जळगांव : प्रतिनिधी गणेशोत्सव निमित्त मेहरुन तलाव परिसरात दरवर्षी प्रमाणे गणेश घाटात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात प्लास्टिक पिशवी, निर्माल्य असतात. त्यामुळे पाणी दूषित होऊ नये या अनुषंगाने जळगांव प्लॉगर आयोजित स्वच्छता अभियानात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मौलाना आझाद फाऊंडेशन या संस्थांनी सहभाग नोंदवला व मेहरुन तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आले. जळगांव प्लॉगर्स चेतन जैन, ओम साहित्य, खुशी सांगोर,रेवती पाटील,कुणाल भंगाळे,हितेश नेरकर,घनश्याम सूर्यवंशी,प्रयाग पाटील,संभव मेहता, मनिषा पाटील, नुतन तासखेडकर, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, भारती कापडणे,गायत्री चौधरी,कविता पाटील,आशा मौर्य,मनोज भालेराव,सलीम इनामदार, इम्रान शेख, प्रेम केळकर, नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा.) बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेशयेथील रहिवासी आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.
मुंबई : प्रतिनिधी दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरू असताना आता करुणा मुंडे यांनी देखील भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मी वंजारी समाजाची सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटलेय. त्यामुळे या मेळाव्याचा वादही पेटण्याची शक्यताय. नामदेव शास्त्रींची भेट घेणार : करुणा मुंडे म्हणाल्या की, मी लवकरच दसरा मेळावा घेणार आहे. दसऱ्याला माझी मुलगी शिवानीचा वाढदिवसही असतो. शेतकरी संघटनांना सोबत घेऊन हा मेळावा घेणार आहे. यात अतुल खोपसे, विष्णू कसबे माझ्यासोबत असणार आहेत. लवकरच नामदेवशास्त्रींची याबाबत परवानगी मिळवण्यासाठी भेट घेणार आहे. 5-6…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा.) बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेशयेथील रहिवासी आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.
नशिराबाद : प्रतिनिधी एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी संबध ठेवत ७ महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका १७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबध प्रस्थापित करत तिला सात महिन्याची गर्भवती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडित युवतीच्या वडिलांनी दि १२ रोजी नशिराबाद पोलीस स्थानकात धाव घेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते शेतकर्यांशी बोलत होते. दरम्यान, सध्या गुरांवर लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला असून याचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे निर्देश आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, याप्रसंगी त्यांनी आमदार निधीतून पाथरी ते जवखेडा रस्ता तयार करून देण्याची ग्वाही दिली. सध्या गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून आज ना.…
जळगाव : प्रतिनिधी शहराजवळ कांताई बंधारा नागाई-जोगाई मंदिर परिसरात शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एक तरुण बेपत्ता होता. अखेर मागील १३ तासांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. शहराजवळ कांताई बंधाऱ्याजवळ दुपारी 2 मुली आणि 2 मूल बुडाले होते. यापैकी 2 तरुणी व 1 तरुणास पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहे. मात्र नयन योगेश निंबाळकर (वय १७) हा तरुण सापडला नव्हता. नयनला शोधण्यासाठी महानगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे पथक, पोलिस प्रशासनासोबत जैन इरिगेशनच्या पथकाने प्रयत्न…
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात. कधीकधी अशी परिस्थिती येते की, पैसे उधार घेण्याची इच्छा नसते मात्र गरजच इतकी असते की पैसे उधार घ्यावे लागतात. यावेळी तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र किंवा बँकेकडून पैसे कर्जाच्या स्वरुपात घेता. परंतु जेव्हा तुम्ही घेतलेले पैसे परत करू शकत नाही तेव्हा समस्या अधिकच बिकट होते. बऱ्याचवेळा पैशांची जुळवाजुळव करुनही तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नाही. कधी कधी परिस्थिती अशी येते की तुम्हाला कर्जापेक्षा व्याजच अधिक द्यावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार, हे सर्व घडते कारण तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिवस आणि नियम लक्षात न ठेवता व्यवहार करता. दरम्यान, ज्योतिष शास्त्रात आठवड्यातील कोणत्या दिवशी तुम्ही पैशाशी संबंधित व्यवहार…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंड पुलावर गणपती विर्सजनाची आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या एका भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत तरुण ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुंड पुलावर दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चिखली येथील काही तरुण विसर्जनासाठी आले होते. यावेळी गणपती विर्सजनदरम्यान श्री गणेशाची कुंड पुलावर आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या नवीन आयसर गाडीवरील ड्रायवरने (नाव-गाव माहीत नाही) त्याच्या ताव्यातील आयशर गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवित आणून भागवत ऊर्फ शंकर कांडेलकर (कोळी, वय-२७ रा. चिखली) यांच्या मरणास तसेच इतरांना जखमी केले. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. बाराव्या भारतीय…

