जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघामध्ये मद्याच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी सुपरवायझरशी वाद घालत योगेश भागवत निंबाळकर (४१, रा. जळगाव) या कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दूध संघामध्ये चालक असलेले संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मद्याच्या बाटल्या सोबत घेऊन आल्याने सुपरवायझर मुकेश निंबाळकर यांनी त्या दोघांना आत जाण्यास नकार दिला. त्यावेळी दोघे मुकेश यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. संध्याकाळी वरील दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पती कामावर तर मुले शाळेत गेलेली असताना राणी श्यामकांत देशमुख (४४, रा. ओम साईनगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली त्यावेळी समोर आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कानळदा रोडवरील ओम साईनगरात राणी देशमुख या पती व दोन मुलांसह राहत होत्या. पती श्यामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी (३० जुलै) दोन्ही मुले शाळेत तर पती कामावर गेले होते. त्यावेळी घरात कुणीही नसताना विवाहितेने घरात गळफास घेतला. संध्याकाळी दोन्ही मुले घरी आली त्यावेळी घराचा…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी परतत असलेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन यांच्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे त्या जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास समतानगरजवळ झाला. सविस्तर वृत्त असे कि, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक असलेल्या श्रद्धा महाजन या रायसोनीनगरकडे घरी जात होत्या. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांना दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण आणि गजानन बन्सीलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत येथील सरपंच मनोज पाटील यांनी आज (दि. 31) रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले श्रीकांत चव्हाण यांच्या पत्नी मंजुळाबाई चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी…
मेष राशी मेष राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. ग्रहांचे संक्रमण नशिबाच्या विकासासाठी उपयुक्त आहे. योजना प्रत्यक्षात आणण्यात यश मिळेल. नोकरीच्या बाबतीत गाफील राहू नका. जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो. गुप्त शत्रूला मत्सर वाटेल. तुम्ही काही नवीन काम करू शकाल. शेतीच्या कामातून फायदा होईल. सहलीचा कार्यक्रम होईल. वेळेचे स्वरूप लक्षात घेऊन काम करा. व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात वर्चस्व प्रस्थापित होईल. वृषभ राशी नोकरीत तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. राजकीय प्रतिनिधीवरील तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध होईल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे तुमच्यासाठी घातक ठरेल. रस्त्यात एखाद्या प्राण्यामुळे अपघात होऊ शकतो. वरिष्ठ नातेवाईकामुळे कुटुंबात वाद होऊ…
रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले. रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. पिंप्री मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून १-१ फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी…
जळगाव : प्रतिनिधी निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत सरासरी 11 मी उंची पर्यंतचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. जानेवारी 2024 मध्ये एकूण प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालानुसार रु. 4890 कोटी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या मान्यतेनुसार सद्यस्थितीत टप्पा 1 अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून 10.4 TMC एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी 2024…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुढील ५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान आणि कोकण आणि गोव्यात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रात ३१ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सून ट्रफ सक्रिय आहे आणि ट्रफ समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. पुढील ३ दिवसांत तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू दक्षिणेकडे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महायुती देखील आता बैठका घेण्यासाठी सज्ज झाले असून आता जागावाटपा आधीच तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सध्या अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. ऋतुजा लटके या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अंधेरी पूर्वच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने निरीक्षक देखील नेमलाय. त्यातच समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात केला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या मोठ्या सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबईत ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल,…

