जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे मंगळवार दि. ४ मार्च रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी एकाच समाजातील दोन गटात उधारीच्या पैशांवरून वाद निर्माण झाला. याच वादातून दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली यात अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी दोघं गटातील एकूण २७ जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, यासीन चाँद पिंजारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, यामध्ये त्यांचा भाऊ रशीद पिंजारी याचेकडे जाकीर कालू कुरेशी, साकीर कालू कुरेशी यांची मटनाचे चारश रुपये उधारी होती. यातून वाद निर्माण झाला कालांतराने जाकीर व साकीर यांनी गैरकायदेशिर मंडळी जमा करून हातात फायटर सुरी, लोखंडी रॉडने हल्ला करून रशीद…
Author: editor desk
रावेर ; प्रतिनिधी येथील सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ४ रोजी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मन्यार वाडा भागातील रहिवासी सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहित महिलेने काल दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शेख इम्रान शेख शकील राहणार बंगाली कॉलनी खंडवा मध्यप्रदेश यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिवकॉलनी लगत असलेल्या महामार्गावर रात्री ११.१५ वाजेदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५० वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे रात्री महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शिवकॉलनी परिसरात रास्तारोको करुन शहराबाहेरील महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगरातील रहिवासी विजय नामदेव भोई (वय ४५, रा.) यांचा मृत्यू झाला. शिवकॉलनीत असलेली आपली टपरी व सोडा वॉटरचे दुकान बंद करुन विजय भोई हे घराकडे जात असताना धुळ्याकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विजय भोई…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था पुणे येथील स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेवर चाकूचे 15 हून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक तात्यावर नवपुते (19, रा. घारदोन) असे आरोपीचे नाव आहे. चिखलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. आरोपी गत अनेक दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पण पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. विवाहिता 2 मार्च रोजी रविवारी सायंकाळी आपल्या शेतात काम करत होती. त्यावेळी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य करणारे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे निलंबित करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्ये निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अवमान झाला. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे. पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात पीडितेने हे संपूर्ण प्रकरण विषद केले आहे. त्यानुसार, सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार…
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतला आहे तर सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ केल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण आता हलका होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात 100 रुपयांवरुन 500 रुपये वाढ केलेली आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता.…
पाचोरा : प्रतिनिधी शहरात ४२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील आशिर्वाद ड्रिमसिटी मधील रहिवासी वैशाली अनिल पाटील (वय – ४२ वर्ष) या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. वैशाली पाटील व पती अनिल पाटील यांचे किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. पती अनिल पाटील याचे कडुन वैशाली हिस शिविगाळ व मारहाण होत असे. नेहमीच्या वादाला कंटाळून अखेर वैशाली पाटील…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील अहिरवाडी व पाडळे खुर्द वनविभागाच्या कंपार्टमेंट मध्ये सुमारे वीस हजार रुपये किमतीचा १६५ किलो डिंक जप्त केला याप्रकरणी डींक चोरी करणारे दोन मोटरसायकल सह मुद्देमाल सोडून पसार झाले. सविस्तर वृत्त असे कि, सातपुडा पर्वतातील अहिरवाडी येथील सेक्टर क्रमांक पाच मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मोटर सायकलवरून लिंक नेतांना अज्ञात इसम आढळून आले. मोटरसायकल स्वरांचा पाठलाग केला असता ते पळून गेले. या कारवाईत दहा हजार ८७० रुपये किमतीचा ९८ किलो सलई डिंक तसेच एम एच १९ ए जी १७२३ ही पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल तसेच सेक्टर क्रमांक आठ मध्ये ४७ किलो सल्डिंग…
जळगाव : प्रतिनिधी आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्या वैभव उर्फ गोल्या दत्तात्रय पाटील (वय २४, रा. गणपतीनगर) याच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दहा हजारांची रोकड आणि ९ हजार रुपयांचे तांबे पितळाचे भांडे हस्तगत करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात राहणाऱ्या विमल शिरसाठ या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या घरातून २५ हजारांची रोकड आणि तांबे पितळाचे भांडे चोरून नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात् गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना…

