जामनेर : प्रतीनिधी तालुक्यातील पहूर कसबे येथील युवक गणेश ज्ञानेश्वर बनकर (२७) याचा बुधवारी नेरी, ता. जामनेर येथे जात असताना अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी पहूर गावात धडकली. घरातील कर्ता मुलगा व एका चिमुरड्याचे पितृछत्र हरपल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पहूर कसबेतील रहिवासी ज्ञानेश्वर बाळकृष्ण बनकर यांचा चिरंजीव गणेश ज्ञानेश्वर बनकर हा जळगाव येथे कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरून दुचाकीने जळगावला जाण्यासाठी तो निघाला. जळगाव-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर नेरी येथे श्वानामुळे दुचाकीला अपघात झाला. यात गणेश याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला.…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार व कर्मचारी हे गस्तीवर असताना त्यांनी इलेक्ट्रिक मोटारपंप चोरी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३० रोजी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, शेतमालाच्या होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा, असे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे गस्तीच्या वेळी संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी चाळीसगाव पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे ३० रोजी पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हे.कॉ. रवी पाटील, दीपक पाटील, प्रवीण जाधव, अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील हे घाटरोड परिसरात गस्त घालत असताना ३…
मेष राशी क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुम्हाला विविध क्षेत्रांकडून अपेक्षित भेटवस्तू मिळतील. नोकरीत बढतीचे योग येतील. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसचा पाठिंबा आणि कंपनी मिळेल. व्यवसायात प्रगतीसह लाभ होईल. अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित केला जाईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचार ठेवा. तुमचे लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला काही मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. वृषभ राशी दिवसाची सुरुवात तणाव आणि अनावश्यक धावपळीने होईल. प्रेमसंबंधांमध्ये काही धोका असल्यास कोणताही धोका पत्करू नका. अन्यथा तुम्हाला मारहाण होऊन तुरुंगातही पाठवले जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात मन एकाग्र करा. व्यवसायात अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवणे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. मात्र हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर ते फरार झाले. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्लाबोल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1 हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2 हजार रुपये असा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठी योजनांची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास व्हिडिओ जारी केला आहे. ताई तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. योजनेसाठी राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना साद घातली आहे. शिंदे म्हणाले, ”ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील वावळदा रोडवर लक्झरी बस व डंपरच्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झाला त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. यापूर्वी याच ठिकाणी अपघात झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा – जळगाव रोडवरील पाचोरा रोड हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडी वळण आहे. वावडदेकडून जाणारी एल एच पाटील कन्स्ट्रक्शन ची डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व पाचोरा कडून येणारी लक्झरी बस क्रमांक एम एच…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील राजापेठ भागात सकाळच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने एका १७ वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करीत तिचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने मुख्य चौकात ही घटना घडत असताना एक ऑटोचालक आणि इतर नागरिकांनी धाव घेत तत्काळ तरुणीची सुटका केली आणि माथेफिरू तरुणाला बेदम बदडून काढीत पोलिसांच्या हवाली केले. सविस्तर वृत्त असे कि, बुधवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात मुलीचा गळा चिरल्याने तिच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल मुकुंद कळस्कर (२३, रा. राजापेठ, अमरावती) असे अटकेतील हल्लेखाराचे नाव…
चोपडा : प्रतिनिधी अवैधरित्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाच जणांवर ३१ रोजी पहाटे चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. यात दोन्ही मिळून १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अमोल शिवाजी सुरळकर (वय २२), गणेश रमेश राऊत (वय २६) व आकाश दादाराव राऊत (वय २१) व भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील योगेश मिरचंद रिसवाल (वय २५) हे चौघे ३१ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास दोन बोलेरो चारचाकी गाडी (एमएच १९सीवाय ६३०७ व एमएच- २०, इएल ८५५६) मधून अवैधरित्या…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाघोदे येथील ईश्वरलाल चिंधा पाटील (वय ४६) या शेतकऱ्याने शेतीमुळे झालेले कर्ज व यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घटना ३० रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरलाल पाटील यांनी २७ रोजी घरीच विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. होते. उपचारादरम्यान ३० रोजी तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असून घरातील कमावता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर विकास सोसायटी आणि सहकार सोसायटी तसेच इतर हात उसनवारीचे कर्ज होते. या कुटुंबास त्वरित शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मयत ईश्वरलाल पाटील…

