Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर अडीच लाख रूपया सह तिजोरी उचलून दरोडा टाकला होता. टोळीचे २ म्होरके ठाणे , वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीला न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर  अडीच लाख रूपया सह  तिजोरी उचलून दरोडा टाकला होता  याबद्दल जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो.काँ.समाधान पाटील, विकास पहुरकर, पो.ना. सलीम तडवी यांच्या पथकाने पहिल्या आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी  वय २८, रा.…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चा शेवटचा पांडवसभा वाहनांचा पुजा व आरतीसाठी लहान माळी वाडा येथील माळी समाज, पाटील समाज, तिळवण तेली समाज तसेच क्षत्रिय मराठे समाज या चारही समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळ यांना बोलावून पुजा व आरती करण्याचा मान देण्यात आला. खरं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा अनुषंगाने प्रशासनाने रथ व वाहन मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने वाहनांची जागेवर पुजा व आरती रात्री सात वाजता व शेवटची आरती रात्री दहा वाजता करण्यात येते. वाहन व्यवस्थापक मंडळाने पहिल्या दिवसाच्या वाहना पासून तर शेवटचा पांडवसभा चे वाहना पर्यंत गावातील प्रतेक समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळांना बोलावून आरती…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी येथे आत्मा अंतर्गत खान्देशी शेतकरी गट स्थापन करण्यात आला. सदरील गटातील शेतकऱ्यांना लाल भेंडी पिकाविषयी आत्मा बिटीएम दीपक नागपुरे यांनी मार्गदर्शन केले. लालभेंडी पिक व्यवस्थापन व विक्री बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील गटातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाविन्यपूर्ण भाजीपाला लागवड व भाजीपाला हातविक्री करून जास्त नफा मिळवावा, असे आव्हान करण्यात आले. ॲडव्हान्टा कंपनीच्या ‘कुमकुम लाल भेंडी’ प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट प्रसंगी बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, कृषी सहाय्यक किरण वायसे, योगेश काकडे, रामकृष्ण पाटील उपस्थित होते.शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर हरभरा व ज्वारी बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे वाटप पिंप्री येथे कैलास ऍग्रो व जाज ऍग्रो,…

Read More

जळगाव, दि.२३ – शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते पत्रकार चेतन वाणी यांचे वडील होते.

Read More

लक्ष्मण पाटील: पुणे येथील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज जमीनदोस्त होत आहे, ज्या शाळेने महिला सक्षमीकरणासाठी भक्कम भिंत उभी केली, लहुजी वस्ताद यांची मुक्ता तिथं पोत्यात घालुन शिक्षणाकरिता आणली , आणि याच वाड्यातून गुलामीच्या मुक्तीची विट सशक्त भारत उभारण्यासाठी देश मजबुतीसाठी रचायला सुरुवात केली, ज्याने स्री पुरुष दोघांना सुशिक्षीत केले आणि यावरच आज देश मजबुत उभा राहिला पण ज्या वाड्याने देश मजबुत केला त्याचीच एक एक वीट मात्र आज कोसळत आहे. सन २००८ पासून हा लढा मा. न्यायालयात आहे, त्यावर किती वेळा शासनाने आपले मत मांडले आणि शाळा वाचवण्यासाठी…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जयहिंद व्यायाम शाळा व नवयुवक दुर्गा माता मित्र मंडळ यांच्या वतीने पांडव सभेचे वाहन उत्सव निमित्त लहान माळी वाडा परिसर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेत जवळ पास 121 स्पर्धक सहभागी झाले होते. काल रात्री एका छोटेखानी कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याप्रसंगी श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, मंडळाचे सदस्य चंदु अण्णा, कडू महाजन, पांडुरंग मराठे, रघुनाथ चौधरी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, धनपा चे उपनगराध्यक्ष विलास महाजन, बालाजी पंतसंस्थेचे व्यवस्थापक राजेद्र महाजन, पर्यवेक्षक महाजन सर आदी उपस्थित होते. प्रारंभी आयोजकांचा वतीने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- लातूर येथील  रिमार्ट शॉपी नावाच्या कंपनीच्या मालकाने यावल येथील 25 वर्षीय युवतीला 999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रूपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शुभांगी जुगल पाटील (वय-२५)  रा. गवत बाजार मेनरोड यावल ह्या गृहिणी महिला आहे. दरम्यान त्यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५) रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर यांनी “999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरा मध्ये प्रवेश करताना किंवा शहराबाहेर जाताना असलेला कालिंका माता ते तरसोद फाट्यापर्यंत च्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता पंधरा दिवसात दुरुस्त न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला. भुसावळ वरून तरसोद फाट्यापर्यंत फोरवे झाला आहे मात्र तरसोद फाटा ते कालिंका मंदिर हा शहरात येणारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे किंवा शहरातून बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्ता असलेला कालिका माता मंदिर ते तरसोद फाटा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून त्यावर खड़े जास्त झालेले आहेत. त्यामुळे रोजच्या अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोप पत्यारोप होत असताना छाननी पूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे एक असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर यानंतर छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती.  धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून  संजय मुरलीधर पवार  तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार असली…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: शहरातील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील धरणगाव – जळगाव रस्त्यावर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे व त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विचार करता महाविद्यालयाच्या काही अंतरावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. शहरात एकच महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, अश्या परिस्थितीत रस्त्यावरून जाणारे वाहने सुसाट वेगाने जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसात गतिरोधक बनवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेकडून करण्यात आली. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री आर्यन सैंदाणे,…

Read More