जळगाव प्रतिनिधी । जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी करून दोन्ही कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात तीन जणांवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात दोन कुटुंबिय एकाच भागात राहतात. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकामेकांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता धाव घेवून एकमेकांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या समोर रस्त्यालगत उभी दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चिंतामण भास्कर पाचपांडे वय २५ हा तरुण रेमंड कंपनीत कंत्राटी तत्त्वावर इलेक्ट्रिशिअन म्हणून कार्यरत आहे. १३ फेब्रुवारी रोजी चिंतामणी हा नेहमीप्रमाणे त्यांच्या एम एच १९ डी सी ११७१ या क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीत आला. कंपनीच्या समोर बाहेरील बाजूस दुचाकी उभी केली. ड्युटी संपल्यानंतर घरी जायला निघाला असता दुचाकी दिसून आली नाही . सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळुन न आल्याने अखेर ४ दिवसांनंतर चिंतामण पाचपांडे यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली या तक्रारीवरून ३० हजार रुपयांची दुचाकी चोरीस…
जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद महामार्गावर भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश रमेश चौधरी (वय-३२) रा. चिलगाव ता. जामनेर जि. जळगाव हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरून विमानतळाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच ४६ एएफ ३८७१) मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार अविनाश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अविनाश चौधरी यांच्या…
भडगाव प्रतिनिधी । भडगाव येथे भरधाव जाणाऱ्या कारने जोरदार दिलेल्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात घडला असून चालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दिपक सोनवणे (वय १५ रा. यशवंत नगर, भडगाव ) व त्याचा मित्र पंकज भारत भोई (रा. भोईवाडा, भडगाव ) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे (वय ४६) हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल क्र. (एम.१९ सीसी ४३७५) ही १५ फेब्रुवारी रोजी पंचर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे व त्याचा…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीड मंडळाच्या वतीने आयोजित १८ वर्षीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंमत आबा पाटील यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीडा मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १८ वर्षीय वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील यांच्याकडून दिले गेलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस विखरण ता.एरंडोल यांनी पटकावले. माजी सरपंच नंदलाल पाटील यांनी दिलेले दुसरे बक्षिस हे साई लीला ग्रुप चिखलोद या संघाने पटकावले…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीपत्नीवर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी रोजी महिलेच्या मोबाईलवर गोपाळ हरीचंद्र इंगळे याने फोन केला. त्यानंतर त्याने अश्लिल शब्द बोलून विवाहितेचा विनयभंग केला. त्यानंतर काही वेळीनंतर गोपाळची पत्नी रंजना गोपाळ इंगळे हिने महिलेच्या मोबाईलच्या व्हॉटस्ॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून सोशल मीडियात बदनामी केली. तसेच गोपाळ याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याला कंटाळून महिलेने मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला एरंडोल गावानजीक रस्त्यातच गाठत अज्ञात तीन दरोडेखोरांनी मारहाण करीत चार किलो चांदीसह दुचाकी व मोबाईल असा एकुण ९ लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री रहिवासी सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे समर्थकृपा नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी २ वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यानुसार आज बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लक्ष ठेवून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांनी…
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा या नराधमाला अवघ्या ६० दिवसात विशेष न्यायालयाने दोषी ठरवत आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षाची चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो असे सांगून आरोपी सावळाराम भानुदास शिंदे याने चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात पोक्सो कायद्यांतर्गत सावळाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सावळाराम शिंदे याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक करून…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेस्कोमाता नगरात राहणाऱ्या तरूणाची घरासमोरून मध्यरात्री दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, बादलसिंग भिमसिंग जोहरी (वय-४०) रा. मेस्कोमाता नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बेनटेक्स ज्वेलरी व्रिकी करून आपला उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय करण्यासाठी (एमएच १९ डीजी ८६६) क्रमांकाच्या दुचाकीचा वापर करतात. १० फेब्रुवारी रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री घरी आले. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी सकाळी ५ वाजता उघडकीला आली.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याचे गोचोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे,…

