जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री चांगलाच राडा झाला. विसर्जन मिरवणुकीत चक्क महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडल्यामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेली माहिती अशी की, मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्रीताई महाजन यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ‘एक गाव एक गणपती’ व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात होती. यावेळी एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले. यानंतर त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक करायला सुरुवात केली. यामुळे दोन…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात काही ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून कुठलाही संशयित व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यातून पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तालुक्यातील पष्टाणे, सोनवद, कल्याने होळ या गावांमध्ये मागील विसर्जनाच्या दिवशी घरफोडी गुन्हे झालेले आहेत. तेच मोटर सायकलस्वार आज रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाचा फायदा घेऊन पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्या ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून आज कोणत्याही परिस्थितीत रात्रग्रस्त करून आपले गाव सुरक्षित ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारे…
जळगाव : प्रतिनिधी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंब रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. भगवान नामदेव राठोड (वय-१८) रा. समता नगर जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदिवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणासांबत भगवान देखील पाण्यात उतरला.…
जामनेर : प्रतिनिधी गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची दु:खद घटन जामनेरमध्ये घडली आहे. किशोर राजु माळी (२७, रा.गणेशवाडी, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन सुरु होते. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणल्यावर त्याच्या पत्नी व मुलांनी एकच आक्रोश केला. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने जामनेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
धरणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याचे अजूनपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तर अनुदानही दिलेले नसल्यामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे. गतवर्षी २०२१-२०२२ या वर्षामध्ये गंगापुरी व तालुक्यातील गावामध्ये अतीवृष्टी झाली होती. त्यामुळे सोनवद महसूल मंडळातील गंगापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने त्याचे नुकसानीचे पंचनामे करून अनुदान देखील तालुक्यातील काही मंडळांना मिळाले पण आपल्या महसूल मडळाला अजून एक पण हफ्ता मिळाले नाही. तालुक्याचे शेतकरी तालुक्याचे नेते राजेन्द्र किसन पाटील यांनी धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री सातपुते यांना शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. सोबत…
धरणगाव : प्रतिनिधी सोनवद परिसरातील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबावरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अधिकारी कुठलीही उपाययोजना करीत नसल्याचा तीव्र निषेध शेतकऱ्यांनी आज केला. सविस्तर वृत्त असे की, येथील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबा वरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरी केलेले आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष भेटून सुद्धा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत आहेत सध्या स्थितीत पावसाने उघडी प दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला पाण्याचे अत्यंत गरज आहे तरी खांब्यावरील तार त्वरित बसून मिळावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मासे विक्रेत्याकडून घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शंकर अशोक भोई (रा.नगरदेवळा ता.पाचोरा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २ सप्टेंबर रोजी ४.३० वाजेच्या पिडिता घरी आंगणात एकटी बसलेली होती. यावेळी गावात नेहमी मासे विक्री करणारा शंकर अशोक भोई (रा. नगरदेवळा ता. पाचोरा) हा आला होता. त्याने मासे हवेत का?, अशी विचारणा केली. त्यावर पिडीत महिलेने पतीला फोन लावून मासे घेण्याबाबत विचारणा केली. परंतू पतीने नकार दिल्यामुळे पिडीत विवाहितेने मासे विकत घेण्यास नकार दिला. त्यावर शंकर भोई याने मासे…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पष्टाणे येथे साडेचार लाखांचे दागिने आणि ४५ हजाराची रोकड असा एकूण तब्बल ५ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सविस्तर वृत्त असे की, कल्याणे होळ गावातील अनिल वना पाटील यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ सप्टेंबरची रात्री ९ ते ७ सप्टेंबरच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने अनिल पाटील यांचे बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने आणि ४५ हजार रुपयाची रोकड असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी देखील अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील मुंबई गल्लीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनव पती देविदासने केला. अगदी पोलिसात खबर देतांना त्याने आत्महत्यानंतर ती खाली पडून आली…
जळगाव : प्रतिनिधी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू घटना घडली आहे. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७) आणि सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५ , दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर ९ वीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे यातून बचावला आहे. तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी असून ते तलावात पोहण्यासाठी आज दुपारी धारागिरी शिवारात असलेल्या तलावात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा थोडक्यात बचावला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल,…

