चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गलंगी येथील 45 वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून सावत्र खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सहाबाई मगन बारेला (45, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या खून प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून पोलिसांनी सावत्र मुलगा दीपक मगन बारेला (25) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बारेला यांची सहाबाई बारेला ही सावत्र आई असून ती मुलाला वागणूक व्यवस्थित देत नसल्याने या प्रकाराला दीपक वैतागला होता. रविवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला.यातूनच संतप्त मुलाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर…
Author: editor desk
औरंगाबाद : वृत्तसंस्था अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे गटातील संदिपान भूमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. या पदावर वर्णी लागताच भूमरे यांनी दोन मोठे दावे केले असून, त्यांच्या या दाव्यांनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून, यावरून चांगलेच वातावरण तापलेले असून, येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरीच्या काळात मविआ आणि भाजपमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप करण्यात येत होते. एवढेच नव्हे तर, खुद्द…
मोठा वाघोदा (ता. रावेर) : प्रतिनिधी महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी दि.२३ रोजी घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता. भारतीक बाबा भागाजवळ खखड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे युवकाचा तोल गेला व समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन चिमुकल्यांचे वडील व परिवारातील एकुलता एक कमवता सदस्य गेल्याने पत्नीवर व चिमुरड्यांना पडलेला आहे. संबंधित विभागाला अजून किती निष्पापांचा बळी घेतल्यानंतर जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खड्डे बुजविण्याचे नावाखाली कच्चा मुरूम टाकला जातो व वेळ मारून नेली जाते. खड्ड्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी,…
जयपूर : वृत्तसंस्था राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत आपला राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी अशोक गेहलोत शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून येत्या १७ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती पण गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी नवी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. अशोक गेहलोत यांना समर्थन…
नंदुरबार : वृत्तसंस्था तालुक्यातील शहादा– प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावानजीक शहादाकडे जात असलेल्या बैलगाडीस्वारास मागून येणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिली. यात बैलगाडीस्वार शेतकरी जागीच ठार झाला असून बैल देखील ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. सदरील घटना आज दि २५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. लांबोडा येथील शेतकरी हरसिंग सरदार सिंग गिरासे (वय 50) हे आपल्या शेतात कल्टीवेटर करण्यासाठी बैलगाडीने जात होते. या दरम्यान नंदुरबारकडून शहाद्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने दालमिल समोर जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीस्वार हरसिंग सरदारसिंग गिरासे (रा. लांबोळा) हे शेतकरी जागीच ठार झाले. याशिवाय अपघातात एक बैल देखील ठार झाला असून दुसरा…
परभणी : वृत्तसंस्था शिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. याच भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार हे परभणीमध्ये बोलत होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आमच्याकडे चार-पाच आमदार आणि दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावत असेल, तर त्याच्या अरेला कारे करा. त्याने एक मारली तर चार मारा. अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर…
पुणे : वृत्तसंस्था शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कालपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांकडून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर वातावरण पेटलं असून शिवसेनेने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी PFIच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्यामुळे शिवसेनेने पुण्यातीलच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, लाथाबुक्क्या मारत फाडला. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी आज दि २५ रोजी सकाळी शहरातील बजरंग बोगदा येथे मालवाहू गाडी अमृत योजनेच्या खड्ड्यामध्ये अडकल्याने सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. परतू या भोंगळ कारभाराविरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दुर्गेश दुर्गेश निंबाळकर यांनी मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर रेखोट्या ओढल्या आहे. शहरात गेल्या कित्येक दिवसापासून अमृत योजनेचे पाईप लाईनचे काम सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी काम झाले त्यठिकाणी पडलेले खड्डे मात्र व्यवस्थित बुजले जात नसल्याने दुचाकी व मालवाहू गाडी फसत आहे. आज दि २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील प्रेम नगर जवळील बजरंग बोगदा येथे एक मालवाहू गाडी या खड्ड्यात फसली सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत…
चोपडा : प्रतीनिधी महाराष्ट्र राज्य वाहतूक परिवहन महामंडळ चोपडा आगार येथे एन.एस.यू.आय.च्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील व तालुकाध्यक्ष काँग्रेस चोपडा प्रा.प्रदीप पाटील व परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र देवकांत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव एन एस यु.आय. काँग्रेस महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. चोपडा बस स्थानकात अत्यंत अस्वच्छता दिसून येत आहे या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रास होत असल्याने या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती नाकारता येऊ शकत नाही, तरी आपण याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि महाविद्यालय व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या मागील बाजूस असलेले धनाजी काळे नगरात एक कॅटरिंगचे गोडावून आहे. याठिकाणी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील धनाजी काळे नगरात पुरुषोत्तम मांगो चिमणकर (वय ३२) रा.पिप्राळा यांचे कॅटरिंगचे गोडावून आहे. या ठिकाणी दि २३ ते दि. २४ रोजी संशयित आरोपी राजकुमार विश्वकर्मा (वय २४) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोडावूनचे दरवाज्याचे कडी कोयडा तोडून गोडावून मधून चोरी केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आली. या गोडावून मधील सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे स्टीलचे भांडे…

