भडगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे शिवारात वनविभागाच्या जागेवर राहत असलेल्या मजुराला चाकूचा धाक दाखवत बकऱ्या चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, बापू खंडू पाटील (वय-६५) रा. वलवाडी ता. भडगाव जि. जळगाव हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बकर्या व बकऱ्यांचे पिल्ले असून ते जोडधंदा करतात. दरम्यान गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ४ बकऱ्या व ४ पिल्ले जबरी चोरून नेले…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचा मारहाणीचा जाब विचारल्याचा कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश साहेबराव सोनवणे (वय-३२) रा. बेघरवस्ती खरजई ता.चाळीसगाव हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे रा. बायपास रोड, चाळीसगाव याने यापूर्वी गावातील पिंटू शिंदे या मुलाला मारहाण केली होती. यासंदर्भात बुधवारी २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता सतीश सोनवणे याने मुलाला का मारहाण केली? असा जाब प्रवीण सोनवणे यांना विचारला. याचा राग आल्याने प्रवीणने सतीशला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरवात…
जळगाव प्रतिनिधी । राज्यपाल यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त केलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अभिनंदन करून कौतूक केले अहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भिकन सोनार यांना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल २१ मार्च रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. दोघांना एका कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भकिन सोनार यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या लिस्ट स्वरूपाचे गुन्ह्यांचा तपास सातत्यपूर्ण केल्याने…
जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. कन्हैय्या किसन खासले (वय-२०) रा. सुप्रिम कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याबाबत माहिती अशी की, कन्हैय्या खालसे हा पत्नीसह सुप्रिम कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कन्हैय्याची पत्नी हे घराबाहेर कामानिमित्त गेल्यानंतर कन्हैय्या एकटाच होता. त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यावर पतीने गळफास घेतल्याचे दिसताच एकच आक्रोश…
पाचोरा प्रतिनिधी । सबसीडी बँकेत अदा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्विकारणाऱ्या कृषि सहाय्यक अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने पकडले आहे. कारवाईमुळे पाचोरा कृषी विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर आठ एचपीचे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर खरेदी करण्यात आले व या योजनेंतर्गत मिळणारी ८५ हजारांची सबसीडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल…
यावल प्रतिनिधी । यावल तहसिल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या करीता घंटानाद आंदोलन केले व काळ्या फिती लावुन कामकाज केले कर्मचाऱ्यांच्या शासना कडे प्रलंबीत मागण्या संर्दभात टप्प्या टप्प्याने ओदालन केले जात आहे. पुढील टप्पात २८ मार्च ला संप तर ४ एप्रिल पासुन बेमुदत संप कर्मचारी करणार आहे. राज्यातील महसुल विभागातील महसुल सहाय्यकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असुन एका महमुल सहाय्यकाको २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तनावात असुन महमुल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ होत आहे. तसेच अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन…
यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सूत गिरणी भाडेतत्वावर देण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना निवेदन देऊन केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील एकमेव रोजगार असणारी सूतगिरणी ही अनेक वर्षांपासून बंद आहे. दरम्यान सुतगिरणीच्या संचालकांनी निर्णय घेऊन विक्री करण्याचा विचार केला आहे. परंतु सुतगिरणी विक्री न करता ती भाडेतत्त्वावर देण्यात यावी. जेणेकरून यावल शहरातील व तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. यावल शहरातील व तालुक्यातील एकेकाळी वैभव समजल्या जाणाऱ्या शेतकरी हिताचा व कामगारांची सूतगिरणी या मोठ्या प्रकल्पावर मालमत्ता जप्तची वेळ आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील उद्योगतीकडे वाटचाल…
मुंबई प्रतिनिधी । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिलाय. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा, अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. यामुळे एकप्रकारे महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले…
जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथून जवळ असलेल्या शिवारातील शेतकऱ्याच्या घराला अज्ञात व्यक्तींनी भरदिवसा आग लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, गणेश पुंडलिक ठाकरे रा. वाल्मिक नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शिरसोली येथे त्यांची शेती असून शेताच्या बाजूलाच राहण्यासाठी घर आहे. त्याठिकाणी गणेश ठाकरे यांचे आई वडील राहतात. गणेश ठाकरे यांचे भाऊ यांचे १७ मार्च रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने आई वडील हे जळगावात आले होते. शिरसोली येथील घर बंद होते. यादरम्यान २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रोजी अज्ञात…
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गारवा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल वय 38 रा. नवनाथ नगर,वाघनगर जळगाव, असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोकूळ अडकमोल रा. नवनाथ नगर, वाघनगर हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो जळगाव भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. १८ मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशीराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. याठिकाणी रात्री ११ वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा…

