जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील तरुण शेतकरी शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेला असतांना शेतातील पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी धानोरा शिवारातील शेतात घडली. सुनिल खंडू धनगर (वय-30) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (वय-30) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचे धानोरा शिवारात शेत असून तो नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुनिल धनगर हा शेतात गेला होता. त्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी विहीरीजवळील ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अनेक दिवसापासून त्यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप असून आता अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. दरम्यान संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हाय कोर्टात धाव घेतली होती. संजय राऊत, प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली होती. 2010 मध्ये, प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीतील 25 टक्के हिस्सा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्र सेतू असं नाव देण्यात आलं आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने 12 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असतांना दि.१९ जूनला दर गेल्या पाच दिवसांची तुलना केल्यास १ हजार रुपयांनी घटले होते. दोनच दिवसांनी दारात २०० रुपयांची वाढ झाली. तर बुधवारी २८ जून सकाळी पुन्हा सोन्याचे दर २०० रुपयांनी घटले आहे. मात्र चांदीच्या दरात वाढ झालेली दिसत आहे. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २८ जून २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५८ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७० हजार ३०० रुपये होते. तर दोन दिवसांपूर्वी नागपुरात २६ जूनला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात सध्या लग्नाचा मुहूर्त संपण्यात आलेला असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर नववधूने अनेक दिवस संबंध ठेवण्यास नकार देताना नवऱ्याला जवळही येण्यास दिले नाही. ज्यावेळी नवऱ्याने जबरदस्तीने स्पर्श केला. त्यावेळी ती भडाभडा बोलत राहिली. ज्यावेळी तिने काही सांगितले, त्यावेळी नवऱ्याच्या पाया खालची वाळूच सरकली. नवऱ्याला कळले की, ती आधीच विवाहित आहे. तिने नवऱ्यालाच धमकी दिली. जबरदस्ती केलीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची नववधुने धमकी दिली. त्यामुळे पतीला आता काय करायचे याचा मोठा धक्का बसला. राजस्थानमधील जयपूरमधीळ ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नववधूने अनेक दिवस आपल्या पतीशी गोडबोलून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जनतेसाठी मोठ्या योजनेचा पाऊस पाडत मोठे निर्णय देखील यावेळी घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात 20 हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. याचा 21 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. 50 हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. 1 हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या 1354 योजना जिल्ह्यात सुरू आहेत. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच जळगाव शहरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येवून गेले त्यांनी या कार्यक्रमात अनेक घोषणा देखील केल्या आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात केल्या. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आले. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामना या वृत्तपत्रात आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था देशात जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने आगमन केले असून उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून हंगामात सरासरीपेक्षा ४६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. देशाच्या पूर्व, मध्य, उत्तर-पश्चिम आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मान्सून चार दिवस सक्रिय राहील. पुढील २४ तासांत १९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने हिमाचलमध्ये पुढील ४ दिवस पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार पाऊसही पडू शकतो. दोन दिवसांपूर्वी हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात ४८ तासांच्या कालावधीत भूस्खलनाच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग-21 दोन ठिकाणी तासनतास बंद होता. या मार्गावरील ठप्प 20 तासांनंतर उघडले. राज्यात…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चौबारी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २५ जून रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. फिर्यादी रामभाऊ भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ जून रोजी ते व त्यांची पत्नी सुनंदा हे समाजातील मुलीचा बस्ता असल्याने गावातील रिक्षातून अमळनेर येथे गेले होते. तेथून परत येताना दोघांनी मागून दुचाकीने येत वाद घातला. संध्याकाळी यातील एक जण आला आणि त्याने शिवीगाळ करत दगड उचलून मारला. या झटापटीत भावजय व मुलगा यांनादेखील मुका मार लागला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वैजयंता शंकर भिल यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा पांडुरंग याला…

