Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  लग्नसराईचा मोसम नेहमीच सोन्याच्या व्यवहाराला चालना देतो. मात्र यंदा वाढत्या दरांनी ग्राहकांची मोठी धांदल उडवली आहे. आधीच चढे भाव असताना आज पुन्हा एकदा सोन्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल २७० रुपयांची वाढ होऊन १ तोळ्याची किंमत १,२९,९३० रुपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यात २५० रुपयांची वाढ नोंदवली जाऊन दर १,१९,१०० रुपये या पातळीवर पोहोचले आहेत. सुवर्ण व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे सोन्याचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमधील कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या धक्कादायक वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना “भाजप तर देवाभाऊमय आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात” असे विधान केले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात लोढा यांनी फडणवीसांचे नेतृत्व अधोरेखित करत त्यांच्याबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. मात्र त्यातील ‘इतर पक्षही देवाभाऊंच्या संकेतावर चालतात’ या विधानाने चर्चांना उधाण आले आहे. लोढा म्हणाले की, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सत्ताधारी पक्षाकडून उपलब्धी मांडल्या जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली. “पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे; पण जनतेच्या पदरी मात्र वर्षभरात निराशाच आली,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधत वर्षभराच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, “महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतमालाला हमीभाव नाही, खत–बियाण्यांचा तुटवडा कायम आहे. मराठवाड्यातील पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.” यापुढे आरोप करताना त्यांनी सांगितले की, “बिल्डर आणि मंत्र्यांच्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकालाबाबत महत्वाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीत कायम ठेवला आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी झालेल्या आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरलाच जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकांच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरपूर्वीच लावण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली असून, नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या सुनावणीत कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी परिसर आज शोकमग्न झाला. शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या गच्चीवर कपडे टांगत असताना उच्चदाबाच्या विद्युत तारेला झालेल्या स्पर्शामुळे बाप–लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. मिळालेली माहिती अशी की, मास्टर कॉलनीत मौलाना साबीर खान नवाझ खान (38) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. सकाळी सुमारास मौलाना यांची भाची मारिया फतेमाबी (16) ही घराच्या गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली असता जवळून जाणाऱ्या हायटेंशन विद्युत तारेला तिचा स्पर्श झाला. अचानक बसलेल्या धक्क्याने ती खाली कोसळताच तिच्या मदतीसाठी मौलानांची मुलगी आलिया…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती चिंताजनक असून ते गेल्या काही महिन्यांपासून उपचार घेत आहेत. ‘शिर्डी के साईं बाबा’ (1977) या चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. सध्या सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत बिघडली असून लीलावती रुग्णालयात 8 ऑक्टोबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज निर्माण झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अनेकांकडून मदत मिळू लागली असून रिद्धिमा कपूर यांनीही मदत केली आहे. दरम्यान, शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून मागितली होती. न्यायालयाच्या मागील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नाशिक जिल्ह्यातील तपोवन परिसरातील 1800 झाडतोडीच्या प्रस्तावावरून रंगलेला वाद आता राजकीय आणि धार्मिक वळण घेताना दिसत आहे. 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याच्या तयारीत प्रशासन गुंतले असताना, प्रस्तावित झाडतोडीला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि अनेक सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. तपोवन हे शहराचे महत्त्वाचे हरितवैभव मानले जात असल्याने झाडतोडीमुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन बिघडेल, अशी नागरिकांची भूमिका आहे. दरम्यान, या वादावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. सोशल मीडियावर त्यांनी पर्यावरणवाद्यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला की, “झाडतोडीवर आवाज उठवणारे ईदच्या वेळी होणाऱ्या बकरी हत्येवर गप्प का राहतात?” त्यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक…

Read More

यवतमाळ : प्रतिनिधी चंद्रपूर–यवतमाळ महामार्गावर वेग आणि चुकीच्या ओव्हरटेकमुळे गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अंदाजे १४ जण जखमी झाले आहेत. मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ रात्री आठच्या सुमारास एसटी बस आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेची तीव्रता इतकी भयानक होती की एसटी बसची ड्रायव्हर साइड अक्षरशः दबून वाहनाचा पुढील भाग दोन तुकड्यांत विभक्त झाला. वणीवरून करंजीकडे निघालेली एसटी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. दरम्यान, करंजीकडून येणाऱ्या ट्रकचालकाने वेगाने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी ट्रक थेट बसवर जाऊन आदळला. धडकेनंतर बसचे सांगाडे रस्त्यावर विखुरले व प्रवाशांच्या भीषण किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. अपघातानंतर स्थानिक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी गणेश भगवान माळी (वय ३१) यांच्यासह सुनिल रामदास सुरवाडे या दोघांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास सोनी नगरात उघडकीस आली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांकडून त्या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगरात गणेश माळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ इलेक्शन कॅम्पीनिंगचे काम करीत असल्याने दोघ भाऊ गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रावेर येथे मुक्कामी होते.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.५ डिसेंबर २०२५ मेष राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचे कनिष्ठ तुमच्याकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील. आज तुमच्या कामात राजकीय संबंधांचा तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशी आज कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद राखल्याने आनंद वाढेल. आज तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. मिथुन राशी आज तुमचा दिवस नव्या उत्साहाने सुरू होईल. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. तथापि, आर्थिक व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कर्क राशी आज तुम्ही काम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये संतुलन राखाल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन मार्गांचा विचार कराल. तुमची आर्थिक…

Read More