Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी गेल्या चार दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप असणार आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप असणार आहे. राज्यातील काही ठिकाणी पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील राष्ट्रीय महामार्गावर वाकोद गावाच्या पुढे हॉटेल सिंहगड जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. ९ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत असे कि, छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने रात्री अकरा वाजता हॉटेल सिंहगड जवळ एका चाळीस वर्षीय इसमाला चिरडले. यामध्ये त्या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आणला. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहाला ग्रामीण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बँकेत कामाला असल्याचे सांगून कपिल राजू पाटील (२१, रा. चंदू अण्णानगर) याने बांधकाम व्यावसायिक विनोद हंसराज बडगुजर (४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करून परस्पर एक लाख १३७ रुपये काढून घेतले. मात्र पोलिसात तक्रार देण्याविषयी सांगताच या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम जमा न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवारी (९ ऑगस्ट) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या क्रेडिट कार्डचा वापर दोन महिन्यांपासून न केल्यामुळे ते कार्ड बंद पडले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चुकीच्या दिशेने (राँग साईड) जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (४५, रा. सदोबा नगर) हे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (९ ऑगस्ट) रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीपी ४६६०) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एमएच १८, बीजी २९३७) नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले व ते ठार झाले. अपघातानंतर ट्रक…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल. कुटुंबात एखाद्याच्या लग्नात अडचणी आल्या असतील तर तुम्ही मोठ्यांशी बोलून त्यांचे निराकरण करू शकता. विद्यार्थी असाल तर तुम्ही शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी घरापासून दूर जाऊ शकता. प्रेमात असाल तर तुमचा जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणतीही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू नका. पैश्याच्या बाबतीत सावध रहा. वृषभ राशी आजचा दिवस व्यापार करणाऱ्या लोकांसाठी चांगला-वाईट असू शकतो, म्हणून तुम्ही तुमच्या कामाची योजना आखून पुढे जावे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत कुठे तरी बाहेर जाऊ शकता. तुम्ही एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, नाहीतर तुमच्या कामाच्या ठिकाणी वादळे निर्माण होऊ शकतात, म्हणून तुम्ही काळजी घ्या. जर तुम्हाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभेपूर्वी सर्वच पक्षातील नेते सध्या राज्यातील दौऱ्यावर असतांना मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. या घटनेचे प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांकडून आणि महिला कार्यकर्त्यांकडून बांगड्या आणि शेण फेकले आहे. तर गडकरी रंगायतन परिसरातही मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सभेसाठी गडकरी रंगायतनमध्ये जमलेले उबाठा गटाचे कार्यकर्तेही यावेळी समोरासमोर आल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित असे यश आलेले नाही नऊ खासदारांपैकी सात नवीन चेहऱ्यांना संधी जनतेने दिलेले आहे. नितीन गडकरी व रक्षा खडसे वगळता भाजपाचे सात नवीन चेहरे खासदार झाले असल्याने हाच फार्मूला आगामी विधानसभा निवडणुकीत राबविला जाणार आहे. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत देखील भाजपा भाकरी फिरवणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 25 खासदार भाजपाचे निवडून आले होते. आता केवळ नऊ खासदार निवडून आलेले आहे. महाराष्ट्रातील जनतेने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या चर्चेत जळगाव शहर विधानसभेच्या जागेवर नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जनतेमध्ये मामा…

Read More

लातूर : वृत्तसंस्था लोकसभेच्या महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश आल्यानंतर आता महाविकास आघाडी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून आता कॉंग्रेस देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सज्ज झाली असून नुकतेच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित तीन खासदारांचा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लातूरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर कर्नाटक सारखी महालक्ष्मी योजना सुरू करू, असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. राज्य…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या १ ऑगस्टपासून राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असल्याने ते सध्या मराठवाडा दौऱ्याचा आज समारोप होत असून १ वाजेच्या दरम्यान त्यांचे शहरात आगमन झाले. हर्सुल परिसरात येताच मोठ्या उत्साहात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपल्याकडे सध्या केवळ जातीचे राजकारण केले जाते. जातीच्या राजकारणातून जनतेची माथी भडकवली जात आहेत. काल बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी रुग्णवाहिकेतून नाशिक येथे नेत असताना रुग्णवाहिकेतील अपघाग्रस्त युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्यानजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले. सायगाव येथे परतल्यावर त्यांना पुन्हा मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना नाशिक येथे रुग्णवाहिकेने जात असताना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्याजवळ अपघात झाला. त्यात बच्छे (वय २७) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णवाहिकेची धडक अन्य चारचाकी वाहनाशी झाली. बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही…

Read More