कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्ले येथे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो ताब्यात घेतले आहे. अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ४९) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबासो जाधव याला दारूचे व्यसन असून तो काही काम धंधा करत नसल्याने त्याचे घरात नेहमी पत्नी अनिता व मुलाबरोबर वाद होत होते. सोमवारी रात्री त्यांच्यातील वाद विकोपला गेला. यामध्ये बाबासो याने अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. यामध्ये अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद तेजस बाबासो जाधव याने…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्ये गळफास घेतला पंढरपूरमध्ये घडली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेने पोलीस दलासह तालुक्यात खळबळ उडाली. सुनील तानाजी किसवे (वय 21) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. सुनीलवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याला मंगळवेढा कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारल्याने सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते.नातेवाईक घटनास्थळी हजर झाले सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या मंगळवेढा येथील…
शिवसेनेतून बंड करून आल्यानंतरही महत्त्वाचे खाते न मिळाल्याने या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून विरोधकांनी शिंद-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नाराज असलेल्या मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र, सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत.मंत्रीपद…
माझा तिसरा डोळा उघडला तर… गौरव पाटील प्रतिनिधी : राज्यात सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकारने कॅबिनेट मंत्री मंडळाचा विस्तार केला व त्यामध्ये खान्देशची मुलुख मैदान तोफ आ.गुलाबराव पाटील यांचा ही कॅबिनेट मंत्रीपदी निवड करून खान्देशला मंत्री मंडळात सामील केले. त्यानंतर ना.पाटील हे प्रथमच मंत्री झाल्यावर जिल्हात जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. यावेळी ना.पाटील बोलतांना म्हणाले की, मी मंत्री होऊ नये म्हणून थेट गल्लीतून दिल्लीपर्यंत तक्रार केली. काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, 35 वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे. माझ्याकडे जातीचे भांडवल नाही,…
मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्यानं हळहळ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विनायक मेटे विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार असलेल्या विनायक मेटे यांचा खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यामध्ये त्यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे.विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण…
पाचोरा : प्रतिनिधी एका २० वर्षीय विवाहितेने रक्षाबंधनानिमित्त माहेरी आली असता तीने पहाटे स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी उमा नानू फादगे (वय – २०) हिचा विवाह जळगांव शहरातील खंडेराव नगर येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांचेशी दि. १८ मे २०२२ रोजी शेवाळे येथे मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणुन दि. १२ आॅगस्ट २०२२ रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. परंतू या कार्यक्रमाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप धरणगाव पालिका प्रशासनावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले. परंतू असा काही कार्यक्रम होणार आहे, याबाबतची माहिती बहुतांश राजकीय पक्ष आणि नागरिकांपर्यंत पोहचवली गेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमापासून राजकीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक वंचित राहिले, असा…
भर कार्यक्रमात चाकूने केले वार ; एक डोळा गमावण्याची शक्यता ! वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतीय वंशाचे कादंबरीकार आणि लेखक सलमान रश्दी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानाच्या मंचावर असताना त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. सध्या व्हेंटिलेटरवर असलेले सलमान यांना एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या हातातील नसा कापल्या गेल्या आहेत. सलमान रश्दी यांची ओळख करुन दिल्यानंतर लगचेचच चाकूनं त्यांच्यावर वार करण्यात आले. सलमान रश्दी यांना ‘द सैटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या लेखनावरुन जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला.…
मुंबई : वृत्तसंस्था क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये खूप मोठा वाद झाला होता. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण, आता समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे वानखेडेंनी मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे यांनी आधी राष्ट्रीय जातपडताळणी समितीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता राज्य जात पडताळणी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नसून ते हिंदु महार असल्याचा खुलासा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: देशात १५ ऑगस्ट हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जात. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याच्या सुचना केंद्र सरकार कडून केले आहे. दरम्यान, तिरंगा घरात फडकवत असतांना कोणती काळजी घ्यावी याचे देखील माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ लावताना…

