जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात रविवार दि. १६ मार्च रोजी दारू पिऊन आलेल्यांना हॉटेलमध्ये आरडाओरड करण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने हॉटेल चालक शेख शाहरुख शेख गणी (२९, रा. गेंदालाल मिल परिसर) यांना चार जणांनी मारहाण केली. सविस्तर वृत्त असे कि, शेख यांच्या हॉटेलमध्ये आदेश, सोन्या, आवेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि त्यांचा एक साथीदार असे चार जण आले होते. दारूच्या नशेत चौघेही आपसात मस्करीने एकमेकांना शिवीगाळ करीत आरडाओरड करीत होते. त्यावेळी शेख यांच्या आईने त्यांना शांततेत जेवण करण्याविषयी सांगितले, तरीही ते ऐकत नसल्याने शेख त्यांना समजावण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात…
Author: editor desk
नशिराबाद : प्रतिनिधी भाडेतत्त्वावर दिलेले घर खाली करून घेतल्याने त्याचा जाब विचारत घरमालक गलू पुजो पाटील यांच्या पोटात चाकू खूपसून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना १४ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी प्रमोद नामदेव पाटील (४५, रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गलू पाटील यांनी त्यांचे घर भाडेतत्त्वाने दिलेले होते. ते घर त्यांनी भाडेकरूकडून खाली करून घेतले. घर खाली करून घेतल्याबाबत भाडेकरू प्रमोद पाटील यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला येथे राहण्यासाठी यायचे असल्याने घर खाली करून घेतल्याचे घरमालकाने सांगितले. त्याचा राग आल्याने पाटील याने गलू पाटील यांना मारहाण…
मेष राशी आज कामाच्या ठिकाणी मन कमी लागेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. एखाद्या कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त धावपळ होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास घातक ठरू शकतो. कुटुंबात काही सुखद घटना घडू शकतात. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. तुम्हाला तुमची बचत काढून घ्यावी लागेल आणि ती कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यावर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. मिथुन राशी आजचा दिवस संघर्षाने भरलेला असेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या बुद्धीने वागा. सामाजिक कार्यात रस कमी राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. कर्क…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना सुरु केली होती हि योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. मात्र अलीकडेच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रक्कमेत वाढ करून २१०० रुपये करण्याची कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली. तसेच ही योजना बंद होणार असल्याचा आरोपही केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे…
मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. दरम्यान, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त केलेली सोशल मीडिया एक्स (X) पोस्ट सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी “माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शू शकत नसल्याचे” पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची…
जळगाव : प्रतिनिधी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे. असे रोखठोक मत व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जनतेच्या मनातला सूर व्यक्त केला. “मी स्वार्थासाठी नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व जोपासण्यासाठी उठाव केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.” अशा ठाम शब्दांत त्यांनी इशारा दिला. सत्ता ही टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी असते. गरीब जनतेच्या सेवेमुळे मला उर्जा मिळते. म्हणूनच मी दिवस-रात्र जनतेसाठी झटतो. शिरसोलीच्या जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे.…
धाराशिव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे प्रेमसंबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमवून चुकवावी लागली. भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. रविवारी (दि.१६) त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, माऊली गिरीचे आणि पांढरेवाडी येथील विवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. ३ मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर झालेल्या संभाषणामुळे हा प्रकार मुलीच्या पतीला कळला. संतापलेल्या पतीने माऊली याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. तेथे मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर ४-५ जणांनी त्याला विवस्त्र करून लोखंडी रॉड आणि…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघडू येथे अचानक रस्त्यावर आडवा आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार पुलावरून खाली कोसळली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात कारमधील पती-पत्नीसह त्यांचा दोन वर्षाचा बालक किरकोळ जखमी झाला. लखीचंद राठोड (३३), राणी राठोड (२६) व मुलगा दुर्गेश राठोड (२) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखीचंद राठोड हे कुटुंबासह गाडीने (एमएच१२/एक्सक्यू५९९८) मांडवा (ता. जामनेर) येथून धूलिवंदन साजरे करण्यासाठी सासरवाडी (वाघला कोंगानगर, ता. चाळीसगाव) येथे येत होते. नागद गावापासून काही अंतरावर असताना एक दुचाकीस्वार आडवा आला. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटून कार पुलावरून खाली कोसळली. कारचा आवाज आल्याने येथील मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली असता,…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलाच्या अपहरणाच्या संशयावरुन तलवार घेत पाठलाग करीत तरुणाने एका प्रार्थनास्थळाबाहेरील माठ व इतर साहित्याची नासधूस केली. ही घटना रविवारी (१६ मार्च) वाल्मिक नगरात घडली. याप्रकरणी प्रवीण रमेश कोळी (३०, रा. वाल्मीक नगर, पिंजारी वाडा) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह अपहरण करणाऱ्या अज्ञाताविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाल्मिक नगर परिसरात अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना काही जणांनी त्याचे अपहरण केल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. त्या वेळी प्रवीण कोळी हा तलवार घेवून त्या इसमांच्या मागे गेला. अपहरण करणारे एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने हा तरुण त्या परिसरात पोहचला व बाहेर ठेवलेले…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या बाळू उर्फ गौरव धोंडू कोळी या ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या पाठीमागील शेत विहिरीत मृतदेह आढळला. हा तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चिंचोली गावातील बाळू हा दि. १२ मार्चपासून आपल्या घरातून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू होते. दरम्यान या तरुणाचा मृतदेह चिंचोली गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या मागील गोकुळ पाटील यांच्या शेत विहिरीत आढळून आला.

