लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील 20 महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.असे आहेत पात्र लाभार्थीदापोरा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) धरणगाव येथील पारधी वस्ती मधील अवैध दारु विक्री बंद व्हावी या मागणीसाठी पोलीस स्थानकात गेलेल्या नागरिकांनी पोलिसांनी त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे उपस्थित नागरिकांनी रात्री एकच्या सुमारास रस्ता रोको केल्याची घटना घडली. याबाबत वृत्त असे की, काल रात्री एक वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशनच्या समोर महिला व नागरिक पारधी वाडा मधल्या महिला व पुरुष यांनी आपल्या भागातील अवैध दारू विक्री संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी आलेले होते.पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता सकाळी बघू असे सांगत याबाबत टाळाटाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातून जाणार्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत ‘रस्ता रोको’…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजता देशव्यापी सार्वजनिक ऑनलाईन आत्मसाक्षात्कार कार्यक्रम 17 भाषांमध्ये विनामूल्यआयोजित केलेला आहेहा कार्यक्रम sahajayoga.org.in/live याच्यावर पाहू शकाल व लर्निंग सहयोग जगा यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रसारित होणार आहे.कार्यक्रमाची पाच सत्रांमध्ये विभागणीकार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागला गेलेला आहे सकाळी नऊ ते दहा या वेळामध्ये संस्कृत, आणि उर्दू भाषेत होईल , हिंदी, तेलगू, तमिल, आणि गुजराती या भाषेत दहा ते अकरा या वेळेत प्रसारित होईल, अकरा ते बारा बंगाला, कन्नड मल्यालम, अस्मि या भाषेत प्रसारित होणार आहे. 12 ते 1 मराठी, पंजाबी, भोजपुरी, उडिया या भाषांमध्ये प्रसारित होणार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- शिवसेना ही बंडखोर संघटना आहे, घरातून ,कुटुंबातून ,पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला. शिवसेनेचा एकही सरपंच, जि.प. व पं.स सदस्य किंवा आमदार की खासदार नसतानाही शिवसेना जिवंत ठेवली ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचारांनी.शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्यांचे जनतेने गर्वहरण केले. मुक्ताईनगर तालुक्यात 30 च्या रात्री ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली. मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला पुरुष हे आपलं आत्मविश्वास दाखवू शकतात मात्र रुलर भागातील शहरांमध्ये सुंदरता आत्मविश्वास हुशारी या सर्व गोष्टी असल्यावरही ते दाखवण्यात ते सक्षम नसतात त्यामुळेच हे व्यासपीठ आपण निर्माण केले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेबसाईट मिस्टर इंडिया मिसेस इंडिया असे व्यासपीठावर पाठवणार असल्याचे गौरा मिसेस मिस्टर खानदेश चे आयोजन करणाऱ्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शी चर्चा करताना सांगितले. खानदेश मॉल येथे आज गौरा मिसेस मिस्टर खान्देश या बॅनरखाली एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिसेस इंडिया रनअप राहिलेल्या गौरी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अजिंठा चौकाजवळील एक भागात भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.याबाबत महिती अशी की, अजिंठा चौफुलीजवळील एकाच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंनखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला. यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तरअमोन…
प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील जळके गावातील वसंत वाडी गावठाण येथील पंचर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्य चोरून पसार झाले. तालुक्यातील जळगाव जळके येथे बुधवारी रात्री १:३०च्या सुमारास चोरट्यांनी जळके गावालगत वसंतवाडी गावठाण समोरील मन्साराम शिवराम पाटील यांच्या मालकीच्या पंचर दुकानांचे अज्ञात चोरट्यानी कुलुप तोडुन दुकानातील पिटर मशिन (डिझेल पंप),हिटींग मशिन व गाडीचे चाक खोलणयासाठी लागणारे पाहन्यांचा संच घन,हातोडा अशा वस्तू चोरट्यांनी लांबविल्या आहेत. याच रात्री चोरट्यांनी वसंतवाडी तांडा येथे देखील टपरी फोडल्याची माहिती मिळते पंचर दुकान मालकाने म्हसावद पोलिस दुरक्षेत्र गुन्हा दाखल केल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी पाहणी केली.
प्रतिनिधी प्रवीण पाटील: तालुक्यातील जळके येथील बंधारा आहे त्या बंधाऱ्याला गेल्या दोन ते तीन झालेल्या अतिवृष्टी मुळे सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणी थांबविण्यासाठी मागणी होत आहे.जळके तालुक्यात जळगाव येथील नदिवर पाणी अडविण्यासाठी सन २००१/२००२च्या सुमारास सिमेंट बंधारा बांधला गेला आहे या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील विहिरीसाठी व जळके पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीसाठी चांगला फायदा होतो .मात्र दिनांक २७,२८सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत एका बाजूचा भराव वाहुन गेला आहे त्यामुळे या साठवण बंधाऱ्यातुन पाण्याचा विसर्ग मोठ्या…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : आणि पाणी या दोन शब्दांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध नेहमीच पहायला मिळतो. एरवी पाण्यामुळे शितलता प्राप्त होते परंतु इकडे मात्र पाणी प्रश्नावरून अनेकदा वातावरण तप्त झाल्याचा अनुभव धरणगावकर जनता नेहमीच घेत असते. मात्र मागील काही दिवसांपासून ४ ते ५ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे धरणगावकर जनता सुखद अनुभव घेतेय. याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन महिन्यांपूर्वी शहरात १५ ते २० दिवसात पाणी पुरवठा होत होता. घरातील अगदी शेवटच्या भांड्यातील पाणी संपेपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत होता. काही दिवसांपासून मात्र हाच पाणीपुरवठा ४ ते ५ दिवसांच्या आत होतोय. पाण्याची साठवण क्षमता असलेल्या भांडयांपैकी निम्मे भांडी सुध्दा खाली होत नाही…
प्रतिनिधी प्रवीण पाटील: जिल्ह्यात 27 व 28 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अनेकांचे नुकसान झाले आहे यात तालुक्यातील वसंत वाडी मोठ्या प्रमाणात मातीच्या घरांची पडझड झालेली आहे गावातील घरांचे पंचनामे व्हावे यासाठी पोलीस पाटील यांची वारंवार संपर्क करीत आहेत.वंसतवाडी या.जळगाव येथे दिनांक २७,२८ सप्टेंबर झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावात मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यासाठी येथील नागरिकांना प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची या गावात मातीच्या काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत यात वसंतवाडी तांडा येथे अरुण काळु चव्हाण,सदा ज्योतीराम जाधव ,वसराम गणपत राठोड,राजु रतन राठोड,इंद्र हजारी चव्हाण, रामदास ताराचंद चव्हाण,ईंदल गोविंदा चव्हाण तर वसंतवाडी प्लांट भागात बालु पोपट पाटील, शोभाबाई प्रभाकर पाटील…

