मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील विमानतळाच्या आधुनिकीकरणावर सरकारकडून भर दिला जात आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी विमानतळ उभारण्यापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहे. राज्यातील विमानतळांच्या आधुनिकीकरणाबाबत अर्थसंकल्पात करण्यात आल्या ‘या’ घोषणा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार. नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85…
Author: editor desk
बीड : वृत्तसंस्था गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्हा खुनाच्या घटनेने देशभर चर्चेत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या PA ने एका शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 12 डिसेंबरचा आहे. पण तो आता व्हायरल झाला आहे. यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता संदीप क्षीरसागरही अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील कथित गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या दोघांवरही भाजप आमदार सुरेश धस यांनी आका व आकाचे आका…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप देण्याचे गुप्त आदेश दिलेत, असा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केला आहे. धनंजय मुंडे हे देशमुख हत्या प्रकरणात 302 चे आरोपी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. मनोज जरांगे पाटील सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत. पण जे जनतेला कळते, ते सरकारला का कळत नाही. धनंजय मुंडे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक त्यांना…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रक उलटून 17 मजूर दबले गेले, त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने 4 मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघातानंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या कन्नडमधील पिशोर खांडीत ऊसाच्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमध्ये असलेल्या ऊसावर बसून १७ कामगार प्रवास करत होते. अचानक पिशोर खांडीत ट्रक उलटला आणि ऊसाखाली १७ कामगार दबले गेले. या भीषण अपघातामध्ये ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे,पदमश्री ॲड.उज्वल निकम,आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली. रोहित निकम यांनी सहकारातील राजकीय चक्रीय या निमित्ताने तोडल्याचे दिसून आले तसेच भाजपाचा धबधबा सहकारात वाढला आहे. सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे. नवनिर्वाचित…
चाळीसगाव : प्रतिनिधी येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून ९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, पीडित महिला ही राहुल कचरू आल्हाट याची पत्नी असून तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल कचरु आल्हाट पती, मायाबाई कचरु आल्हाट सासू, तेजस कचरु आल्हाट दीर (सर्व…
जळगाव : प्रतिनिधी महामार्गावर असलेल्या चौधरी टोयाटो व सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्य प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते भुसावळ दरम्यान तरसोद फाट्यासमोर असलेल्या चौधरी टोयाटो सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये गेल्या महिन्यात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली होती. यात चोरट्यांच्या हाती जास्त मुद्देमाल लागला नव्हता, मात्र शोरूममध्ये तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ही चोरी मध्य प्रदेशातील चोरट्यांनी केल्याची माहिती सपोनि ए. सी. मनोरे यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेवालाल पिसीलाल मोहिते…
यावल : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १२ तासांपासून वन विभागाची शोध मोहीम सुरू असली तरी बिबट्या अद्याप सापडलेला नाही. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्या व इतर हिंसक प्राण्यांपासून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी केले आहे. यावल तालुक्यातील साकळीच्या मानकी शिवारात चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका सात वर्षीय आदिवासी मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यात सातोद स्त्यावर नीलेश गडे यांच्या गव्हाच्या शेतात तडसाचा फडशा पाडला. विविध भागांमध्ये बिबट्या दिसल्याने यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे…
वरणगाव : प्रतिनिधी वरणगावहून आचेगावकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने आचेगाव येथील शरद भास्कर पाटील (७०) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिराचे पुढे काही अंतरावर घडली. शरद पाटील (वय ७०, रा. आंचेगाव) हे दुचाकीने (एमएच १९/ एएस ६९९१) आचेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी (एमएच २८/बीएस ९१४१) धडक झाली. या अपघातात चालक शेख गनी शेख मौलाना (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५) दोघे रा. बोदवड यांचे सह शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद…
मेष राशी आज अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश आणि सन्मान मिळेल. नोकरीच्या शोधात घरापासून दूर जावे लागेल. तुम्हाला नोकरी मिळेल. तुम्हाला काही सरकारी योजनेची जबाबदारी मिळू शकते. राजकारणात विशिष्ट व्यक्तीशी जवळीक केल्याने फायदा होईल. वृषभ राशी आज तुमचे आरोग्य सुधारेल. कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित खूप चांगली बातमी मिळेल. निरोगी लोकांना त्यांच्या शारीरिक शक्ती आणि मनोबलात मोठी वाढ जाणवेल. यामुळे ते जोश आणि उत्साहाने भरलेला असतील. मिथुन राशी आज आर्थिक क्षेत्रात चढ-उतार जाणवतील. जमिनीशी संबंधित जुना वाद मिटवून मोठी रक्कम प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रातील आर्थिक धोरणे चांगल्या प्रकारे समजून घ्या. काही नवीन योजनांवर पैसा खर्च…

