पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला शिवीगाळ, मारहण करून जीवेठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महिला शौचालयात जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा महिलेच्या मागे दुचाकीने येवून मोठ मोठ्याने हार्न वाजवित होता. त्यानंतर महिलेजवळ येवून तिचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार महिलेने सचिन लोखंडेच्या घरी सांगितले असता सचिनचे भाऊ जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे आणि…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदेसह चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे ठाकले आहे. त्यात भर म्हणजे आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड पुकारण्याचे संकेत दिले आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येण्याची चिन्हे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे ११ जुलै मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक 18…
सावदा स्टेशन प्रबंधकाला अटक; भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भुसावळ प्रतिनिधी । लग्नाचे आमीष दाखल तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सावदा स्टेशन प्रबंधकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. भुसावळ पोलीसांच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती खासगी नोकरीला आहे. ४ डिसेंबर २०१७ रोजी तिच्या नातेवाईकांच्या लग्नात आली असता तिची ओळख सावदा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंधकपदी नोकरीला असलेला अंकुश किरण मोरे (वय 34 रा. भुसावळ) याच्याशी झाली. त्यावेळी अंकुशने तारुणीकडून मोबाईल नंबर घेऊन संपर्क साधला. मध्यंतरी ३१ मार्च २०१८ रोजी तरुणीला…
भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील हतनुर धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने ४ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले आहे तर २० दरवाजे १ मीटरने उघडले आहे. हतनुर धरणाचे वरच्या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय मध्यप्रदेश, विदर्भात होत असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने धरणातील पाणी पातळी 209.68 मीटर इतकी झाली आहे यातून ३८ हजार १०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा…
जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मंत्रीपदासाठी बंडखोर आमदारांना आस लागली आहे. राजकीय क्षेत्रात मंत्रीपदासाठी खलबते सुरू आहे. शिंदे गटातील पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. राज्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर राजकीय क्षेत्रात मंत्रीमंडळ निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांचे उत्तर महाराष्ट्रात मंत्रीमंडळात मंत्रीपद निश्चित मानले जात असले तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले बंडखोर आमदार किशारे पाटील यांचे नाव आघडीवर आहे. किशोर पाटलांच्या रूपाने नवीन चेहरा लाभल्यास शिंदे गटाला विस्ताराची मोठी संधी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईचे महापूजा केले आहे. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना हा बहुमान मिळाला. शरद पवार यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला असून शरद पवार यांनी यु-टॅर्न घेतला आहे. औरंगाबाद येथे शरद पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत मध्यावधी निवडणुका होतील, अश्या बातम्या समोर आल्या परंतु त्यावरही त्यांनी खुलासा केला आहे, ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी बोललो नाही. निवडणुकांसाठी आपण तयार असले पाहिजे असे मी कार्यकर्त्यांना म्हणालो होतो’. ‘औरंगाबादच्या नामांतराबाबत सुसंवाद नव्हता, नामांतराचा निर्णय घेणार याबाबत माहिती नव्हती. विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाक्यावरील ईदगाव मैदानात बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले. बकर ईद निमित्त मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टतर्फे अजिंठा चौक येथील इदगाह मैदानावर रविवारी १० वाजता सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लिम बांधवांनी एकाचवेळी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी दुवा पठण करत अल्लाहाकडे साकडे घातले. गात सुख शांती नांदू दे अशी दुवा केली असता त्यांच्या प्रत्येक शब्दावर उपस्थित हजारो लोकांनी आमीन म्हणून दुआ कबूल हो असे अनुमोदन दिले. याप्रसंगी इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव अनिस शहा व मुकीम शेख, संचालक…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ६ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचे पालक हे शेतात कामासाठी गेले. त्यावेळी मुलगी घरी एकटी होती. सायंकाळी तिचे पालक घरी आल्यावर मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी मारवड पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे , तब्बल 40 जणं बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यात्रेला मुंबई पोलीस हवालदार देखील गेले होते सुदैवाने त्यावेळी अमरनाथ गुहेजवळ नसल्याने संकट टळले होते तोच काळाने घाला घातला श्रीनगरच्या दिशेने परताना सकाळी अचानक त्यांना श्वसनाचा त्रास झिल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथील विलेपार्ले पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुनील देवजी जंगम 3 जुलै ते 17 जुलैपर्यंत अर्जित रजेवर होते. यादरम्यान ते अमरनाथ यात्रेला गेले होते. 9 जुलै रोजी दर्शन घेऊन श्रीनगरच्या दिशेने परताना श्वसनाचा त्रास होऊ…
जळगाव-प्रतिनिधी प्रविण पाटील। जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ भरधाव महिद्रा पिकअप मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) ला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे रा. चिंचखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा हा तरूणाचा मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ…

