सावदा : प्रतिनिधी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवीत ९ लाख ३५ हजारात फसवणुक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाल येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील संशयीत अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे (रा.भुसावळ) याच्या सावदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेअरमार्केटच्या अॅपमध्ये पैसे गुंतवण्याचे आमीष दाखवुन बनावट शेअरमार्केटचे अॅप्लीकेशन बनवुन इसमाने ९ लाख ३५ हजारांची गुंतवणूक केली होती. कालांतराने त्या अॅप्लीकेशन मध्ये तक्रारदार यांची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांची फसवणुक झालेचे लक्षात आले. त्यानंतर भोपाल क्राईम ब्रेन्च येथे फसवणुक झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोपाल क्राईम ब्रांचमधील कर्मचाऱ्यांनी तांत्रीक माहीतीच्या आधारावर बनावट अकाऊंट तयार करणारा संशयित अनिकेत बऱ्हाटे याचा शोध घेतला. त्याचा…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी अंत्ययात्रेसाठी पत्नीसह निघालेल्या दुचाकीस्वाराला मागून कंटेनरने धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धुळ्यानजीक घडला, गोटू वामन पाटील व त्यांची पत्नी संगीता गोटू पाटील (५०, जुवार्डी, ता. भडगाव) हे दोघे वनपाट ता. मालेगाव येथून बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी शिरसोलीकडे जात होते. महामार्ग क्र. ३ने मालेगावकडून शिरसोलीकडे जात असताना हॉटेल नालंदाजवळ महामार्गावर मोठा ट्रक उभा होता म्हणून ते बाजूने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (एमएच ४/जीआर९५३४) मागून जोरदार धडक दिल्याने ते दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. क्षणात संगीता पाटील यांच्या अंगावरून पुढचे चाक…
जळगाव : प्रतिनिधी आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक महोत्सव ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यासाठी शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला असून एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे. जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं यासाठी अनेक संस्था, व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहेत. शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मोलाचा हातभार लागावा यासाठी बालवयातच आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी – विद्यार्थिनींना व्हावी, त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा आयाम लाभून उद्याचा जागरुक व सुसंस्कृत नागरिक घडावा,…
मेष राशी तुमच्या जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमचे मन प्रफुल्लित राहील. सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात तुमच्या क्षमता आणि कौशल्यांची प्रशंसा होईल. लोकांशी संवाद ठेवा. त्यांच्याशी संपर्क कायम ठेवा. आर्थिक प्रकरणात धीर धरा. भपका दाखवल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी अधिक ताण घेऊ नये. सीनिअर व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं. व्यापारात आज महिलांसाठी विशेष शुभ संधी आहे. परंतु सध्या शेअर आणि तेजी-मंदीसारख्या गोष्टींमुळे गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ नाही. त्याबद्दल योग्य माहिती घेऊनच कोणताही निर्णय घ्या. घरचं वातावरण आनंदी राहील. वृषभ राशी या काळात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवहार कौशल्याने एखादं कार्य चांगलं मार्गी लावाल. तुमचं…
मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध राज्यातील प्रत्येक गावात सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर बसवला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याला हादरविणारी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडली असून या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून मंगळवारी (दि.२०) उद्रेक झाला. संबंधित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पालक आणि आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यातच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे संतापाचा कडेलोट झालेले पालक आणि आंदोलकांकडून शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी बचावासाठी लाठीचार्ज केला.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येत असतांना नुकतेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली परिसरात एका व्यक्तीने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना कारने चिरडले. या अपघातात ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनतक आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अंबरनाथचे रहिवासी बिंदेश्वर शर्मा याने मंगळवारी सायंकाशी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या सफारी कारने वडिलांच्या फॉर्च्युनर एसयूव्हीला धडक दिली. या घटनेत ५ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. बिंदेश्वर शर्मा याचे वडील सतीश शर्मा हे निवृत्त वरिष्ठ संरक्षण अधिकारी आहेत.…
जळगाव :प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ‘लखपती दीदी’ या महिला मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या जेवणाची, पाण्याची, स्वच्छतागृहाची अत्यंत नियोजनबद्द सोय करावी अशा सूचना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्व्यक आर. एस. लोखंडे, संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. पार्किंग व्यवस्थेबाबत अलर्ट रहा त्या त्या ठिकाणावरून येणाऱ्या बसेसची सोय, त्यांच्यासाठी सोयीची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून ठेपले असतांना नुकतेच उद्धव ठाकरे काँग्रेसचे उपरणे घालून थेट काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात सहभागी झाले होते. १५ ते २० मिनिटे त्यांनी उपरणे घातले होते. शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याने काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे उपरणे घातल्याचा प्रकार शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याने अनेक छायाचित्रकार तो टिपत होते. त्याचा उल्लेख करत उद्धव यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. काँग्रेस पक्षाचा मान राखावा, सन्मान द्यावा या भावनेपोटी उपरणे घातल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे भले करण्यासाठी नव्हे तर भारताला लुटण्यासाठीच सत्तेवर आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
जळगाव : प्रतिनिधी महिनाभरापासून मुलीकडे गेलेल्या कमल गोपाल तेली (वय ७२, रा. ढाकेवाडी) या वृद्ध महिलेच्या घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह तांबे, पितळी भांडे व पुजेचे साहित्य असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दि. १९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ढाकेवाडी परिसरात कमल तेली या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. दि. २ जुलै रोजी त्या गावातच राहत असलेल्या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. दरम्यान, महिनाभर त्या तिकडेच राहत असल्यामुळे त्यांचे घर बंदच होते. ही संधी साधत चोरट्यांनी घाचे कुलूप उघडून घरातून चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, चार…

