पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी सकाळी गल्लीतील गणेश पाटील या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. परंतु मुलगी कुठेही मिळून आले नाही, अखेर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गणेश पाटील या मुलाविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
वरणगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारे ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय-३८) हा तरुण ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती प्रयत्न करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. याप्रकरणी महिलांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी संदीप लखींचेद बनवे याच्या विरोधात तक्रार दिली आहे.…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी देखील पोतोडी शिवारात गावठी हातभट्टी उध्दवस्त केली संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी नुकतीच बदली करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात सुरू असलेले अवैध धंद्यांवर अंकूश लावण्यासाठी कारवाईचा बडगा उठविला आहे. दरम्यान रविवारी तीन ठिकाणी कारवाई केल्यानंतर आज सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोतोडी शेत शिवारात सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास स्वत: पो.नि. शेकळे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहू बोरकर, पोहेकॉ संतोष चौधरी, गणेश मनुरे, पोना…
जळगाव प्रतिनिधी । जोशीपेठेतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ३० हजाराची लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. शहरातील जोशी पेठ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने अर्ज केला होता. या कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी, (वय-५५) रा. जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेज, जळगाव याने आपले कार्यालयातील वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्याची बतावणी करत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. व नोकरी लावून देतो असे सांगून २ लाख १० हजाराची लाचेची मागणी केली. पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कारवाईचा धडका लावला आहे. तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारातील गावठी हातभट्टीवर कारवाई करत सुमारे १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नारवेल शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची गोपनिय माहिती नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी बोरकर, मनुरे मेजर यांच्या इतर १० पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी १० एप्रिल रोजी दुपारी अंतुर्ली व नारवेल शेत शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून सुमारे १ लाख ६५ हजाराचा…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नांदेड ते रोटवद फाटा दरम्यान भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालक जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना चालक भैय्या मधूकर बारी (वय-२४) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक भैय्या बारी हा जागीच ठार झाला तर इतर अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर चौघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जळगाव…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील ग्रामदेवता कुलदैवत श्री एकविरा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार 9 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन नुसार सर्व प्रथम एकविरा देवीची ग्राम प्रदक्षिणा उत्साहात आनंदात काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व समाजाचे, पंथाचे ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. तुळशी कळस घेऊन चालणाऱ्या महिला,भजनी मंडळ, वही गायनाचा कार्यक्रम मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. या ग्राम प्रदिक्षणेते ग्रामस्थ देवीच्या दर्शनाचा लाभ घेत होते.या नंतर दुसरे दिवशी गणपती पूजन, पुण्याहवाचन पिठस्थ देवता स्थापना विविध धार्मिक विधी भाव भक्तीने पार पडले. तिसरे दिवशी देवी मूर्तीची दशविधीस्नान व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देवतांना महाअभिषेक, सप्तपाठ हवन व संध्याकाळी आरती…
भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा निषेध करत यास गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भुसावळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भुसावळ विभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेबांनी चर्चा करून परिस्थितीनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सरजू तायडे, पदवीधर जिल्हा सरचिटणीस गोपाळ पाटील, युवक भुसावळ शहराध्यक्ष रणजित चावरिया, उपाध्यक्ष राहुल वाघ, संघटक सचिन पाटील, कार्याध्यक्ष विशाल ठोके, तुषार चौधरी, तुषार हडप, प्रदीप कोळी, नितीन…
जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी इकेवायसी करण्यासाठीची ३१ मार्च पर्यंत मुदत होती, त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून ३१ मे पर्यंत इकेवायसी करता येणार आहे, लाभार्थ्यांनी नजीकच्या सीसीसी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शुक्रवार ८ एप्रिल रोजी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यासाठी गेल्या २०१९ पासून योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात ८-अ नुसार सुमारे ६ लाख ४६ हजार ४०० शेतकरी खातेदार आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल २०२० पर्यंत ४ लाख ९० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंद होती, त्यापैकी जिल्ह्यात १३ हजाराहून अधिक शेतकरी करपात्र उत्पन्न असणारे…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ कारणावरून दोन कुटूंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील रहिवाशी पुरूषोत्तम भानुदास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुरूषोत्तम हे त्यांची पत्नी सुमन ठाकूर सोबत आपसात बोलत असतांना गल्लीतील अर्जुन नागो कोळी, पंकज अर्जून कोळी, चावदास नागो कोळी, दिनेश नागो कोळी, हर्षल दिनेश कोळी, गौरव दिनेश कोळी, वसंत चिंतामन कोळी, सुग्रीव चिंतामन कोळी आणि चेतन कोळी सर्व रा. सोनवणे ता. धरणगाव यांनी पुरूषोत्तम व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तर…

