Author: editor desk

मुंबई : प्रतिनिधी राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या वातावरण तापले असून या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. यावर राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे, असं राणे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. ती कबर उखडून टाकण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे. १७ मार्चला नागपूरमध्ये २ गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण आणखी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उसनवार घेतलेले पैसे परत कर अशी मागणी करीत मीराबाई हंसराज राठोड (५०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या महिलेला दोन जणांनी मारहाण करीत डोक्यात सळई मारून गंभीर जखमी केले. ही घटना १६ मार्च रोजी रात्री रामदेववाडी येथे घडली. सविस्तर वृत्त असे कि, रामदेववाडी येथील रामलाल कोल्हा राठोड हा मीराबाई राठोड यांच्याकडे आला व त्यांच्यामध्ये उसनवारीच्या पैशावरून वाद झाला. यावेळी राठोड याने लोखंडी सळई महिलेच्या डोक्यात मारली. तसेच तर त्याच्या मुलानेदेखील महिलेला मारहाण केली. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी विजय रमेश चव्हाण (वय २८) हे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. ही घटना सोमवारी (१७ मार्च) रात्री दापोरा शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेळीपालन करणारे विजय चव्हाण यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले, मात्र ते पत्नीपासून विभक्त राहत होते. सोमवारी रात्री दापोरा शिवारात रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्याने ते ठार झाले. मयताच्या पश्चात आई, दोन…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही इतरांच्‍या सल्‍ल्‍यापेक्षा स्‍वत:वर विश्‍वास ठेवून निर्णय घ्‍या. मालमत्ता खरेदीब व्यवसायाच्या ठिकाणाजवळ घराशी संबंधित मालमत्ता पाहत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. ही मालमत्ता तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीबाबत तणावपूर्ण परिस्थिती असू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. कार्यक्षेत्रातील महत्त्‍वाच्‍या कामांकडे दुर्लक्ष करु नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज घराच्या देखभाल आणि नूतनीकरणाशी संबंधित योजना आखल्या जातील. खर्चात वाढ होईल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो याची जाणीव ठेवा. नोकरदारांना कामाचे नियोजन करावे लागले. जोडीदाराचा पाठिंबा लाभेल. एखाद्‍या गोष्‍टीचा निष्‍कारण ताण अनुभवाल. मिथुन राशी आज नियोजनबद्ध…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नागपूर हिंसाचारावर मंगळवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावर विधान परिषदेत निवेदन केले. पण मध्येच ते ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडले. त्याचे झाले असे की, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे, असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री घरी कोणी नसताना 22 वर्षीय सोनी चव्हाण हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र ही घटना सोनी चव्हाण यांच्या माहेरी कळल्यानंतर त्यांनी ही आत्महत्या नसून सोनी हिला पती आणि…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींनी महाकुंभाच्या आयोजनावर भाष्य केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमात योगदान देणाऱ्यांचे आभार मानले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याने आपल्या सर्वांना पुढील एक हजार वर्षांसाठी देश कसा तयारी करत आहे, याची जाणीव करून दिली. या वर्षी महाकुंभाने आपल्या विचारांना आणखी बळकटी दिली आहे. देशाची ही सामूहिक जाणीव आपल्याला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची औरंगाबाद नगर परिषद संचानालय येथे बदली झाली असून ही नियमित बदली नसून फार मोठ्या अंतर्गत राजकीय घडामोडी घडल्यानंतर उचल बांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या दणक्याने ही बदली झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात एकनाथराव खडसे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून भ्रष्ट कारभाराविरोधात विडा उचलला होता. आठ चार्ज सीट फाईल करण्यात आल्या होत्या. दोन दिवसापूर्वीच वाघुर येथे मोठा भव्य दिव्य अजय अतुलचा कार्यक्रम सोनवणे यांनी केला त्यानंतर अवघ्या 24 तासात सोनवणे यांना मोठा धक्का देण्यात एकनाथराव…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात आज सोमवारी (दि. 17) रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला. त्यात दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्यात. यामुळे नागपुरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा कुमक मागवली आहे. या घटनेत डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी धावत्या बसमधून १ तोळे सोने लांबविणाऱ्या यवतमाळ येथील दोन महिलांना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाठलाग पोलिसांनी केला. गंगा चैना हातगडे (४०) आणि गंगा सुभाष नाडे (४५, दोन्ही रा. नेताजीनगर, यवतमाळ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (४८, रा. गारखेडा ता. धरणगाव) ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा बसमधून प्रवास करीत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. महिलेने आपल्या पिशवीतील पर्स मध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे आढळले. महिलेने अमळनेर…

Read More