लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.यासंदर्भात अधिक असे की, जावेद सलीम शेख असं आरोपीचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आली. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मोकळ्या जागेवर शौचालयाला गेली. त्यावेळी तेथे राहणारा आरोपी जावेद शेख याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी जावेद सलीम शेख याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्ह्याचा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापि, कोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात…
जळगाव प्रतिनिधी: येथील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात गरजू, सामान्य व गरीब रुग्णांनासाठी राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाल्याने गरजूवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात होणार आहेत.त्यामुळे या रुग्णालयातील अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे. कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील आरटीओ कार्यलयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे काही कंपन्यांची सुपारी घेऊन काम करीत असल्याचा आरोप गजानन मालपुरे यांनी केला असून आपण व्हिजीलन्सच्या अधिकारीऱ्यांची धावती भेट घेतली. त्यांनी मोबाईल नंबर दिला असून लोहींविरुद्ध त्यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचे देखील मालपुरे यांनी सांगितलय. पहा मालपुरे नेमकं काय म्हणालेत !उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मुंबई येथील व्हिजीलन्सच्या पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मालपुरे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नव्हे तर, ते सुपारी घेऊन काम करीत असल्याचा आरोप केला आहे यांच्याकडे रिक्षा धारकासाठी आलो होतो मात्र त्या रिक्षा मला पसंत नाही त्यामुळे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्याने आज नशिराबाद जवळ सायंकाळी गोळीबार आणि चॉपर हल्ला केल्याने एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.या घटनेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दाखल करण्यात आले असून मयताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे आणण्यात येत आहे. भुसावळ येथील खुनाच्या खटल्यामधीलधम्मप्रिय मनोहर सुरळकर व मनोहर सुरळकर या आरोपींना जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते भुसावळला दुचाकीने परतत असतांना त्यांना अज्ञात मारेकर्यांनी रोखले. त्याच वेळी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील काव्यरत्नावली चौकानजीक असलेल्या उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दक्षता पथकाने अचानकरित्या भेट दिली. या पथकातर्फे दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यत या दक्षता पथकातील अधिकार्यांचे पथक तळ ठोकून होते. आरटीओ कार्यलयात सकाळपासूनच आलेल्या दक्षता पथकाचे सहायक परिवहन आयुक्त अरविंदकुमार सावंत यांचेसह 4 ते 5 अधिकारी यांनी अचानक येऊन .आरटीओ कार्यालयात होत असलेल्या कामकाजाची कसून तपासणी सुरू केली असून ही नियमित तपासणी कामकाजाचा भाग असल्याचे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना अधिकार्यांनी सांगीतले. मात्र असे असले तरी कोवीड संसर्गाच्या वर्ष दिड वर्षाच्या कालावधीनंतर अचानक झालेल्या या कारवाईने काही वेळ खळबळ उडाली असल्याचे दिसून आले. मंगळवारी उप…
जळगाव प्रतिनिधी: मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी सहा फुटाची गणेशमूर्ती आढळून आली. शासनाच्या नियमापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्याने याप्रकरणी मित्रमंडळाच्या तरूणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, मेहरूण तलावावर रविवार १९ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाच्या विसर्जनाची प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी अधिकार्यांसह कर्मचारी असा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विसर्जन सुरू असतांना मेहरूण तलावावर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील जय समाधा गणेश मित्रमंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मंडळाची गणेशमूर्ती ही सहा फूट उंचीची असल्याचे लक्षात आले. शासनाने केवळ चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास यंदा परवानगी…
जळगाव प्रतिनिधी: राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचं 23 ते 27 सप्टेंबर रोजी जळगाव धुळे असा दौरा असणार आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी पदाधिकारी बरोबर चर्चा तर जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.ना.छगन भुजबळ यांचा दि. २३ ते २७ रोजीचा धुळे ,जळगाव दौरा आयोजित करण्यात आला आहे. धुळे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धुळे शहर व जिल्हा बैठक. तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बैठक होणार आहे तर 24 रोजी शासकीय मोटारीने विश्रामगृह, जळगांव कडे प्रयाण आणि शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आगमन व मुक्काम. शनिवार २५ रोजी सकाळी ९ वाजेला,अन्न,नागरी…
लाईव्ह महाराष्ट्र: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावातील तितुर नदीत पोहायला गेलेल्या दोन संख्या भावाचा बुडून मृत्यू झाला असून दुसरी घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ गावामधील आई वडील बाहेरगावी गेले असता खेळता खेळता शेतातील केटी वेअर बाधाऱ्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला.ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे.तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.वाघळी गावालगतच्या कमलेश्वर के.टी वेअर बंधाऱ्या जवळ ही घटना घडली आहे.साहिल शहा शरीफ शहा फकीर आणि आयन शहा शरीफ शहा फकीर हे दोघे भाऊ तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते.नदीत पोहत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून…
जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते बनवण्यासाठी ‘माझी किडनी विका आणि रस्ते तयार करा’, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्वच रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांनी चांगले रस्ते बनिवण्याचे आश्वासन देवून निवडणूकीत निवडून आले त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली परंतू अद्यापपर्यंत जळगाव चांगले रस्ते झालेच नाही. याबाबत महानगरपालिकेच्या प्रशासनाची लोकप्रतिनिधींशी मिलीभगत असून नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने वरून महानगरपालिकेच्या कामांचा ठेका घेतात पण रस्त्यांचे कामे होत नाही. याबाबत वारंवार विचारना केली असता महापालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.…

