Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील बाबा नगरातील रहिवाशी हर्षद नागपाल यांची बुलेट चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवरून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहे.त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच आता पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नाशिकमध्ये गळती सुरु झाली आहे. पक्षाचे नेते माजी नगरसेवक नाना महाले यांनी शरद पवार यांची साथ सोडली असून अजित पवारांचे घड्याळ हाती घातले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं अपयश लक्षात घेता आगामी पालिका निवडणुकांच्या दृ्ष्टीने महाले यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाले यांनी पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने आपण हा प्रवेश केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करुन महाले यांच्या राष्ट्रवादी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे गट व महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करायला हवी, असेही राणे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते सत्य होते. शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या दोन शिवसेनेत चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटातील नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे. अंधेरी येथील जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी व्यावसायिक सुनील झंवर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करून घरी परतत असलेल्या सूरज झंवर यांच्या वाहनाला समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात सूरज झंवर यांच्यासह तिघे जखमी झाले असून चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. इंदौरजवळील मानपूर येथे सोमवारी रात्री १ वाजता हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे कि, उद्योजक सुनील झंवर यांचे वडील देवकीनंदन झंवर यांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी नातू सूरज झंवर हा मित्र पलाश तोतला आणि आलोक शिवानी यांच्यासह हरिद्वार येथे गेला होता. विधी आटोपून ते दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचले असता राजधानी एक्सप्रेस निघून गेले.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करीत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून यामध्ये पाच दुकाने तर दोन घरांचा समावेश आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, बसस्थानक आवारात असलेले पवन मेडिकल, सारिका मोबाइल अॅड हार्डवेअर, चौधरी इलेक्ट्रॉनिक्स, ज्योती कृषी केंद्र, नवजीवन किराणा या दुकानांच्या शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून गल्ल्यातील रोख रक्कम व दुकानातील किमती वस्तू चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यासोबतच राजेंद्र शेळके यांचे घरही चोरट्यांनी फोडले. कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथे चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र, घरात त्यांच्या हाती काही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महात्मा फुले मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता घडली. एका दुकानातील आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास लागले. फुले मार्केटमधील अतिक्रमणाचा फटका मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. जर या आगीचे स्वरूप जर मोठे राहिले असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  फुले मार्केटमध्ये करण श्रावणकुमार तलरेजा यांचे पूजा कलेक्शन नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास दुकानातील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीविषयी मनपा अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. लागलीच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये लोहारा येथून येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ खाजगी बसने दिलेल्या धडकेत रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७वाजता घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रत्नाबाई गणेश हिवाये (४०, रा. लोहारा, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. रत्नाबाई या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करून, त्या लोहारा येथे घेऊन जायच्या. मंगळवारी त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसुंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या…

Read More

 मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, कुटुंब आणि व्यावसायिक कार्यात संतुलन राखल्याने आनंदी वातावरण निर्माण होईल. सध्या आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नकारात्मक कार्य करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे; अन्यथा तुमचा स्वाभिमान धोक्यात येऊ शकतो. कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वाद दूर होतील. आरोग्‍याची काळजी घ्‍या. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे लक्ष एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यावर असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. राजकीय कार्यांपासून दूर राहा. अन्‍यथा तुमची बदनामी होऊ शकते. विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यासासह आपल्‍या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत…

Read More