Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन दोन बहिणींना दि ५ रोजी शहरातील एका महाविद्यालाच्या आवारातून बेपता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दि ६ रोजी मंगळवारी जिल्हापेठ पोलीसात केली होती. जिल्हापेठ पोलिसांनी तीन दिवसात आपली तपासचक्रे फिरवीत त्या दोन मुलीसह तीन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वृत्त असे की. दोन्ही बहिणी जळगावला काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्या एसएनडीटी महाविद्यालयमध्ये गेल्या होत्या. तेथून त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तीन दिवस अथक तपास करून त्यांचा माग काढला. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींचा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजासंदर्भातही त्यांनी सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या दि ११ रोजी दिल्लीत पार पडणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती श्री देवकर यांनी पवार यांना दिली. त्यानंतर श्री पवार यांनी पुढील दिशानिर्देश देवकर यांना दिले. यासोबतच जिल्हा…

Read More

नेरी ता.जामनेर : वार्ताहर नेरी बु। येथील अनमोल मित्र बहुउद्देशीय संस्था संचलित अनमोल कोचिंग क्लासेस,अनमोल बेकरी,अनमोल चायनीज,अनमोल ग्राफिक्स,अनमोल ब्युटीपार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 76 गणेश मित्र मंडळाचे एकजुट व एकत्रितपणे साजरा करीत असलेला गणेशोत्सव कौतुकास्पद मानून प्रत्येक मंडळ अध्यक्ष किंवा सदस्य यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन अनमोल परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नेरी बु। येथील वाघूर गणेश मित्र मंडळ,जय भारत गणेश मित्र मंडळ,जय बजरंग गणेश मित्र मंडळ,महावीर गणेश मित्र मंडळ,नेरी दिगर येथील जय भवानी गणेश मित्र मंडळ,जय मल्हार गणेश मित्र मंडळ,नवशक्ती गणेश मित्र मंडळ,जय लेवा गणेश मित्र मंडळ,जोगेश्वरी गणेश मित्र मंडळ,शिवनेरी गणेश मित्र मंडळ,देवपिंप्री येथील शिवशक्ती गणेश मित्र…

Read More

पुणे : वृत्तसंस्था लोक पैशासाठी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही पुण्यातील पिंपरी भागात अवघ्या ७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा होता त्याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहतीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर सापडला आहे. मुलाच्या वडिलांना आरोपींनी तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्याने आरोपींनी चिमूकल्याला ठार मारले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य ओगले (वय 7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पिंपरीतील मसुलकर कॉलनी येथे राहत होता. आदित्यच्या अपहरणाबाबत वडील गजानन श्रीकांत ओगले (वय 49) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. मात्र, शोध लागण्यापूर्वीच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर जळगाव शहरातील 4284 घरगुती श्रींचे संकलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक येऊन स्वत:च्या घरची श्रींची मुर्ती विसर्जनासाठी अर्पण केली. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर संकलन केंद्र नागरीकांच्या सेवेत सुरू होते. ट्रक व ट्रॅक्टर यांच्या 9 फेऱ्या करून या मुर्तींचे विधीवत मेहरूण तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी 5 ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष पियुष हसवाल, गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रितम शिंदे, हर्षल तेली, समिर कावडीया, भवानी अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे,…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका महिलेस मुलगी झाल्यामुळे तसेच रसवंतीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे, या कारणासाठी नेहमी पैशाची मागणी करीत पिडीतेला नेहमी मारहाण व शिवीगाळ तर मानसिक त्रास दिल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील अकुलखेडा येथील माहेरवाशीण असलेल्या सौ.माया सोमनाथ नन्नवरे (वय ३३,धंदा- घरकाम रा. पुणतांबा ता.राहाता जि अहमदनगर ह. मु. अकुलखेडा ता चोपडा) यांचा २०१६ मध्ये पुणतांबा येथील सोमनाथ शांताराम नन्नवरे यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाने विवाह झालेला आहे. त्यानंतर पहिली मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून सोमनाथ नन्नवरे पती, शांताराम पांडुरंग नन्नवरे सासरे, मथुराबाई शांताराम नन्नवरे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला कुणी तरी पळवून नेले आहे. या तरुणीचे वर्णन रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ४ फुट ३ इंच, अंगात आकाशी रंगाचा टॉप तर पांढऱ्या रंगाची पेन्ट परिधान केले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या राहत्या घरातून दि ८ रोजी १० वाजता पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आबेहोळ येथील एका घरात चोरट्यांनी १ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आबेहोळ येथील रहिवासी विठ्ठल हंसराज चव्हाण (वय ३५) धंदा मजुरी, रा.आंबेहोळ ता.चाळीसगाव यांच्या घराची भिंत दि ९ रोजी रात्रीच्या सुमारास फोडून चोरट्यांनी घरात घुसून कानातील सोन्याच्या २ रिंग २५ हजार रुपये किमतीच्या, हातातील चांदीचेकडे १५ हजार रुपये किमतीचे, ५०० रुपयाच्या १२० नोटा ६०००० रुपये असा एकूण १ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी विठ्ठल हंसराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील एका अंगणवाडीतून चोरट्यांनी ३ हजार रुपयाचा मुलांना आणि गरोदर महिलांना देण्यात येणारा कच्चा आहाराची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने गावातील अंगणवाडी क्रमाक १८ मधील दि ८ रोजी दुपारी १ ते ९ रोजीच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणवाडीच्या खोलीचा दरवाजाच्या कडीकोयडा तोडून लहान मुलं व गरोदर महिलांना वाटप विना शुल्क वाटप करण्यात येणारा कच्चा आहार कुणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. त्यामध्ये गहूचे १० पाकीट १ हजार रुपयाचा, हरभऱ्यांचे १० पाकीट ५०० रुपयांचा, साखरेचे ५ पाकीट २०० रुपयाचे, मिठाचे ५ पाकीट १०० रुपयाचे, मिरची पावडर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली आज. जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान याबाबत आमदार लताताई सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील…

Read More