Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी हे वरदान ठरत आहे अजून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने माहिती दिली. गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकांसाठी या पावसाने चांगले जीवदान मिळणार आहे. दुसरीकडे तापी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने हातनुर धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.अजून पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवार 9 जुलै रोजी सकाळी 9 वाजता विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले होते. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक विषयांमध्ये वस्त्र परिधान करून विद्यालयात उपस्थिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर मुलींनी नऊवारी साडी व पातळ घातलं होतं.मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषांमध्ये दिंडीत सहभाग घेतल्याने चैतन्यमय वातावरण झालं होतं. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यानाचे शनिवारी 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले. भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेच्या वतीने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून सहभागी असलेले अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष डॉ. जटाशंकर यांनी बीज भाषण केले. तसेच प्रथम मुख्य वक्ता नव नालंदा महाविहारा, बिहार येथील डॉ. सुशिम दुबे यांनी योग विषयाचे महत्त्व तसेच आताच्या पिढीला त्याची आवश्यकता व आहारातील सात्विक, राजसिक आणि तामसीक यांच्यातिल महत्व आदि संकल्पनांचे सुस्पष्ट विवरण त्यांनी सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले. याप्रसंगी द्वितीय मुख्य वक्ता देव संस्कृती विश्वविद्यालयाचे (हरिद्वार) योग आणि आरोग्य विभागाचे विभागप्रमुख डॉ.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करून नवीन सरकार उभे केले आहे. यातच शिवसेने कडून एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अनेक टीका आणि शब्दाचा भडीमार होत आहे. यावरच पलाटवार करताना बंडखोर आमदारांमध्ये सहभागी दिपक केसरकर ठाकरेवर निशाणा साधला आहे. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय वातावरण उफाळून आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता माध्यमातून सडकून टीका केली. दरम्यान, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे ,गद्दार हे गद्दारच आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या अश्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून जीव गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एक मृत्यू विहीरीत पडून तर दोन जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नजीकच्या पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात साक्षी सुरेश कापडणे (वय १८) या तरुणीचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाला आहे.पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन सोनवणे करीत आहेत. तर भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या बराच वेळ पाण्यात बुडल्याने मुर्त्यू झाला आहे. ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मागील गेल्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. वाढत्या इंधन किंमतीत वाहन चालविणे महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सरकार सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या विधानाचा संबंध वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्याशी जोडला जात आहे. इंधनाचे दर दोन रुपयांनी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नितीन गडकरी यांना विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पेट्रोलच्या…

Read More

मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्याने सरकार स्थापन झाल्याने आता नगरपालिकांच्या निवडणूकांची उत्सूकता लागून होतो. या साठीच्या प्रारूप याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांची घोषणा केली आहे. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असा राहणार निवडणूक कार्यक्रम ७ जुलै अंतीम प्रारूप याद्या जाहीर, २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर२२ ते २८ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, स्विकारण्याची मुदत२९…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगव शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलीचे आईवडील हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार ५ जूलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना किरण अशोक चव्हाण याने तिचे अपहरण करून करून फूस लवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी किरण चव्हाण याच्यावर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रेाजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. या आरोग्य शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. त्याप्रमाणे अल्पदरात एक्स-रे आणि ईसीजी देखील तपासणी करण्यात येणार आहे. इच्छक व गरजूंनी रविवारी १० जुलै रोजी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्य मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नवीन जोशाने तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.या दौऱ्यात…

Read More