भुसावळकडून जळगावकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवार, ७ ऑगस्ट रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिओम धनाजी भुसारे वय ३८ रा. सावरगाव ता. नांदगाव जि. नाशिक हे २९ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असतांना महामार्गावर नशीराबादजवळ पार्श्वनाथ पेट्रोलंपपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होवून दुचाकीवरील हरिओम भुसारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवारी मयत हरिओम यांचे वडील धनाजी गंगाराम भुसारे वय ६२ रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव यांच्या तक्रारीवरुन…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव शहरातील सिल्व्हर पॅलेज हॉटेलमधील लॉजिंग विभागाच्या काऊंटरमधून २ हजार १० रुपयांची रोकड चोरुन नेणाऱ्या तरुणाविरोधात रविवार, ७ जुलै रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, हॉटेल सिल्व्हर पॅलेसच्या लॉजिंक विभागातील काऊंटरमधून ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हॉटेलमधीलच भुषण फकीरा सुर्यवंशी याने मालकाच्या संमतीशिवाय २ हजार १० रुपये चोरुन नेले. चोरीची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी हॉटेलचे सुपरवायझर सागर रत्नाकर झांबरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी भुषण फकीरा सुर्यवंशी रा. शेंदुर्णी ता. जामनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.
शहरातील इच्छादेवी चौकात राहणाऱ्या तरुणाचा मेहरुण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, नाना सुरेश सोनवणे हा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याने आत्महत्या केली किंवा पाण्यात पाय घसरून पाडला याची कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोले बाजी केली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही”, विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. पुढे अजित पवार म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष…
धरणगाव प्रतिनिधी । राज्य मंत्री मंडळाची शपथविधीचा मुहूर्त ठरल्याने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील हे आज दुपारी मुंबई तातडीने रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी मंगळवार ९ ऑगस्ट तारीख ठरली आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिनी असल्याने पहिल्या मंत्री मंडळाचा विस्तार होत आहे. याबाबत आता बंडखोर आमदारांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासाठी जणू काही गुडघ्याला बाशींग बांधून होते. राज्य मंडळाच्या शपथविधीला मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते रेल्वेद्वारे…
7 ऑगस्ट रोजी पुण्यात दारू पिलेल्या वादातून एकाने मित्राचा डोक्यात दगड मारून गंभीररित्या हत्या करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी प्रवीणला अटक केली आहे. अनिल राजू सासी (वय 33, रा. इंदिरानगर वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिल हा बूट पॉलिशचे काम करून उदरनिर्वाह चालवत होता. प्रवीण आणि अनिल मागील 10 ते 12 वर्षांपासून मैत्री होती. दोघेही नेहमी सोबतच दारू पित असत. 2 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अनिल व प्रवीण दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे रागातून प्रविणने अनिलच्या डोक्यात दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले. प्रविण त्या…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दीड महिना झाला तरीसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. संपूर्ण राज्याचं लक्ष आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागून राहिलं आहे. आता प्रतिक्षा संपली असून उद्याच सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु असून बैठकीनंतर ते राजभवनावर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे…
एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आता जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर खोचक टीका केली आहे. “हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. “कोणी म्हणतं तुरुंगात जायचंय, जायचंय तुरुंगात तर तुरुंगात जाईन. माझं नेहमीच असं होतं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे”” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. आडवी उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि त्याच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करायचा असे जे प्रकार होत आहेत ते निषेधार्ह आहेत” तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल…
बेळगावहून हिरेकेरूरला निघालेली कर्नाटक महामंडळाची बस अचानक पलटी झाल्याने अपघात घडला आहे. बसमध्ये असलेल्या 35 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले. बस सावकाश असल्या कारणाने प्रवाशांना फारशी इजा झाली नाही. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळ्ळमठ येथे रविवारी बसचा अपघात घडला. बागेवाडी विशाळगडहून राणेबेन्नूर निघालेली बस बेळगावात थांबा घेऊन पुढे जात होती. बडेकोळ्ळमठाच्या पुढील बाजूला असलेल्या कमकारहट्टीच्या बाजूला उतारीला लागलेल्या बसवरील चालकाचा नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. याचवेळी जोराचा पाऊस सुरू असल्याने चालकाने वेग कमी केला होता. तरीही बस बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. बसमध्ये बसलेले पाच प्रवाशी जखमी झाले. उर्वरित प्रवाशांनाही कसलीही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी…
मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यभरातून अनेक पिकाचा सामना करावा लागतो. उगाच बाष्कळ बडबड करू नका, सेल्फ गोल करू नका अशा शब्दांत वरिष्ठांकडून कोश्यारींना समज देण्यात आली आहे. आता अक्षरशः राज्यपाल कोश्यारी नजर चोरात पळ काढण्याची वेळ आली आहे. गुजराती आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राज्यपाल दोन दिवस दिल्ली दौऱयावर असून त्यांनी आज पक्षातील वरिष्ठांची भेट घेतली. तेव्हा त्यांना वरिष्ठांनी चांगलीच तंबी दिल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे राज्यपालांनीही तशी कबुली दिली. महाराष्ट्र सदनात…

