाची समाजाला गरज असून, व्यसनमुक्ती केंद्राचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आमदार भोळे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षी व्यसनमुक्त व गांजामुक्त महाराष्ट्र हा संदेश महाराष्ट्रभर देण्यात येणार असून, राज्यात वर्षभर हे अभियान चालू राहणार असल्याचे यावेळी चेतना व्यसनमुक्ती व उपचार केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले.
धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्याची माहिती दिली. गांधीजींनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सदैव कटिबद्ध राहून देश एकसंध ठेवण्याचं कार्य केले. अहिंसेच्या मार्गावर चालून सुध्दा क्रांती घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गांधीजी. शास्त्रीजींच्या चरित्रातून आदर्श काय घ्यावा तर उच्च पदावर राहून सुध्दा साधं राहणं. रेल्वेमंत्री, प्रधानमंत्री अशा उच्च पदावर असतांना देखील शासकीय सुविधांचा गैरवापर करू नये हे समजून घ्यायचे असेल तर शास्त्रीजींच्या चरित्राचा…

