लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातील नराधमाकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली. नराधमाला पोलीसांनी अटक केले आहे. या गुन्ह्याचा गुरूवारी १४ जुलै रोजी नराधमावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही गतीमंद असल्याने ती घरीच असते. १३ जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेले. दरम्यान, गावातील शांतारा मधनसिंग गायकवाड याने मुलीचा गतीमंद असल्याचा गैर फायदा घेत तिला गावातील बकऱ्यांच्या वाड्यात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. परंतु उद्धव ठाकरेना अनेक अडचणी सहन करावे लागत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे सरकारसाठी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाले. ठाण्यात शिवसेनेतील 5 नगरसेवक गोपाळ लांडगेंची शिंदे गटाला साथ देणार आहे. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी 28 नगरसेवक एकनाथ शिंदें गटात सहभागी झाले. ऐरोलीसह आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. रामदास…
प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वाकडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रियंका विठ्ठल बाविस्कर (वय-१५) रा. वाकडी ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंका बाविस्कर ही आपले वडील, तीन बहिणी आणि लहान भावासोबत वास्तव्याला आहे. तिचे वडील शेतात हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १४ जुलै रोजी सकाळी तिचे वडील शेतात कामाला निघून गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रियंका घरात…
जळगाव प्रतिनिधी । फावड्याच्या दांडने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्या फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचखेडा गावातून अटक केली आहे. त्याने खूनाची कबुली दिली असून जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नथ्थू काळू सुरळकर वय २८ रा. चिंचखेडा ता .जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तर शाम फकीरा ठाकरे वय 30 रा.गंगापूरी ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील गंगापूरी गावातील एक दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता, २५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता. मयत हा गंगापूर गावातील शाम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विमानासारख्या वाहनाचा अत्यंत किरकोळ बिघाड देखील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण विमान हे आकाशात अधांतरी उडणारे वाहन आहे. गेल्या महिन्यात तब्बल ९ वेळा स्पाईसजेट कंपनीचे विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वी दिल्ली विमानतळावर जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेले स्पाईसजेटचे विमान उड्डाणाच्या आधी विजेच्या खांबाला धडकले. त्यानंतर आता दुबईहून मदुराईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 MAX विमानाचे चाक निकामी झाल्याने उशीर झाला. स्पाईसजेटच्या विमानात वारंवार तांत्रिक बिघाडांच्या घटनांनंतर 19 जूनपासून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याआधी 2 जुलै रोजी जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सुमारे 5,000 फूट उंचीवर क्रू मेंबर्सच्या केबिनमध्ये धूर पाहून दिल्लीला परतले होते. त्यामुळे…
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डाणपुलावर रूग्णवाहिका आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार टक्कर होवून अपघात झाल्याची घटना गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डापुलावर गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास (एमएच १४ सीएल ०७५५) या क्रमांकाची शासकीय रूग्णवाहिका आणि एमएच १९ सीडब्ल्यू ०६३८ क्रमांकाच्या ऍपे रिक्षाची समोरा समोर धडक झाली. या अपघातात रूग्ण वाहिकाचालक निलेश धनगर रा. वरणगाव ता. भुसावळ यांच्यासह…
राज्यभरातही शिंदे गटाच्या भूमिकेची उत्सुकता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडण्याची भूमिका तालुक्यातील माजी पालकमंत्री व आमदार गुलाबराव पाटील समर्थकांनी घेतली आहे . यासाठी पुढाकार घेऊन हे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आले आहेत . या शिंदे गटाचे नेतृत्व आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडेच राहणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत . तथापि शिवसेनेपासून वेगळे होऊन आपल्याच तालुक्यात स्वतंत्र लढणे ही गुलाबराव पाटील यांचीच कसोटी ठरणार आहे . राज्यातील सत्तांतराचा पार्शवभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थक काय भूमिका घेतील याची उत्सुकता सर्वांना आहेच . त्यात राज्यात पहिल्यांदा धरणगाव नगरपरिषदेसाठी अशी…
मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचयतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचातींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला होता. यासाठी निवडणूक आयोगाने १८ ऑगस्टची तारीख देखील जाहीर केली होती. दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. १२ जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर शासनाने समर्पित आयोगाने नागरीकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वाच्च न्यायालयात सादर करण्यात आला. याचे कामकाज आता १९ जुलै रोजी होणार असल्याने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर ज्या क्षेत्रात आचारसंहिता जाहीर होती होती ती आपसुकच संपुष्टात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवार,…
गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे गिरणा धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या इशार्यात म्हटले आहे की, गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार आहे. तसेच वरून येणारा पुर पाण्याची आवक पाहता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन गुरूवार १४ जुलै रोजी दुपार गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असा इशारा येत दिलेला आहे. दरम्यान, पुराचा…
मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळात महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आजच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जाणार यासह इतर महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले आहे. हे आहे महत्वाचे 9 निर्णय१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग),२. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान”…

