जळगाव ;- राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी दिनांक 2 जुलै, 2021 अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत देण्यात आलेली होती. तथापि, राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव ;- जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या बैठकीत समितीच्या 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये माहे मार्च-21 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये माहे जुलै-21 अखेर खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना,…
जळगाव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गुरुवारी जाहिर करण्यात आली. यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्रमक चेहरा म्हणून आमदार नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सूत्रे सोपविण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय दौरे करुन संघटनात्मक आढावा घेतला. गुरुवारी दि.२६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली, या बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजूरी दिल्यानंतर हि कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. यात १८…
जळगाव ;- ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २८ व २९ ऑगस्ट रोजी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या…
जळगाव ;- जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करतांना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. पद्मनाभा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजनच्या निधीतून मागील वर्षी केलेल्या कामांचे फोटो जीपीएस प्रणालीवर अपलोड…
मुंबई ;- एकनाथ खडसे यांना परत एकदा ईडीने (ED) धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे.एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. आणि आता ईडीने खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर कॉलनी मधील तुळजाई नगरातील भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या महिलेची आज पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मधील तुळजाई नगर मधील रमेश पुंडलिक वंजारी यांच्या घरात भाड्याने राहाणाऱ्या भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या श्रीमती वंदना गोरख पाटील (वय42) हीचा आज पहाटे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणारा वरुन डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला करुन निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटना घडली त्या घरात महिलेचा चेहरा छिन्नविच्छीन्न अवस्थेत…
जळगाव;- जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जळगाव शहर – ०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण २ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ६९२ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार ०९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर…
नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून बांगड्या फोडून निषेध धरणगाव ;- येथील माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रभाग क्र.५, लोहार गल्ली परिसरातील संतापलेल्या महिलांनी पाणी प्रश्नी नगरपालिकेवर मोर्चाकाडून नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून आणि बांगड्या फोडून निषेध करून आपला संताप व्यक्त केला . याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतप्त झालेल्या महिला भगिनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोवर नगराध्यक्ष येत नाही आणि आमच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी यावेळी घेतला नगराध्यक्षांच्या दालनात आलेल्या मोर्चेकरांचे प्रभाग क्र. १० चे नगरसेवक अजय जंगलू चव्हाण यांनी…
जळगाव प्रतिनिधी;- तालुक्यातील शिरसोली गावात तलवार घेऊन दहशत माजविणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल रज्जाक पिंजारी वय १९ रा. चिंचपुरा चौक शिरसोली असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. हनुमान मंदिराजवळ साहिल पिंजारी हा बुधवारी दुपारी हातात तलवार घेऊन गावात दहशत माजवित असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्यासह पथकाने शिरसोलीतुन साहिल पिंजारी यास अटक केली. त्याच्याकडून ४ हजार रुपये किंमतीची २९ इंच लांब व २३ इंच रुंदीची तलवार जप्त केली…

