जळगावातील खोटे नगरजवळील घटना; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । जुनी दुचाकी घेण्यासाठी जळगावात आलेल्या तरूणाच्या खिशातून ५५ हजार रूपयांची रोकड रिक्षातून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेश रमेश भाटीया (वय-३२) रा. भाटीया गल्ली धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आगरबत्ती विक्री व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. व्यवसाय करण्यासाठी त्याला जुनी दुचाकी घेण्यासाठी २८ मे रोजी जळगावात आला होता. त्यावेळी रूपेशने ५५ हजार रूपये सोबत आणलेले होते. जळगावात आल्यानंतर त्याचा मित्र मनोज वाणी याला भेटून गणेश कॉलनीतील ख्वॉजामियॉ येथे त्याला जुन्या दुचाकी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मध्यप्रदेशमध्ये एक दहा वर्षांचा मुलावर मगरने झडप घालून हल्ला केला. मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. या धक्कादायक घटनेने मध्य प्रदेशमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मध्य प्रदेशच्या शोपूपमध्ये चिंबल नदीत दहा वर्षांचा मुलाला अंघोळ करताना चिमुकल्याला महाकाय मगरीने गिळले. अंगावर काटा आणणारा हा प्रकार समोर आला. नंदीत अंघोळ करताना मगरीने झडप टाकून हल्ला केला. नदीच्या खोलवर घेऊन गेली या मुलाला मगरीने जिवंत गिळलं. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला. तिला नदीतून बाहेर काढलं आणि आक्रोश सुरु झाला. गावातील लोकांनी मगरीला शोधलं…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात संघर्ष सुरूच आहे. नव्याने शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.अनेक ठिकाणी शिवसेनेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आता दहिसर येथील फेरीत आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदाराना लाज असेल, हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं वक्तव्य केलं होतं. शिदें यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केल्याने महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामासाठी अपुरा निधी आणि हिदुत्वांच्या विचारांचं आरोप आमदारांनी केला. एकनाथ शिंदेंनी मागण्या ठाकरेंसमोर ठेवल्या त्या शिवसेनेनं मान्य न केल्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा…
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर, अनेक भागांतील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील या दमदार पावसामुळे जिल्हातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या विसर्ग गोदावरील पूर आला आहे. नाशिक रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तीन चार दिवस नाशिकमध्ये शाळा आज बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यात अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. महालपाटणे (ता. देवळा) गावाला पुराचा धोका वाढला असून पेठ…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याचं निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणा करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व प्रयत्न केले आहेत. यापुढेही करत राहू, ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका…
लशिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड पुकारले नवीन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. बैठकीला तब्बल १० खासदार गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उदान आले आहे. शिवसेनेत आमदारांनी बंडामुळे खासदार देखील शिंदे गटात सामील होणार आहे. शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनीही पक्षातील खासदार आमच्या संपर्कात असल्याचे माहिती होती. तसेच भाजपने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. हा प्रकार लक्षात येताच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला तब्बल…
जळगाव प्रतिनिधी । ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत औरंगाबाद येथे १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक भरती मेळाव्यात जिल्ह्यातील तरूणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत केले आहे. दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानात सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. सैनिक भरतीसाठी १ जुलै पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात आली असून ३०…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे गटा विरुध्द शिवसेना वाद टोकाला गेला आहे. तर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दुसरीकडे निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. अनिल परबाचे मोठे वक्तव्य, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नाही, याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आले, त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील. आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, सध्याचे विधानसभा अध्यक्ष…
एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी परिसरातून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सतीष प्रल्हाद नेमाडे (वय-५०) रा. पंचमुखी अपार्टमेंट, गणेशवाडी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नास्तागाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची मालिकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस ५०५५) ही अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे गुरूवार ७ जुलै रोजी उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवार १० जुलै रोजी…
अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील गांधीलपूरा येथे सतरा वर्षीय अल्पवयील मुलगी ही आई व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी मुलीचा भाऊ व आई हे कामाला निघून गेले. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. दुपारी मुलीचा भाऊ हा दुपारी ३ वाजता कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी…

