मुक्ताईनगर : वृत्तसंस्था मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडून सातोडच्या दिशेने ही कार जात होती.…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.७ मार्च २०२६ मेष राशी तुमचा व्यवसाय वाढेल, आर्थिक नफ्यात लक्षणीय वाढ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल. या राशीखाली जन्मलेल्या खेळाडूंना मोठ्या कामगिरी किंवा विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होईल. आज तुम्ही तुमच्या मित्राला त्यांच्या घरी भेटायला जाल. जर तुमचे पूर्वी एखाद्या नातेवाईकाशी मतभेद झाले असतील, तर आजचा दिवस संबंध सुधारण्यासाठी चांगला आहे. तुमचे विरोधक कदाचित त्यांच्यापासून दूर राहतील. वृषभ राशी आज ऑफिसमध्ये तुम्हाला एका मोठ्या कामाची जबाबदारी देण्यात येईल, जी तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. जर तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले तर तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या 2026 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू करण्याची घोषणा केली. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार केवळ थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच दिलासा देण्यात येणार नाही, तर जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेद्न फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा सरकारचा दावा आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत लॉबीवादावर निशाणा साधत म्हणाले, “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ”, ज्यावर उपस्थितांनी जोरदार हसले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. गडकरी यांनी या भाषणात देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, भारताला भविष्यात मजबूत आणि स्वावलंबी बनवायचे असेल तर पर्यायी ऊर्जेवर भर देणे आवश्यक आहे. “काही वर्षांपूर्वी जेव्हा मी जैवइंधन, इथेनॉल…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच मराठा आरक्षण व त्यासंबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुढील दिशा ठरविण्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. समितीच्या अहवालानुसार राज्यभरात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या असून, त्यावर आधारित 12 लाख 11 हजार 303 जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. यामुळे मराठा समाजातील अनेकांना आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. प्रदेशानुसार पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात…
भुसावळ : प्रतिनिधी लग्नसमारंभात वऱ्हाडी असल्याचे भासवून शिरलेल्या चोरट्यांनी नववधूच्या दागिन्यांची पर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथे तब्बल दहा दिवस ठाण मांडत दोन संशयित आरोपींना अटक केली. रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया (दोघे रा. कडिया सांसी, तहसील नरसिंहपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ येथील बालाजी लॉन्स येथे ६ फेब्रुवारी रोजी उज्ज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडत होता. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास नववधूचे दागिने…
यावल : प्रतिनिधी शेतातील विहिरीजवळील गुलाबाचे फुल तोडताना तरुणीचा तोल गेला आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे बुधवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दिलीप सपकाळे (२२, रा. शिरसाड, ता. यावल) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. ती बुधवारी सकाळी गावालगत असलेल्या एका शेतात फुले तोडण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीजवळील गुलाबाच्या झाडावरून फुल तोडत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली आणि लक्ष्मीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी…
भुसावळ : प्रतिनिधी होळीच्या दिवशी मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने विरोदा येथील ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फैजपूर -भुसावळ मार्गावरील बामणोद गावाजवळील हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराचा पोलिस शोध घेत आहेत. विरोदा येथील रहिवासी तथा श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले (वय ४८) हे २ मार्च होळीच्या दिवशी बामणोद येथे कर्णछेदन कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री सुमारे १०:३० वाजता ते मोटरसायकलने विरोदा येथे परतत असताना आमोदेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघातात कपले गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर आरोपी मोटरसायकलस्वाराने आपली ओळख पटू नये…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव व जामनेर तालुक्यातील सहा जणांवर प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी वर्षभराच्या कालावधीसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. तसेच आदेश जळगाव व पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ व ५७ नुसार फत्तेपूर (जामनेर), रामानंदनगर, जिल्हापेठ, नशिराबाद (जळगाव) पोलिस निरीक्षकांनी आरोपींचा तपशील सादर केला होता. त्यानुसार जळगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षकांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला प्रांताधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सुनील पांडुरंग पारधी, विजय पांडुरंग पारधी (फत्तेपूर), अमोल उर्फ चिक्या शंकर कोकाटे (तडवी गल्ली, हरीविठ्ठलनगर, जळगाव), उमेश उर्फ उमाकांत दत्तात्रय धोबी (संत मीराबाई नगर, पिंप्राळा), महेंद्र उर्फ दादू समाधान…

