प्रतिनिधी अमोल पाटील:- उत्तरप्रदेशातील लाखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यास पाळधी गावांतील व्यापारान पासून तर छोटे,मोठे व्यावसायिक यांनी देखील सकाळ पासून पूर्णपणे कळकळीत बंद पाळून साथ दिली. गावांतील सर्वसामान्य नागरिकांनी देखील बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन बंद पाळला बंद मधून जीवनाश्यक सुविधांना बंद मधून वगळण्यात आले होते त्यात प्रामुख्याने दवाखाने,मेडिकल याचा समावेश होतो. बंदला प्रतिसाद देण्यासाठी आवाहन करताना शिवसेनेचे पाळधी गटाचे जि. प.सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,मा.सभापती मुकुंदराव नंनवरे, कॉग्रेसचे वी. डी. पाटील,मा.सरपंच अरुण पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन,प्रशांत झंवर युवासेनेचे प्रमुख आबा माळी.आदी उपस्थित होते.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं .भुसावल तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मारामारी झाली.दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे इ -फेरफार प्रकल्पाचे समन्वयक व प्रमुख रामदास जगताप यांनी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज राज्यभर तलाठी संघाने आंदोलन पुकारले आहे .धरणगाव तालुका तलाठी संघानेही आज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले आणि या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली. तलाठी कर्मचाऱ्यांसोबत मंडल अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
उपद्रव हा खूनापेक्षा जास्त वाईट आहे-पवित्र कुराणलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याचा निषेधार्थ जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या रविवारी झालेल्या तातडीच्या सभेत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.उप द्रविना इस्लाम मध्ये थारा नाही पवित्र कुराण मधील सूर ए अलमायदा आयत ३२ मध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्याने एखाद्या माणसाला खूनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानव जातीला जीवन प्रदान केले.इस्लाम मधील सहिष्णुता नैसर्गिक रीतीने आपले कार्य करणारे कायदे असूनही इस्लाम आपल्या अनुयायांना…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा म्हटलं म्हणजे राष्ट्रवादीचा गड परंतु अलीकडे लोकसभेला भाजपा आणि विधानसभेला राष्ट्रवादी असे समीकरण असते परंतु जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय फार्मूला नुसार चोपडा ची जागा ही काँग्रेसला सोडण्यात आले आहे त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष ही अनुकूल झाले परंतु राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाचे घनश्याम अग्रवाल हे उमेदवार असतील यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने सर्वपक्षीय पॅनल वादात सापडले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल चे वारे वाहत असताना चोपडा नेहमी उलट्या दिशेने चालते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्थानिक असतानादेखील या ठिकाणी अनेकवेळा भाजपाला रसद पुरवली स्थानिक नेत्यांकडून झाले असल्याचे अनेक निवडणुकीच्या मतदान वरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड चोपडा तून…
महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज – लक्ष्मणराव पाटील धरणगांव प्रतिनिधी: येथील अ.भा.जिवा सेना व शहरातील नाभिक समाज बाधवांतर्फे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त गुजराथी गल्ली येथे प्रतिमा पूजन व जिवाजी महाले यांचे जीवनपट यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत सेवक जिवाजी महाले होते. असे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूल चे उपक्रमशिल शिक्षक पी. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे होते. या जयंती महोत्सवानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल.…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करून आपल्या मुलांना महापुरुष याचे शिक्षण देणे गरजेचे आहेसत्यशोधक विचार आत्मसात करण्याची गरज आहे .याचवेळी महात्मा फुले याचा जीवनपट उलगडला यातूनच सत्यशोधक विधीकर्ते देशभर निर्माण केले जातील असे व्यक्तव्य अरविद खैरनार यांनी येथील मोठा माळी वाडा समाज मढीमध्ये १४८ व्या “सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिरावेळी केले.प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक माळी समाजाचे पंच हेमंत ज्ञानेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प महामंडलेश्वर भगवानजी बाबा होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधन शिबिराचे प्रमुख वक्ते औरंगाबादचे सत्यशोधक अरविंद खैरनार, धुळे येथील सत्यशोधक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक परिक्षेत्राच्या आय जी यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री ब्राऊन शुगर तस्करी करणाऱ्या एका आरोपीला हॉटेल परिसरातून अटक केली याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणातील अजून धागेदोरे समोर येतील आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचा आहे.नाशिक परिक्षेत्राचे आईजी यांच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की ,जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पंचशील नगर मधील 43 वर्षाचा एक किसन ब्राऊन शुगर तस्करी करीत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे या विशेष पथक व धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस यांच्या मदतीने शनिवारी रात्री 9 वाजेला भुसावळ येथील पंचशील नगर मधील रहिवाशी सैय्यद शेर सैय्यद बुडन या आरोपीला …
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे 8 ऑक्टोबर रोजी बौद्धिक संपदा अधिकार(IPR) या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेसाठी प्रा डॉ एम डी शिरसाट संचालक रुसा सेंटर इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे लाभले यांनी बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर बोलताना पेटंट व कॉपीराईट्स संदर्भातील प्रोसिजर पेटंट धारकांचे अधिकार पेटंट मिळवताना अविष्कार कशा पद्धतीचे पाहिजेत विशेषतः संदर्भ पुस्तके व या पुस्तकांवर मिळणारी मिळकत म्हणजेच रॉयल्टी कशा पद्धतीने मिळते व ती किती काळापर्यंत मिळत राहते प्रकाशक संशोधकांची कशी फसवणूक करू शकतात त्यातील माहिती त्यांनी सहभागी संशोधकांना उत्कृष्ट मांडणी द्वारे सांगितले नवीन संशोधकांना पेटंट…
चुकीचे सल्ले देत असल्याने मोजमाप चुकीचे होत सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप प्रतिनिधी (गणेश साळुंखे) राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे त्यात शहरातून राष्ट्रीय महामार्गा जात आहे.याठिकाणी मोजमाप योग्य पध्दतीने होत नसल्याने त्यामुळे दोन्ही बाजूस समांतर रस्ता तयार होण्यास अडचणी येऊ शकतात असे असतानाही नाही अधिकारी योग्य सल्ला देत नाही आहे. असा आरोप आज सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता, शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अनिल नाटेकर यांनी थेट हायवेवरच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.चौपदरीकरण होत असतांना याच्या दोन्ही बाजूंनी उपलब्ध असणारी जागा लक्षात घेऊनच सेंटर लाईन प्रमाण मानावी अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग उडडाणपुल, भुयारी मार्ग ई नवीन बांधकामे…

