Author: editor desk

मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांचा एकमेव उद्योग म्हणजे टोमणे मारणे आणि टीका करणे असा घणाघाती आरोप शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे, याच्याशी तुम्हाला काय देणे-घेणे? तुम्ही तुमचे पाहा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिरसाट म्हणाले, “तुमचे स्वतःचे अस्तित्व काय आहे, हे आधी पहा. स्वतःच पक्ष सोडून आता इतरांच्या पक्षात नाक खूपसण्याचे कारण काय?” आम्ही कसे काम करतो हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आमच्या पद्धतीवर टीका करून काहीही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवरूनही शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. “दिल्लीला जाऊन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या कामाचे बिल अदा केले जात नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कामकाज थांबवून दालनाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडून ठेवले. हा धक्कादायक प्रकार ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत घडला. या प्रकरणी ठेकेदार नीलेश रमेश पाटील (रा. दादावाडी) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांच्या बिले रखडली आहेत. अलीकडे काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व ठेकेदारांना अंशतः रक्कम देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. ठेकेदार नीलेश पाटील याचे बिलही प्रलंबित असल्याने…

Read More

धरणगांव : प्रतिनिधी गुह रक्षक दलातर्फे ७९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातून सवाद्य पथसंचलन करण्यात आले शहरातील सुरक्षा व शांती प्रस्थापित करण्यासाठी गृहरक्षक दल आपले करत असलेले कार्याची जनतेला ओळख करून देण्यात आली दि 6 डिसेंबर 1946 साली गुह रक्षक दल अर्थात् होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्या निमित्ताने होमगार्डस् जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव श्री अशोक नखाते यांचे आदेशान्वये तसेच प्रशासकीय अधिकारी श्री रामनाथ काळे केंद्र प्रमुख श्री गंगाधर महाजन सामग्री प्रबंधक सुभेदार श्री मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका समादेशक होमगार्ड अधिकारी श्री ईश्वर सखाराम महाजन यांच्या नेतृत्वात धरणगांव होमगार्ड…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळा, कॉलेज सोडून शहराबाहेर निर्जनस्थळी प्रेमचाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर धडक कारवाई केली. तर मुलांच्या पालकांना बोलावून त्याना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील अल्पवयीन मुले, मुली अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, शहराबाहेरील मंदिरे, शिवाजी बगीचा आदी ठिकाणी तसेच काही निर्जन स्थळी शाळा, महाविद्यालय सोडून प्रेमचाळे करत असल्याची तक्रार केली जात होती. तर पो.नि. दत्तात्रय निकम यांनी याची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले. पो.नि. निकम यांनी मोनिका पाटील, नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलींद सोनार, गजेंद्र…

Read More

गोवा : वृत्तसंस्था देशातील गोवा राज्यातून एक भीषण आगीची घटना घडली आहे उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईटक्लबमध्ये आग लागली आणि काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला वेढले. या घटनेत किमान २५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या दुःखद घटनेचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आग कशी वेगाने पसरली हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे, ज्यामुळे क्लब धुराने आणि ज्वाळांनी भरला. दूरवर सायरनचे आवाज ऐकू येतात. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी याविषयी माहिती दिली. त्यानुसार,”प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे दिसून येते.” असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “ही घटना रात्री १२:०४ वाजता घडली. पोलिस, अग्निशमन दल आणि…

Read More

मेष राशी आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय ठेवा. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. वृषभ राशी काही कारणास्तव तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना बनवाल आणि या योजना यशस्वी होतील. मिथुन राशी तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुम्हाला मौल्यवान मदत करेल. तुमच्या व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक कार्यक्रमात पैसे खर्च होऊ शकतात. कर्क राशी तुम्ही तुमच्या कामाकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहाल. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कौटुंबिक खर्च…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी मुंबईतील दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला सत्ताधारी व विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी कोणता निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच या प्रकरणी निदर्शने केली होती. नरेंद्र जाधव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला कायद्याच्या कचाट्यात पकडले आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे. संविधानात उपमुख्यमंत्री पदाची तरतूदच नाही. जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल, तर हे असंविधानिक पद तात्काळ रद्द करा. उपमुख्यमंत्र्यांकडे जी खाती आहेत त्या खात्यांचे पूर्ण मंत्री त्यांना बनवा. तिजोरीच्या चाव्या द्यायच्या असतील तर द्या, बाथरूमच्या चाव्या द्या, पण उपमुख्यमंत्री हे बिरुद लावण्याची गरज नाही, अशा शब्दांत उद्धव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील घटकपक्षांमध्ये सध्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यामुळे भाजपचा ॲॅनाकोंडा या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महायुतीवर निशाणा साधला. शिवसेना ठाकरे गटात शनिवारी मुंबई व उपनगरातील अनेक पक्षप्रवेश झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, विरोधी पक्षनेत्यांचा अभाव, मतदारयाद्यांतील सावळा गोंधळ, भाजपची कथित दंडेलशाही आदी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्या निवडणुकीचा सीजन सुरू आहे. त्यात गडबड घोटाळेही सुरू आहेत. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांचा वाईट अनुभव येत आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अयोध्याहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर शनिवार पहाटे काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे सुमारे ४ वाजता हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणे होळ येथील अंदाजे ४० भाविक रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर बसने प्रयागराजकडे रवाना झाले होते. सुलतानपूरच्या कुरेभर चौकाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले.  उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी…

Read More